शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

कसं विपरित झालं सारं, होता सोन्याचा संसार...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 21:59 IST

ममुराबाद परिसर : कापसासह धान्य काळवंडले, डोक्यावरील कर्जाचा भार हलका होण्याचे स्वप्न धुळीस

सौरभ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कममुराबाद, ता. जळगाव :कशी काळाची चाहुल आली ।बाग सुखाची करपून गेली ।।कसं विपरीत झालं सारं।होता सोन्याचा संसार...।।रक्ताचे पाणी करून शेतात उभा केलेला खरीप हंगाम डोळ्यादेखत वाया गेल्यानंतर परिसरातील प्रत्येक शेतकऱ्याची अवस्था आज वरील गाण्याच्या पक्तींप्रमाणे झाली आहे. सततच्या पावसामुळे क्षणात होत्याचे नव्हते झाल्याने डोळ्यासमोर अंधार पसरलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भरीव मदत देण्याची मागणी त्यामुळे आता होत आहे.ममुराबाद भागातील शेतकरी खरिपात प्रामुख्याने कापसाचे पीक घेतात. त्यातही पूर्वहंगामी उन्हाळी कापसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असते. चांगल्या उत्पादनाच्या आशेने ४४ अंश सेल्सिअस तापमान तसेच भारनियमनावर मात करीत कपाशीचे पीक जगविण्यासाठी जीवाचा आटापिटा करणाºया शेतकºयांसाठी कापूस म्हणजे पांढरे सोनेच. कापसाचे पीक हाती आल्यानंतरच खºया अथार्ने शेतकºयाच्या घरात दसरा- दिवाळी साजरी होते. डोक्यावरील कजार्चा भार थोडासा का होईना पण हलका झाल्याने चिंता मिटते. दुदैर्वाने यंदा दिवाळीच्या सणाला कोणत्याच शेतकºयाचा घरात पांढºया सोन्याने आगमन झाले नाही. सततच्या पावसामुळे पांढरे सोने घरात येण्यापूर्वीच काळवंडले. वेचणी बाकी राहिलेल्या कापसातील सरकीला झाडावरच कोंब फुटले. बुरशीचा प्रादुर्भाव वाढल्याने नवीन बहर सुद्धा सडल्याने गळून पडला.फुलपात्यांची गळ सुरुआता पाऊस थांबलेला असला तरी नवीन फुलपात्यांची गळ मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. त्यामुळे आगामी काळात कपाशीपासून फार काही उत्पन्न मिळण्याची आशा मावळली आहे. कापसापासून निराशा झाल्यानंतर डोक्यावरील कर्ज फेडावे तरी कसे, या विवंचनेत शेतकरी येणारा दिवस ढकलत आहे. दरम्यान, लाल्याची विकृती वाढल्यामुळे हिरवीगार कपाशी रात्रीतून पिवळी पडण्याचे प्रकार आता सुरू झाले आहेत.दिवाळीच्या मोसमावर एकरी किमान पाच ते सात क्विंटलपर्यंत कापूस उत्पादन घेणाºया शेतकºयांच्या घरात यंदा पावसामुळे अतोनात नुकसान झाल्याने एकरी अर्धा क्विंटलचेही उत्पादन आलेले नाही. त्याचा विचार करून प्रतिहेक्टरी आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी त्यामुळे होत आहे.रब्बी हंगाम लांबणीवरसततच्या पावसामुळे खरिपाची काढणी लांबणीवर पडल्याने रब्बीच्या पेरण्यांनाही यंदा मोठा विलंब झाला आहे. जमिनीचा वापसा संपल्याने पेरणीपूर्व मशागतीसह अनेक कामे रखडली आहेत. रब्बीच्या पेरण्यांना आणखी उशीर झाल्यास दादर ज्वारीसह हरभरा पिकाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.कडब्याचे नुकसानजनावरांसाठी कोरड्या वैरणीची व्यवस्था करण्यासाठी अनेक शेतकरी खरिपात संकरीत ज्वारीची पेरणी करीत असतात. यंदा सतत पाऊस सुरू असल्याच्या स्थितीत ज्वारीचे पीक वाया गेल्याने वैरणीसाठी उपलब्ध होणारा कडबा काळा पडला आहे. सोयाबीनच्या काढणीनंतर मिळणारे कुटार पण वाया गेले आहे. त्यामुळे जनावरांसाठी चारा आणावा कुठून, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव