शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ठेवीदारांसाठी जिल्हा प्रशासनाची धडक मोहीम कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 21:08 IST

आश्वासनाचा विसर

ठळक मुद्दे ठेवीदारांचे कोट्यवधी रूपये अडकूनही प्रशासनाचे दुर्लक्ष ‘संकल्प ते सिद्धी’ कागदावरच

जळगाव : ‘संकल्प ते सिद्धी’ उपक्रमांतर्गत २०१८ या वर्षात करावयाच्या कामांमध्ये ठेवीदारांच्या प्रश्नाबाबत फेब्रुवारी २०१८ पासून धडक मोहीम राबविण्याचे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी जाहीर केले होते. मात्र घोषणा होऊन चार महिने तर मोहीम सुरू करण्याचा कालावधी उलटून ३ महिने झाले तरीही ही मोहीम अद्यापही सुरू झालेली नाही.सहकार विभाग नाचवतेय कागदी घोडेसहकार विभागाच्या निष्क्रिीयतेमुळे जिल्ह्यातील पतसंस्थांमधील ठेवीदारांचा ठेवींचा प्रश्न प्रलंबित आहे. सहकार राज्यमंत्री जिल्ह्यातील असताना व त्यांच्या तसेच सहकार आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक होऊन व त्यात २१ कलमी कार्यक्रम निश्चित होऊनही त्यानुसार अंमलबजावणी मागील वर्षभरात झालीच नाही. या कार्यक्रमात निश्चित करून दिलेल्या कालावधीत संबंधीत कामे झालेली नाहीत. प्रत्यक्षात अनेक ठेवीदारांना पैशांची तातडीने गरज आहे. सहकार विभाग मात्र केवळ कागदी घोडे नाचविताना दिसत आहे.मालमत्ता खरेदीचा अवघड उपायआता शासनाच्या नवीन निर्णयानुसार ठेवीदारांना पतसंस्थांच्या मालमत्ता खरेदीसाठी आवाहन केले जात आहे. त्यासाठी मालमत्तांचे मूल्यांकन होऊन त्यांना जिल्हा उपनिबंधकांची मंजुरी घेण्याचे काम सुरू आहे. मात्र त्यात ८५ टक्के ठेवीची रक्कम तर १५ टक्के रक्कम ठेवीदाराने घरून टाकायची आहे. मात्र बहुतांश ठेवीदारांना मुलींच्या लग्नासाठी पैसा नाही, अशी परिस्थिती आहे. ते मालमत्ता घेण्यासाठी आणखी १५ टक्के रक्कम कुठून आणणार? तसेच मालमत्ता घेऊन ती कोणाला विकणार? असा प्रश्न आहे. कारण जर त्या मालमत्तांना महत्व असते तर सहकार विभागाने काढलेल्या लिलावातच त्याची विक्री होऊन पैसे वसुल झाले असते. त्यामुळे या भानगडीत किती ठेवीदार पडतील? असा प्रश्न आहे. कारण बहुतांश ठेवीदार हे सेवानिवृत्त आहेत. तर काही निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. तर अनेक ठेवीदार सामान्य घरातील आहेत. त्यांना पैसे भरले तसे ते परत मिळावेत, एवढीच भाबडी आशा आहे. मात्र सहकार विभाग संचालकांच्या तसेच बड्या थकबाकीदारांच्या मालमत्तांची जप्ती व लिलाव करण्याची धडक मोहीम राबवायला धजावत नसल्याचे चित्र आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: आश्वासन दिल्यावर तरी या विषयात लक्ष घालणे अपेक्षित होते. मात्र चार महिन्यात ते झालेले नसल्याचे दिसून येत आहे.तक्रारींचीही दखल नाहीजिल्हास्तरीय लोकशाही दिनी तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने दीड वर्षातील तब्बल १३०७ तक्रारी अद्यापही प्रलंबित आहेत. या तक्रारींपैकी ६०९ तक्रारी या सहकार विभागाशी संबंधीत म्हणजेच पतपेढ्यांमधील ठेवींबाबत आहेत. त्यांचा जिल्हा उपनिबंधकांनी स्वतंत्रपणे आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व विभागप्रमुखांना लोकशाही दिनातील तक्रारींचा वेळेवर निपटारा करण्याबाबत ताकीद देण्यात आली. मात्र अद्यापही सहकार विभागाच्या स्वतंत्र लोकशाही दिनाची तारीख व वेळ जाहीर झालेली नाही.------काय आहे ‘संकल्प ते सिद्धी’?राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय जळगाव आयोजित ‘सिद्धी २०१७ व संकल्प २०१८’ या उपक्रमांतर्गत पत्रकार दिनाचे औचित्य साधून ५ जानेवारी २०१८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकाºयांनी येत्या वर्षात जिल्ह्याच्या विकासासाठी करण्यात येणाºया विविध उपक्रमांची माहिती दिली होती.