शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

राजकारणाला बोल लावण्यात काय हशील?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 01:04 IST

चांगली माणसे राजकारणाबाहेर राहणार असतील तर रिकाम्या जागा पटकवायला इतर मंडळी पुढे येणारच !, सत्तेवाचून तळमळणाऱ्या राजकारण्यांच्या ‘आयाराम-गयाराम’ संस्कृतीने राजकारणाचे सर्वात मोठे नुकसान

मिलिंद कुलकर्णीदेश, राज्य आणि गाव-शहरांमध्ये सध्या सत्तातुरांकडून ‘आयाराम-गयाराम’ संस्कृतीला दिले जात असलेले महत्त्व पाहता एकंदर राजकारणाविषयी सामान्य माणसाचा भ्रमनिरास होत चालला आहे. समाजातील सुशिक्षित, सुसंस्कृत, समंजस आणि परिपक्व घटक राजकारणाच्या परिघाबाहेर केव्हाच पडला आहे. राजकारणाचे बदलते स्वरुप या मंडळींना मानवत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ज्ञानी, समजूतदार मंडळीच बाहेर पडल्याने राजकारणाचे एकंदर काय होणार हे वेगळे सांगायला नको. आपण काही करणार नाही, आणि केवळ टीका करणार, याला काही अर्थ आहे का?राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असल्याने युती, आघाडीची चर्चा, आयाराम-गयाराम, जनआशीर्वाद यात्रा-महाजनादेश यात्रा, कोट्यवधींच्या निधीची लयलूट, भूमिपूजन, शुभारंभ कार्यक्रमांची चलती असे सगळे वातावरण आहे.पालिका, महापालिका, लोकसभा निवडणुकीत भाजपने मिळविलेल्या यशाविषयी विरोधी पक्ष अद्याप साशंक आहेत. सरकार आणि भाजप अनेक आघाड्यांवर अपयशी ठरलेले असताना आणि जनतेमध्ये असंतोष असताना एवढे मोठे जनसमर्थन अशक्य आहे, असे ४०-५० वर्षे राजकारणात सक्रीय असलेले नेते सांगत आहेत. स्वाभाविकपणे इव्हीएमला बोल लावला जात आहे.२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपची लाट होती आणि सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढलेला भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. त्याची पुनरावृत्ती या निवडणुकीत होईल, ही भाजपाच्या श्रेष्ठींना आशा असली तरी गाफील न राहता ते विरोधी पक्षातील तुल्यबळ आणि निवडणूक जिंकण्याचे तंत्र अवगत असलेल्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देत आहेत. शिवसेनादेखील हीच रणनीती आखत आहेत. काँग्रेस-राष्टÑवादीचे ज्येष्ठ पदाधिकारी, नेते भाजप-सेनेच्या वाटेवर चालल्याचे पाहून युतीची हवा असल्याची वातावरण निर्मिती केली जात आहे.सत्ता हस्तगत करण्याची ही रणनिती असली तरी सत्ता आल्यानंतर ती राबविण्याचे कौशल्य, दूरदृष्टी आणि धोरणीपणाची नितांत आवश्यकता असते. मुलभूत प्रश्नांवर शासकीय पातळीवर सुरु असलेला गोंधळ पाहता त्याचा थेट परिणाम सामान्य माणसावर होत आहे. त्याला सत्ता कुणाची आहे, याच्याशी देणेघेणे नसते.जळगाव आणि धुळ्याचे उदाहरणे घेतले तर हा मुद्दा पुरेसा स्पष्ट होईल. दोन्हीकडे भाजपची सत्ता आहे. कोट्यवधीचा निधी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आणल्याचा दावा भाजपचे नेते करीत आहेत. त्याला आक्षेप घेण्याचे कारण नाही. परंतु, एवढा निधी येऊनही सामान्य जनतेला मुलभूत विषयांसाठी का वंचित रहावे लागत आहे. पिण्याचे पाणी रोज मिळत नाही. रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. स्वच्छतेचे तीन-तेरा वाजले आहेत. निधी आला आहे, प्रक्रिया सुरु आहे, या आश्वासनाला लोक आता कंटाळले आहेत. कागदावर नको, वास्तवात काम दिसायला हवे. सामान्य जनता, सुजाण मंडळीदेखील हतबल झाल्याचे चित्र आहे. मात्र हे चित्र निर्माण होण्यासाठी जनता आणि सुजाण मंडळीदेखील तेवढीच जबाबदार आहे. स्वत:च्या गावासाठी निर्णय प्रक्रियेत हे कोणी सहभागी होणार नाही, निवडणुकीत जात, धर्म, पैशाला महत्त्व देणार आणि नंतर हतबल होण्यात काय हशील आहे?साम, दाम, दंड, भेद या नियमाने कोणत्याही परिस्थितीत सत्ता आली पाहिजे, असे सगळ्याच राजकीय पक्षांना वाटते. जळगाव, धुळ्यात याच न्यायाने महापालिकेत भाजपला जनतेने सत्ता दिली. राज्य आणि केंद्रातही भाजपचीच सत्ता आहे. वर्षभरात या दोन्ही शहरांचे कोणते प्रश्न मार्गी लागले? निधी आणल्याचा दावा करणाºया सत्ताधारी मंडळींनी रस्ते, पाणी, स्वच्छता या मुलभूत सुविधा तरी पुरेशा प्रमाणात दिल्या आहेत काय? सत्तेतील पक्ष बदलला असला तरी चेहरे तेच असल्याने बदल काय झाला?

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव