शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

कलम १८८ म्हणजे काय रे भाऊ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:12 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात पोलिसांकडून कारवाई जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साथरोग प्रतिबंधक कायदा १९८७ मधील तरतुदीनुसार दिलेल्या आदेशाची पायमल्ली ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात पोलिसांकडून कारवाई

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साथरोग प्रतिबंधक कायदा १९८७ मधील तरतुदीनुसार दिलेल्या आदेशाची पायमल्ली करणाऱ्यांविरुद्ध जळगाव जिल्ह्यात लॉकडाऊन काळात कलम १८८ अन्वये ३२१ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. याच काळात नियमांचे उल्लंघन केले म्हणून ११६२ वाहनेही जप्त करण्यात आलेली आहेत. दाखल गुन्ह्यांची प्रकरणे न्यायालयात पाठविण्यात आलेली आहेत.

राज्यात १४ मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ लागू करण्यात आला असून, खंड २,३ व ४ मधील तरतुदीनुसार त्याची अंमलबजावणी करण्यात आली. या काळात विनामास्क फिरणाऱ्या ४२ हजार जणांवर पोलिसांनी कारवाई केली असून, त्यांच्याकडून १ कोटी ९ लाख ३४ हजार १०५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, कारण नसताना रस्त्यावर फिरणे, तोंडाला मास्क किंवा रुमाल न लावणे या साधारण नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जात आहे. नागरिकांनी स्वत:च्या व जनतेच्या सुरक्षेसाठी बाहेर न फिरता घरातच राहणे अपेक्षित असून, त्याबाबत वारंवार सूचना व आवाहन करूनही त्यात फारसा फरक न पडल्याने आता पोलिसांनी थेट कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करून वाहने जप्त करण्याचा निर्णय घेतला.

जिल्ह्यात दाखल गुन्हे : ३२१

वाहन जप्त : ११६२

दंड वसुली (विनामास्क) : १,०९,३४,१०५

काय आहे कलम १८८

एखाद्या आजाराची साथ पसरली असेल व ती ससंर्गजन्य आहे, एका व्यक्तीपासून अनेक व्यक्ती बाधित होऊ शकतात, अशा वेळी भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ व भादंवि कलम १८८ हा कायदा लागू होतो. भारतीय दंड संहिता १८६० (४५) चे कलम १८८, राष्टीय व्यवस्थापन कायदा -२००५ मधील कलम ५१ ते ६० फौजदारी दंड संहिता १९७३ मधील तरतुदीनुसार शिक्षा होऊ शकते. गुन्हा अदखलपात्र व जामीनपात्र आहे. यात अटकेची गरज नाही, न्यायालयात प्रकरण पाठविले जाते.

तीन ते पाच हजार दंड व कोर्ट उठेपर्यंत शिक्षा

कोरोना विषाणूचा संसर्ग व वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता राबविण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा भाग म्हणून लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे . शासनाच्या आदेशाने पालन न करणाऱ्यांविरुद्ध भादंवि कलम १८८ ,राष्टीय व्यवस्थापन कायदा -२००५ व भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ कलमान्वये गुन्हे दाखल केले जातात. यात तीन ते पाच हजार रुपये दंडाची तरतूद आहे. अशाच प्रकरणात चाळीसगाव न्यायालयाने आदेशाचे उल्लंघन करणार्‍या १३ जणांना कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व ३ ते ५ हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला आहे.

कोट..

स्वत:च्या व जनतेच्या हितासाठी नागरिकांनी नियम पाळून घरातच थांबणे अपेक्षित होते व आहे. पोलीस स्वत:चा जीव धोक्यात घालून रस्त्यावर उतरले. आरोग्य यंत्रणा त्यांच्या पातळीवर कार्य करते आहे. लोकांच्याच हितासाठी लॉकडाऊन आहे. वारंवार सूचना व आदेश काढूनही त्याची अंमलबजावणी न करणाऱ्यांविरुद्ध कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. आतादेखील निर्बंध लागू असून, नागरिकांनी कारवाईची वेळ येऊ न देता आदेशाचे पालन करावे हीच अपेक्षा आहे.

- डॉ. प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक