शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
5
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
6
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
7
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
8
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
9
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
10
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
12
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
13
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
14
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
15
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
16
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
17
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
18
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
19
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

जिल्हा परिषदेत चाललेय तरी काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 13:42 IST

विकास पाटीलजिल्हा परिषदेत चाललेय तरी काय? अशी म्हणण्याची वेळ सध्या आली आहे. कधी शालेय पोषण आहारातील गैरव्यवहारामुळे जिल्हा परिषदेतील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर येतो तर कधी शालेय गणवेश, बोगस अपंग युनिट, पॉलिमर बेंचेसचा घोळ चर्चेला येतो. एकापाठोपाठ अनेक प्रकरणे जिल्हा परिषदेत समोर येत असल्याने सत्ताधाऱ्यांचा अंकुश नसल्याचे सिद्ध होत आहे.वास्तविक जि.प.त ...

विकास पाटीलजिल्हा परिषदेत चाललेय तरी काय? अशी म्हणण्याची वेळ सध्या आली आहे. कधी शालेय पोषण आहारातील गैरव्यवहारामुळे जिल्हा परिषदेतील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर येतो तर कधी शालेय गणवेश, बोगस अपंग युनिट, पॉलिमर बेंचेसचा घोळ चर्चेला येतो. एकापाठोपाठ अनेक प्रकरणे जिल्हा परिषदेत समोर येत असल्याने सत्ताधाऱ्यांचा अंकुश नसल्याचे सिद्ध होत आहे.वास्तविक जि.प.त भाजपाची एकहाती सत्ता आहे. विशेष म्हणजे भाजपा चौथ्यांदा सत्तेवर आली आहे. कामे करण्याचा दीर्घ अनुभव आहे, असे असतानाही ना सर्वसामान्यांची कामे होताना दिसत आहे ना ग्रामीण भागाचा विकास. एखादी निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर आरोप झाला नाही, असे कधी होताना दिसत नाही. सर्वसामान्य जनता तर दूरच जिल्हा परिषद सदस्य, सभापतीच एकमेकांवर आरोप करताना दिसतात.आपल्या मर्जीतील ठेकेदाराला, व्यक्तीला काम मिळावे यासाठी काही मंडळींचा आटापिटा असतो. यात सर्वसामान्य माणूस मात्र नाहक भरडला जात आहे. ग्रामीण भागातील जनतेला केंद्र व राज्यशासनाचा थेट निधी मिळावा यासाठी मोठ्या प्रमाणात निधी स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळू लागला आहे.या निधीचा विनियोग योग्यरित्या झाला पाहिजे, यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही. सत्ताधाºयांनी प्रशासनाकडून ही कामे व्यवस्थितरित्या करून घेतली पाहिजे. त्यासाठी आग्रह धरला पाहिजे. मात्र सत्ताधारीच गप्प राहिले तर कामे कशी होणार? गैरव्यवहार करणाºयांविरुद्ध गुन्हे कधी दाखल होणार? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. जिल्हा परिषदेला शासन व जिल्हा नियोजन मंडळाकडून मिळालेला निधी पडून असतो. तो खर्च करण्याबाबत कुणी आग्रही असताना दिसत नाही.गेल्या काही महिन्यांपूर्वी बोगस अपंग युनिटप्रकरण समोर आले. यात मोठा गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. याप्रकरणी आपल्या शेजारच्या नंदुरबार जिल्ह्यात गुन्हे दाखल झाले; मात्र जळगावात अद्यापही कागदी घोडेच नाचविले जात आहे. जिल्हा परिषदेचे अधिकारी म्हणतात आम्ही पोलिसांना आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे दिली. आता गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. कागदपत्रे सादर होऊन आठवडा उलटला तरी पोलीस गुन्हे दाखल करण्यास तयार नाही. याबाबत ना जिल्हा परिषद सदस्यांना चिंता आहे ना प्रशासनाला. हे प्रकरण थंडबस्त्यात पडल्यानंतर आता पॉलिमर बेंच व बुरशीयुक्त शेवयांचे प्रकरण समोर आले आहे. काही दिवस या दोन्ही मुद्यांवरून चर्चा सुरू राहिल. प्रशासनाने बुरशीयुक्त शेवया प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. शालेय पोषण आहार, गणवेश प्रकरण, पाणीपुरवठा योजनांमध्ये आतापर्यंत जे झाले तेच या प्रकरणांमध्येही होईल, हे सांगण्यासाठी कुण्या ज्योतिषाची आवश्यकता नाही.

टॅग्स :zpजिल्हा परिषदJalgaonजळगाव