शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कसं विपरित झालं सारं, होता सोन्याचा संसार...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 21:59 IST

ममुराबाद परिसर : कापसासह धान्य काळवंडले, डोक्यावरील कर्जाचा भार हलका होण्याचे स्वप्न धुळीस

सौरभ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कममुराबाद, ता. जळगाव :कशी काळाची चाहुल आली ।बाग सुखाची करपून गेली ।।कसं विपरीत झालं सारं।होता सोन्याचा संसार...।।रक्ताचे पाणी करून शेतात उभा केलेला खरीप हंगाम डोळ्यादेखत वाया गेल्यानंतर परिसरातील प्रत्येक शेतकऱ्याची अवस्था आज वरील गाण्याच्या पक्तींप्रमाणे झाली आहे. सततच्या पावसामुळे क्षणात होत्याचे नव्हते झाल्याने डोळ्यासमोर अंधार पसरलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भरीव मदत देण्याची मागणी त्यामुळे आता होत आहे.ममुराबाद भागातील शेतकरी खरिपात प्रामुख्याने कापसाचे पीक घेतात. त्यातही पूर्वहंगामी उन्हाळी कापसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असते. चांगल्या उत्पादनाच्या आशेने ४४ अंश सेल्सिअस तापमान तसेच भारनियमनावर मात करीत कपाशीचे पीक जगविण्यासाठी जीवाचा आटापिटा करणाºया शेतकºयांसाठी कापूस म्हणजे पांढरे सोनेच. कापसाचे पीक हाती आल्यानंतरच खºया अथार्ने शेतकºयाच्या घरात दसरा- दिवाळी साजरी होते. डोक्यावरील कजार्चा भार थोडासा का होईना पण हलका झाल्याने चिंता मिटते. दुदैर्वाने यंदा दिवाळीच्या सणाला कोणत्याच शेतकºयाचा घरात पांढºया सोन्याने आगमन झाले नाही. सततच्या पावसामुळे पांढरे सोने घरात येण्यापूर्वीच काळवंडले. वेचणी बाकी राहिलेल्या कापसातील सरकीला झाडावरच कोंब फुटले. बुरशीचा प्रादुर्भाव वाढल्याने नवीन बहर सुद्धा सडल्याने गळून पडला.फुलपात्यांची गळ सुरुआता पाऊस थांबलेला असला तरी नवीन फुलपात्यांची गळ मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. त्यामुळे आगामी काळात कपाशीपासून फार काही उत्पन्न मिळण्याची आशा मावळली आहे. कापसापासून निराशा झाल्यानंतर डोक्यावरील कर्ज फेडावे तरी कसे, या विवंचनेत शेतकरी येणारा दिवस ढकलत आहे. दरम्यान, लाल्याची विकृती वाढल्यामुळे हिरवीगार कपाशी रात्रीतून पिवळी पडण्याचे प्रकार आता सुरू झाले आहेत.दिवाळीच्या मोसमावर एकरी किमान पाच ते सात क्विंटलपर्यंत कापूस उत्पादन घेणाºया शेतकºयांच्या घरात यंदा पावसामुळे अतोनात नुकसान झाल्याने एकरी अर्धा क्विंटलचेही उत्पादन आलेले नाही. त्याचा विचार करून प्रतिहेक्टरी आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी त्यामुळे होत आहे.रब्बी हंगाम लांबणीवरसततच्या पावसामुळे खरिपाची काढणी लांबणीवर पडल्याने रब्बीच्या पेरण्यांनाही यंदा मोठा विलंब झाला आहे. जमिनीचा वापसा संपल्याने पेरणीपूर्व मशागतीसह अनेक कामे रखडली आहेत. रब्बीच्या पेरण्यांना आणखी उशीर झाल्यास दादर ज्वारीसह हरभरा पिकाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.कडब्याचे नुकसानजनावरांसाठी कोरड्या वैरणीची व्यवस्था करण्यासाठी अनेक शेतकरी खरिपात संकरीत ज्वारीची पेरणी करीत असतात. यंदा सतत पाऊस सुरू असल्याच्या स्थितीत ज्वारीचे पीक वाया गेल्याने वैरणीसाठी उपलब्ध होणारा कडबा काळा पडला आहे. सोयाबीनच्या काढणीनंतर मिळणारे कुटार पण वाया गेले आहे. त्यामुळे जनावरांसाठी चारा आणावा कुठून, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव