शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांच्या उदरभरणासाठी शिवभोजन थाळींचे उद्दीष्ट वाढवू - जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 12:29 IST

लॉक डाऊनमुळे रोजगार बुडणाऱ्यांनाही मिळेल अन्न

जळगाव : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे दैनंदिन कामकाजावरच अवलंबून असणाऱ्यांचा रोजगार बुडत असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच अनेकांना जेवण मिळण्यात अडचणी येत आहे, अशा मंडळींना जेवण मिळण्यासाठी सामाजिक संस्थाची मदत घ्यावी तसेच शिवभोजन थाळी केंद्र्रामधून जेवणाचे पॅकेट उपलब्ध करुन द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी संबंधित विभागांना दिल्या. सध्या जिल्ह्यात ७०० थाळींचे उद्दिष्ट आहे, मात्र अशा परिस्थितीत आवश्यकता भासली तर त्यात वाढ करण्यात येईल, असे संकेतही जिल्हाधिकाºयांनी दिले.कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन आहे. याबाबत जिल्ह्यातील सद्यस्थिती व त्यावर करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पाटोडे, अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त वाय.के. बेंडकुळे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, रेल्वे पोलीस फोर्सचे कमांडट बी. पी. कुशवाह, मध्य रेल्वेच्या भुसावळ व जळगाव येथील स्टेशनमास्तर यांच्यासह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे पुढे म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंची कमतरता भासणार नाही यासाठी अत्यावश्यक सेवा सुरळीत चालू राहणे आवश्यक आहे. याकरीता सर्व संबंधित विभागाने याचे नियोजन करावे. तसेच यामुळे ज्या गरीब व गरजू नागरिकांचा रोजगार बुडत आहे. त्यांना जेवण मिळणे आवश्यक आहे याकरीता सामाजिक संस्थाची मदत घ्यावी. तसेच शिवभोजन थाळी केंद्र्रामधून जेवणाचे पॅकेट उपलब्ध करुन देता येतील. सध्या जिल्ह्यात ७०० थाळींचे उद्दिष्ट आहे, आवश्यकता भासली तर त्यात वाढ करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणाºया वाहनांना पास देण्यासाठी विशेष कक्ष स्थापनकाही ठिकाणी अत्यावश्यक सेवेची वाहने व रुग्णवाहिकांमधून माणसांची वाहतूक होत असल्याच्या तक्रारी येत आहे. याबाबत परिवहन व पोलीस विभागाने दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या. जीवनावश्यक वस्तुंची वाहतुक करणाºया वाहनांना परिवहन कार्यालयामार्फत पास देण्यात येत असून यासाठी परिवहन कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. ज्यांना याबाबत काही अडचण असेल अशा नागरिकांनी या संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शेतमाल विक्रीसाठी बाहेर नेणाºया वाहनांना तसेच जीवनावश्यक वस्तू घेऊन जिल्ह्यात येणाºया वाहनांना कुठल्याही प्रकारची अडचण येता कामा नये, अन्नधान्याच्या तसेच भाजीपाला, फळे जादा भावाने विक्री होत असल्यास याबाबतची तक्रार जिल्हा पुरवठा शाखेकडे तर औषधांबाबतची तक्रार अन्न व औषध प्रशासन विभागाकडे करावी, संबंधित विभागाने आपल्याकडे आलेल्या तक्रारींचे त्वरीत निराकरण करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकºयांनी दिल्या.वापरलेल्या मास्कबाबत काळजी घ्यावीकोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिक मास्कचा वापर करीत आहे. परंतु वापरलेले मास्क रस्त्यावर टाकल्याचे दिसून येत आहे. या विषाणूचा संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी वापरलेले मास्क रस्त्यावर टाकू नये, सदरचे मास्क घंटागाडीतच द्यावे, महानगरपालिकेने त्याची स्वतंत्र विल्हेवाट लावावी, जेणेकरुन त्यापासून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार नाही, अशा सूचनाही या वेळी देण्यात आल्या.अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांनी घराबाहेर पडतानाच ओळखपत्र गळयात घालावेकोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होवू नये याकरीता जीवनावश्यक सेवा सुरु ठेवण्यात आल्या आहेत. या सेवांमध्ये काम करणारे कर्मचारी, शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी घराबाहेर पडतानाच आपले ओळखपत्र गळयात अडकवूनच बाहेर पडावे, जेणेकरुन पोलिसांना तपासणी करताना अडचणी येणार नाही, अशा सूचनाही जिल्हाधिकाºयांनी दिल्या.जीवनावश्यक वस्तुंची दुकाने दुपारी बंद करू नकालॉकडाऊन कालावधीत नागरिकांना लागणाºया जीवनावश्यक वस्तू तातडीने उपलब्ध व्हाव्यात, याकरीता जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. काही ठिकाणी दुकाने दुपारी बारावाजेनंतर बंद करण्यास सांगण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापुढे अशा तक्रारी येणार नाही याची काळजी संबंधित विभागाने घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाºयांनी संबंधित विभागास दिल्या.

टॅग्स :Jalgaonजळगाव