शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभागाचे काय चाललेय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 14:03 IST

शिक्षण विभागाच्या कारभाराचा  बट्ट्याबोळ विकासाच्या गाड्याला महत्त्वाचा हातभार असलेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या कारभाराचा अगदीच बट्ट्याबोळ झाल्याची असंख्य उदाहरणे ...

शिक्षण विभागाच्या कारभाराचा  बट्ट्याबोळ

विकासाच्या गाड्याला महत्त्वाचा हातभार असलेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या कारभाराचा अगदीच बट्ट्याबोळ झाल्याची असंख्य उदाहरणे नेहमीच सर्वांच्या कानावर येत आहे़. शालेय पोषण आहार गैरव्यवहाराच्या फाईलचा प्रवास दोन वर्षांपासून अभिप्राय, अहवाल, खुलासा यातच अडकून पडलेला असताना पदोन्नत्या नसताना शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्याने निर्माण झालेल्या घोळात प्रक्रियाच स्थगित करण्याची नामूष्की विभागावर ओढावली आहे़एक चालक दोन गाड्या चालवू शकत नाही, हे साधारण गणित सर्वांना श्रृत आहे मात्र, असे असतानाही ही रिस्क जर घेतली तर अपघात निश्चितच तसाच काहीसा प्रकार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सुरू आहे़़ शालेय पोषण आहार हा विद्यार्थ्यांचा शाळेकडे ओढा वाढावा त्यांना योग्य पोषण मिळून त्यांचे आरोग्यही सुदृढ राहावे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर सुरू करण्यात आलेला आहे़ मात्र, या पोषण आहारात विद्यार्थी दुरच पुरवठा करणाऱ्यांचे चांगल्या प्रमाणात पोषण होऊन प्रशासकीय यंत्रणाच त्यांच्या दावणीला बांधली गेल्याचे चित्र वांरवारचे आरोप व गैरव्यवहाराच्या प्रकारामुळे समोर येत आहे़ यावर अंकुश न घातल्यास पोषण आहार शोषण आहार म्हणून समोर यायला वेळ लागणार नाही़जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी गेल्या आठवड्यांपासून जिल्ह्यातील गांवामध्ये अचानक भेटी देण्याची मोहीम हाती घेतली आहे़ त्यांनी अनेक शाळांना भेटी दिल्या़ काही शाळांमध्ये समोर आलेले धक्कादायक प्रकार म्हणजे शिक्षण विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षाचे द्योतक आहे़ आमदार हरिभाऊ जावळे यांच्या भालोद या गावात शिक्षक दोन विद्यार्थी दहा हा गंभीर प्रकार समोर येतो व गेल्या पाच वर्षांपासून हीच स्थिती आहे, असे जेव्हा शिक्षक सांगतात तेव्हा शिक्षण विभागाच्या या कारभारावर डोक्यावर हात मारून घेण्याशिवाय कुठला पर्याय उरतो़़ एकिकडे आपण जिल्हा परिषद शाळांकडे पाच हजार विद्यार्थी वळविल्याचे सांगतो, शाळा डिजिटल केल्याचा गवगवा केला जातो़ मात्र हा कागदांचा खेळ व स्थानिक वास्तव यातील विरोधाभास किती हे शाळेत पोहचल्यावरच कळते़ मोहीम हाती घेतली जाते, चौकशीचे आदेश दिले जातात, कागदाचां खेळ सुरू होतो व तो कागदांवरच थांबतो़ विद्यार्थी विकासाच्या दृष्टीने या कागदांपलिकडे कुठलेही ठोस पावले उचलताना शिक्षण विभाग दिसत नाही, असे असताना खासगी शाळांना दोष देऊन चालणार कसे, जर जिल्हा परिषद शाळांची परिस्थितीत व वातावरण शिक्षणाला पोषक नसेल तर पालकांना आग्रह कसा करायचा कि पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत टाका़ याकडे वेळीच लक्ष न दिल्यास शैक्षणिकदृष्ट्या जिल्ह्याच्या विकासावर मोठा परिणाम होण्याची गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे़

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाJalgaonजळगाव