शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

चिरंजीव काय करतो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 17:54 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘सहज सुचलं म्हणून’ या सदरात साहित्यिक प्रा.डॉ.फुला बागुल यांनी लिहिलेलं खुसखुशीत...

परवा लग्नाच्या पंगतीत एकाने विचारले, सर, तुमचा चिरंजीव का? मी म्हटले हो. काय करतोय? मी म्हटले बारावी झालीय. मग पुढे काय ठरवलंय. मी म्हटले, काही नाही. व्यवसायात वळवायचंय. त्यांना प्रचंड आश्चर्य वाटले. प्राध्यापकाचा पोरगा. हुशार, गुणवंत, मेडिकल, फार्मसी, आयआयटी असं काहीतरी उत्तर त्यांना अपेक्षित होतं.काही वर्षांपूर्वी आमच्या शहरात नवीनच आयटी पॉर्इंट म्हणून एक फॅड सुरू झालं. या पॉर्इंटमध्ये नामांकित आयआयटीचे प्राध्यापक शिकवायला येणार, भरपूर सराव परीक्षा होणार. कोटा येथे मिळणारे शिक्षण गावातच मिळणार, पोरं आयआयटीयन्स होतील. अमूक पॅकेज मिळवतील. गाजावाजा, प्रसिद्धी खूप झाली. पालक भुलले. कर्ज काढून शुल्क भरले. स्वप्ने रंगवली गेली. आम्हालाही पाल्य येथेच टाका म्हणून सांगितलं गेलं. दिशा निश्चित असल्याने आम्ही त्यांच्या नादी लागलो नाही. या व्यवस्थेतून आजवर कुणी आयआयटीला प्रवेशपात्र झाला नाही. शहरात प्रथम येऊनही मी माझा पाल्य या पॉर्इंटला टाकला नाही म्हणून प्रचंड आश्चर्य वाटणाऱ्यांनी पाहून घेतले. काही तर या पॉर्इंटला पाल्याचे अ‍ॅडमिशन न घेऊन पाल्याचे भविष्य खराब करता आहात, असा अभिप्राय व्यक्त करून गेले.क्लासेस, खासगी शिक्षण संस्थांचे असे पॉर्इंटस् या समांतर व्यवस्थेने पालकांना गांगरून सोडले आहे. या व्यवस्थेने पालकांना अशी भीती अप्रत्यक्षपणे दाखविली आहे की, आमचा क्लास तुम्ही जॉईन केला नाही तर तुमच्या पाल्याला भवितव्यच नाही. त्याला गवंड्यांच्या हाताखाली कामाला जावे लागेन. तुम्ही जागरूक पालक आहात ना? अशा शीर्षकाची हस्तपत्रिका वाटून पालकांवर दबाव आणला जातो.खरे तर पालकांनीच विवेकी होण्याची गरज आहे. युपीएससीसारख्या परीक्षेत प्रथम येणाºया मुलांना ४५ ते ५५ टक्के एवढेच गुण मिळतात. हे सर्व टॉपर्स पाठ्यपुस्तकांचाच अभ्यास करतात. संबोध आणि आकलनावर भर देतात. स्वयंअध्ययन करतात. नोटस् स्वत: काढतात. सराव परीक्षा देतात. यशाचा राजमार्ग तो हाच, असे पॉर्इंटस्, क्रॅश कोर्सेस, रेडिमेड गाईडस्, क्लासेस हा भूलभुलैय्या आहे. पालकांना दरिद्री करण्याचं हे षङ्यंत्र आहे.बरे, मुलांनी चांगले गुण मिळविल्यानंतरही व्यवसायाकडे का वळू नये? नोकरी श्रेष्ठ ही मानसिकता मध्यमवर्गीयांनी सोडून देण्याची गरज आहे. उद्योग व्यवसायाकडे आता या वर्गाने जाणीवपूर्वक वळायला हवे. बी.फॉर्मसी, बी.टेक, एम.फॉर्मसी, एम.टेक हे पदवीधारक १५-२० हजारांवर दिवसाचे १२-१४ तास खासगी कंपन्यांमधून राबत आहेत. त्यांच्यापेक्षा दहावी, बारावी झालेला प्लंबर, वायरमन, गॅरेज कारागीर जास्त आणि सन्मानाने पैसे मिळवितो. देशाला जिल्हाधिकाºयांची जशी गरज आहे तशीच ती एखाद्या प्लंबरचीदेखील आहे. ज्या क्षेत्रात सर्जनशीलतेला वाव नाही, यंत्रवत जीवनशैली आहे, वरिष्ठांचा जाच आहे, वैयक्तिक छंद जोपासायला अडचणी आहेत अशा क्षेत्रात जाणे म्हणजे विकार जडवून घेणे आहे.पूर्वी पालकांना मुलांच्या शिक्षणाचीच काय ती फिकीर असायची. आता पाल्यांचे शिक्षण-नोकरी-छोकरी अशी तिहेरी फिकीर आहे. पस्तीशीची बाळं पालकांना पोसावी लागत आहे. वधूपित्यांना नोकरी करणाराच वर हवा आहे, ही स्थिती भयावह आहे. आता यापुढे शासकीय नोकºया कमी होत जाणार. प्रश्न अजून बिकट होणार. तेव्हा खºया अर्थाने सुजाण असणाºया पालकांनी व्यवसायाच्या अंगाने पाल्यांची महत्त्वाकांक्षा रुजवली व वाढवली पाहिजे. अमूक एखादा उद्योगपती फॅक्टरी सुरू करेल. त्या फॅक्टरीत माझ्या मुलाला रोजगार मिळेल या मानसिकतेऐवजी माझा मुलगाच फॅक्टरी टाकेल, असा आशावाद जागवण्याची वेळ येऊन ठेपली आहे.मालक होण्याची मानसिकता रुजविण्याची गरज आहे. दीडशे वर्षे इंग्रजांच्या अखत्यारीत आपण गुलामीचे संस्कार पचविले. वस्तुत: आपला देश हा राज्यकर्त्यांचा देश, पण परिस्थितीला शरण जाण्याची मानसिकता आपण जोपासत गेलो. त्यामुळे धाडसी मानसिकता घडविण्याची गरज आहे.-प्रा.डॉ.फुला बागुल, शिरपूर

टॅग्स :literatureसाहित्यShirpurशिरपूर