शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठेवीदारांसाठी जिल्हा प्रशासनाची धडक मोहीम कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 21:08 IST

आश्वासनाचा विसर

ठळक मुद्दे ठेवीदारांचे कोट्यवधी रूपये अडकूनही प्रशासनाचे दुर्लक्ष ‘संकल्प ते सिद्धी’ कागदावरच

जळगाव : ‘संकल्प ते सिद्धी’ उपक्रमांतर्गत २०१८ या वर्षात करावयाच्या कामांमध्ये ठेवीदारांच्या प्रश्नाबाबत फेब्रुवारी २०१८ पासून धडक मोहीम राबविण्याचे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी जाहीर केले होते. मात्र घोषणा होऊन चार महिने तर मोहीम सुरू करण्याचा कालावधी उलटून ३ महिने झाले तरीही ही मोहीम अद्यापही सुरू झालेली नाही.सहकार विभाग नाचवतेय कागदी घोडेसहकार विभागाच्या निष्क्रिीयतेमुळे जिल्ह्यातील पतसंस्थांमधील ठेवीदारांचा ठेवींचा प्रश्न प्रलंबित आहे. सहकार राज्यमंत्री जिल्ह्यातील असताना व त्यांच्या तसेच सहकार आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक होऊन व त्यात २१ कलमी कार्यक्रम निश्चित होऊनही त्यानुसार अंमलबजावणी मागील वर्षभरात झालीच नाही. या कार्यक्रमात निश्चित करून दिलेल्या कालावधीत संबंधीत कामे झालेली नाहीत. प्रत्यक्षात अनेक ठेवीदारांना पैशांची तातडीने गरज आहे. सहकार विभाग मात्र केवळ कागदी घोडे नाचविताना दिसत आहे.मालमत्ता खरेदीचा अवघड उपायआता शासनाच्या नवीन निर्णयानुसार ठेवीदारांना पतसंस्थांच्या मालमत्ता खरेदीसाठी आवाहन केले जात आहे. त्यासाठी मालमत्तांचे मूल्यांकन होऊन त्यांना जिल्हा उपनिबंधकांची मंजुरी घेण्याचे काम सुरू आहे. मात्र त्यात ८५ टक्के ठेवीची रक्कम तर १५ टक्के रक्कम ठेवीदाराने घरून टाकायची आहे. मात्र बहुतांश ठेवीदारांना मुलींच्या लग्नासाठी पैसा नाही, अशी परिस्थिती आहे. ते मालमत्ता घेण्यासाठी आणखी १५ टक्के रक्कम कुठून आणणार? तसेच मालमत्ता घेऊन ती कोणाला विकणार? असा प्रश्न आहे. कारण जर त्या मालमत्तांना महत्व असते तर सहकार विभागाने काढलेल्या लिलावातच त्याची विक्री होऊन पैसे वसुल झाले असते. त्यामुळे या भानगडीत किती ठेवीदार पडतील? असा प्रश्न आहे. कारण बहुतांश ठेवीदार हे सेवानिवृत्त आहेत. तर काही निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. तर अनेक ठेवीदार सामान्य घरातील आहेत. त्यांना पैसे भरले तसे ते परत मिळावेत, एवढीच भाबडी आशा आहे. मात्र सहकार विभाग संचालकांच्या तसेच बड्या थकबाकीदारांच्या मालमत्तांची जप्ती व लिलाव करण्याची धडक मोहीम राबवायला धजावत नसल्याचे चित्र आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: आश्वासन दिल्यावर तरी या विषयात लक्ष घालणे अपेक्षित होते. मात्र चार महिन्यात ते झालेले नसल्याचे दिसून येत आहे.तक्रारींचीही दखल नाहीजिल्हास्तरीय लोकशाही दिनी तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने दीड वर्षातील तब्बल १३०७ तक्रारी अद्यापही प्रलंबित आहेत. या तक्रारींपैकी ६०९ तक्रारी या सहकार विभागाशी संबंधीत म्हणजेच पतपेढ्यांमधील ठेवींबाबत आहेत. त्यांचा जिल्हा उपनिबंधकांनी स्वतंत्रपणे आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व विभागप्रमुखांना लोकशाही दिनातील तक्रारींचा वेळेवर निपटारा करण्याबाबत ताकीद देण्यात आली. मात्र अद्यापही सहकार विभागाच्या स्वतंत्र लोकशाही दिनाची तारीख व वेळ जाहीर झालेली नाही.------काय आहे ‘संकल्प ते सिद्धी’?राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय जळगाव आयोजित ‘सिद्धी २०१७ व संकल्प २०१८’ या उपक्रमांतर्गत पत्रकार दिनाचे औचित्य साधून ५ जानेवारी २०१८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकाºयांनी येत्या वर्षात जिल्ह्याच्या विकासासाठी करण्यात येणाºया विविध उपक्रमांची माहिती दिली होती.