शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

जळगावच्या बाजारपेठेत आवक वाढल्याने गव्हाचे भाव स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 11:56 IST

विजयकुमार सैतवाल जळगाव -  जळगावच्या बाजारपेठेमध्ये वर्षभराच्या धान्य खरेदीसाठी गर्दी होत असली तरी गव्हाची आवकही वाढल्याने गव्हाचे भाव स्थिर ...

विजयकुमार सैतवाल

जळगावजळगावच्या बाजारपेठेमध्ये वर्षभराच्या धान्य खरेदीसाठी गर्दी होत असली तरी गव्हाची आवकही वाढल्याने गव्हाचे भाव स्थिर आहे. दुसरीकडे मात्र सर्वच डाळींना मागणी वाढत असल्याने व आवक कमी असल्याने इतर डाळी स्थिर असल्या तरी मुगाच्या डाळीत आठवडाभरात प्रती क्विंटल ३०० ते ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या वर्षभरासाठीच्या धान्य खरेदीसह डाळींचीही मागणी वाढल्यामुळे डाळीत तेजी येत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. कमी पावसामुळे शेती मालाची आवक घटून सुरुवातीपासूनच त्यांचे भाव वाढण्यास सुरुवात झाली होती. गेल्या आठवड्यात स्थिर असलेली मुगाच्या डाळीत या आठवड्यात पुन्हा वाढ झाल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे. तांदळालादेखील मागणी असली तरी त्यांचेही भाव स्थिर असल्याने तेवढा ग्राहकांना दिलासा आहे.यंदा कमी पावसामुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला असून कडधान्याची आवक कमी असल्याने उडीद-मुगाच्या डाळीवर परिणाम झाला आहे. हा फटका अद्यापही कायम असून या सोबतच आता कडधान्याच्या आयातीच्या प्रमाणावर निर्बंध आल्याने डाळींचे भाव आणखी वाढत असल्याची माहिती जळगाव दाणाबाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी दिली.गेल्या आठवड्यात ७३०० ते ७७०० रुपये प्रती क्विंटल असलेली मुगाची डाळ या आठवड्यात ७७०० ते ८००० रुपये प्रती क्विंटल झाली आहे. उडीदाच्या डाळीत गेल्या आठवड्यात १०० रुपये प्रती क्विंटलने वाढ होऊन ती ५८०० ते ६२०० रुपये प्रती क्विंटल झाली होती. या आठवड्यात या डाळीचे भाव स्थिर आहे. अशाच प्रकारे गेल्या आठवड्यात ५७०० ते ६००० रुपये प्रती क्विंटल असलेल्या हरभरा डाळीचे तसेच तूरडाळीचेदेखील भाव ७८०० ते ८००० रुपये प्रती क्विंटलवर स्थिर आहे.गव्हाचे भाव स्थिरअनेक ग्राहक आपल्या घरात वर्षभरासाठी धान्य साठवून ठेवतात. त्यामुळे तीन आठवड्यांपासून गव्हाला मागणी वाढल्याने तीन आठवड्यांपूर्वी गव्हाच्या भावात ५० रुपये प्रती क्विंटलने वाढ झाली होती. मात्र गव्हाची आवक चांगली असल्याने गेल्या दोन आठवड्यांपासून गव्हाचे भाव स्थिर आहे. दोन आठवड्यांपूर्वी २२०० ते २३०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या १४७ गव्हाचे भाव अद्यापही याच भावावर स्थिर आहे. अशाच प्रकारे लोकवन गव्हाचे भावदेखील २१५० ते २२०० रुपये प्रती क्विंटलवर तर चंदोसीचे भाव ३६०० ते ४००० रुपये प्रती क्विंटलवर स्थिर आहे. या सोबतच शरबती गव्हाचे भाव २३०० ते २३५० रुपये प्रती क्विंटलवर स्थिर आहे. बाजारपेठेत जळगाव जिल्ह्यासह मध्यप्रदेश व राजस्थानातून गव्हाची आवक सुरू आहे.तांदुळाचे भाव स्थिरतांदुळाची आवक नसली तरी त्याचे भाव गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर आहेत. यात सुगंधी मसुरी २ हजार ७०० रुपये प्रती क्विंटल, चिनोर ३ हजार रुपये प्रती क्विंटल, कालीमूछ ४ हजार रुपये प्रती क्विंटल, लचकारी कोलम ४ हजार ५०० रुपये प्रती क्विंटल, आंबेमोहर ५ हजार ४०० रुपये प्रती क्विंटल, बासमती ९०० ते १ हजार ३०० रुपये प्रती क्विंटलवर स्थिर आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव