शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

‘पायाभूत’चे ‘भूत’ आॅगस्टमध्ये कशासाठी?, अभ्यासकांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 12:49 IST

मंगळवारपासून परीक्षा

ठळक मुद्देक्षमता समजण्यासाठी चाचणीचाचणीच्या निकालाबाबत साशंकता

विलास बारीजळगाव : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत २८ ते ३१ आॅगस्ट दरम्यान इयत्ता २ री ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी पायाभूत चाचणी होत आहे. जून महिन्यात होणारी ही चाचणी यावेळी आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याचे शासनाचे प्रयोजन काय? असा सवाल अभ्यासकांकडून उपस्थित होत आहे.महाराष्ट्र विद्या प्राधिकरण, पुणे तर्फे गेल्या तीन वर्षांपासून इयत्ता २ री ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी पायाभूत चाचणी परीक्षा घेतली जात आहे.क्षमता समजण्यासाठी चाचणीपायाभूत चाचणी ही मागील वर्गांच्या मुलभूत क्षमतांवर आधारित असते. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांची क्षमता लक्षात यावी. तसेच त्यांच्यातील प्रगत व अप्रगत विद्यार्थ्यांची संख्या किती आहे. विद्यार्थ्यांना मराठी, गणित, इंग्रजी हे विषय शिकविले जावे हा उद्देश आहे. सुरुवातीला जून महिन्याच्या अखेर ही चाचणी घेण्यात येत होती. मात्र यावर्षी ही चाचणी आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात होत आहे.चाचणीच्या निकालाबाबत साशंकताप्रायोगिक तत्वावर प्रथम भाषा व गणित या दोन विषयांच्या वर्षभरात तीन शैक्षणिक प्रगत चाचण्या घेण्याचे २२ जून रोजी काढलेल्या शासन निर्णयात नमूद केले होते. त्यानुसार २०१६/१७ मध्ये २८ व २९ जुलै दरम्यान घेतली होती. आता जून ऐवजी पहिल्यांदाच ही चाचणी आॅगस्टमध्ये घेण्यात येत आहे. हे होत असताना या चाचणीच्या निकालाचे कोणतेही विश्लेषण मात्र होत नाही. तसेच अप्रगत विद्यार्थ्यांना ‘प्रगत’ करण्यासाठी शाळांनी कोणते उपाय केले याबाबतची माहित समोर येत नाही, असे शिक्षणक्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे.वाचता न येणारे विद्यार्थी प्रश्न कसे सोडविणार?पायाभूत चाचणीच्या दर्जाबाबतदेखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. सेमी इंग्रजीमध्ये प्रवेश घेतलेल्या काही विद्यार्थ्यांना इंग्रजी व मराठी या विषयाचे प्रश्न वाचता येत नाही. अशा विद्यार्थ्यांना ही प्रश्नपत्रिका सोडविणे अवघड होत आहे. त्यात या विद्यार्थ्यांना सर्व प्रश्न मराठी भाषेतून समजावून सांगत सोडवून दाखावे लागतात. ‘चित्र पहा, त्यावर गोष्ट लिहा’ या प्रश्नासाठी ५ गुण देण्यात आलेले असतात. मात्र इयत्ता २ री ते ४ थीच्या विद्यार्थ्यांना चित्रवाचन जमत नसल्याने अनेक शाळांकडून तयार उत्तर विद्यार्थ्यांना द्यावे लागत असते.अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक संपल्यानंतर वर्गातल्या वर्गात १० गुणांची परीक्षा घटक चाचणी स्वरुपात घेतली जाते. आज तो अर्थ पूर्णपणे विसरत शिक्षण विभाग पायाभूत चाचणी घेत आहे. ही बाब चिंताजनक आहे.-चंद्रकांत भंडारी, शिक्षणतज्ज्ञ

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव