शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभागाचे काय चाललेय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 14:03 IST

शिक्षण विभागाच्या कारभाराचा  बट्ट्याबोळ विकासाच्या गाड्याला महत्त्वाचा हातभार असलेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या कारभाराचा अगदीच बट्ट्याबोळ झाल्याची असंख्य उदाहरणे ...

शिक्षण विभागाच्या कारभाराचा  बट्ट्याबोळ

विकासाच्या गाड्याला महत्त्वाचा हातभार असलेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या कारभाराचा अगदीच बट्ट्याबोळ झाल्याची असंख्य उदाहरणे नेहमीच सर्वांच्या कानावर येत आहे़. शालेय पोषण आहार गैरव्यवहाराच्या फाईलचा प्रवास दोन वर्षांपासून अभिप्राय, अहवाल, खुलासा यातच अडकून पडलेला असताना पदोन्नत्या नसताना शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्याने निर्माण झालेल्या घोळात प्रक्रियाच स्थगित करण्याची नामूष्की विभागावर ओढावली आहे़एक चालक दोन गाड्या चालवू शकत नाही, हे साधारण गणित सर्वांना श्रृत आहे मात्र, असे असतानाही ही रिस्क जर घेतली तर अपघात निश्चितच तसाच काहीसा प्रकार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सुरू आहे़़ शालेय पोषण आहार हा विद्यार्थ्यांचा शाळेकडे ओढा वाढावा त्यांना योग्य पोषण मिळून त्यांचे आरोग्यही सुदृढ राहावे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर सुरू करण्यात आलेला आहे़ मात्र, या पोषण आहारात विद्यार्थी दुरच पुरवठा करणाऱ्यांचे चांगल्या प्रमाणात पोषण होऊन प्रशासकीय यंत्रणाच त्यांच्या दावणीला बांधली गेल्याचे चित्र वांरवारचे आरोप व गैरव्यवहाराच्या प्रकारामुळे समोर येत आहे़ यावर अंकुश न घातल्यास पोषण आहार शोषण आहार म्हणून समोर यायला वेळ लागणार नाही़जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी गेल्या आठवड्यांपासून जिल्ह्यातील गांवामध्ये अचानक भेटी देण्याची मोहीम हाती घेतली आहे़ त्यांनी अनेक शाळांना भेटी दिल्या़ काही शाळांमध्ये समोर आलेले धक्कादायक प्रकार म्हणजे शिक्षण विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षाचे द्योतक आहे़ आमदार हरिभाऊ जावळे यांच्या भालोद या गावात शिक्षक दोन विद्यार्थी दहा हा गंभीर प्रकार समोर येतो व गेल्या पाच वर्षांपासून हीच स्थिती आहे, असे जेव्हा शिक्षक सांगतात तेव्हा शिक्षण विभागाच्या या कारभारावर डोक्यावर हात मारून घेण्याशिवाय कुठला पर्याय उरतो़़ एकिकडे आपण जिल्हा परिषद शाळांकडे पाच हजार विद्यार्थी वळविल्याचे सांगतो, शाळा डिजिटल केल्याचा गवगवा केला जातो़ मात्र हा कागदांचा खेळ व स्थानिक वास्तव यातील विरोधाभास किती हे शाळेत पोहचल्यावरच कळते़ मोहीम हाती घेतली जाते, चौकशीचे आदेश दिले जातात, कागदाचां खेळ सुरू होतो व तो कागदांवरच थांबतो़ विद्यार्थी विकासाच्या दृष्टीने या कागदांपलिकडे कुठलेही ठोस पावले उचलताना शिक्षण विभाग दिसत नाही, असे असताना खासगी शाळांना दोष देऊन चालणार कसे, जर जिल्हा परिषद शाळांची परिस्थितीत व वातावरण शिक्षणाला पोषक नसेल तर पालकांना आग्रह कसा करायचा कि पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत टाका़ याकडे वेळीच लक्ष न दिल्यास शैक्षणिकदृष्ट्या जिल्ह्याच्या विकासावर मोठा परिणाम होण्याची गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे़

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाJalgaonजळगाव