शहरं
Join us  
Trending Stories
1
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
2
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
3
भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी
4
चांदीची किंमत का वाढतेय? कुठे-कुठे होतोय वापर? बनली जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचा कणा
5
अपेक्षित गॅस गेला कुठे? सरकारने मागितली २.७९ लाख कोटींची भरपाई
6
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
7
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
8
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
9
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
10
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
11
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
12
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
13
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
14
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
15
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
16
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
17
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
18
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
19
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
20
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
Daily Top 2Weekly Top 5

कलम १८८ म्हणजे काय रे भाऊ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:12 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात पोलिसांकडून कारवाई जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साथरोग प्रतिबंधक कायदा १९८७ मधील तरतुदीनुसार दिलेल्या आदेशाची पायमल्ली ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात पोलिसांकडून कारवाई

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साथरोग प्रतिबंधक कायदा १९८७ मधील तरतुदीनुसार दिलेल्या आदेशाची पायमल्ली करणाऱ्यांविरुद्ध जळगाव जिल्ह्यात लॉकडाऊन काळात कलम १८८ अन्वये ३२१ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. याच काळात नियमांचे उल्लंघन केले म्हणून ११६२ वाहनेही जप्त करण्यात आलेली आहेत. दाखल गुन्ह्यांची प्रकरणे न्यायालयात पाठविण्यात आलेली आहेत.

राज्यात १४ मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ लागू करण्यात आला असून, खंड २,३ व ४ मधील तरतुदीनुसार त्याची अंमलबजावणी करण्यात आली. या काळात विनामास्क फिरणाऱ्या ४२ हजार जणांवर पोलिसांनी कारवाई केली असून, त्यांच्याकडून १ कोटी ९ लाख ३४ हजार १०५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, कारण नसताना रस्त्यावर फिरणे, तोंडाला मास्क किंवा रुमाल न लावणे या साधारण नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जात आहे. नागरिकांनी स्वत:च्या व जनतेच्या सुरक्षेसाठी बाहेर न फिरता घरातच राहणे अपेक्षित असून, त्याबाबत वारंवार सूचना व आवाहन करूनही त्यात फारसा फरक न पडल्याने आता पोलिसांनी थेट कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करून वाहने जप्त करण्याचा निर्णय घेतला.

जिल्ह्यात दाखल गुन्हे : ३२१

वाहन जप्त : ११६२

दंड वसुली (विनामास्क) : १,०९,३४,१०५

काय आहे कलम १८८

एखाद्या आजाराची साथ पसरली असेल व ती ससंर्गजन्य आहे, एका व्यक्तीपासून अनेक व्यक्ती बाधित होऊ शकतात, अशा वेळी भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ व भादंवि कलम १८८ हा कायदा लागू होतो. भारतीय दंड संहिता १८६० (४५) चे कलम १८८, राष्टीय व्यवस्थापन कायदा -२००५ मधील कलम ५१ ते ६० फौजदारी दंड संहिता १९७३ मधील तरतुदीनुसार शिक्षा होऊ शकते. गुन्हा अदखलपात्र व जामीनपात्र आहे. यात अटकेची गरज नाही, न्यायालयात प्रकरण पाठविले जाते.

तीन ते पाच हजार दंड व कोर्ट उठेपर्यंत शिक्षा

कोरोना विषाणूचा संसर्ग व वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता राबविण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा भाग म्हणून लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे . शासनाच्या आदेशाने पालन न करणाऱ्यांविरुद्ध भादंवि कलम १८८ ,राष्टीय व्यवस्थापन कायदा -२००५ व भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ कलमान्वये गुन्हे दाखल केले जातात. यात तीन ते पाच हजार रुपये दंडाची तरतूद आहे. अशाच प्रकरणात चाळीसगाव न्यायालयाने आदेशाचे उल्लंघन करणार्‍या १३ जणांना कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व ३ ते ५ हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला आहे.

कोट..

स्वत:च्या व जनतेच्या हितासाठी नागरिकांनी नियम पाळून घरातच थांबणे अपेक्षित होते व आहे. पोलीस स्वत:चा जीव धोक्यात घालून रस्त्यावर उतरले. आरोग्य यंत्रणा त्यांच्या पातळीवर कार्य करते आहे. लोकांच्याच हितासाठी लॉकडाऊन आहे. वारंवार सूचना व आदेश काढूनही त्याची अंमलबजावणी न करणाऱ्यांविरुद्ध कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. आतादेखील निर्बंध लागू असून, नागरिकांनी कारवाईची वेळ येऊ न देता आदेशाचे पालन करावे हीच अपेक्षा आहे.

- डॉ. प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक