शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

"आगामी निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढवू, पण निर्णय स्थानिक नेत्यांवरच"

By ajay.patil | Updated: September 15, 2022 20:08 IST

विरोधी पक्षनेते अजित पवारांची माहिती. ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याच्या बडतर्फीसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार

राज्यात अडीच वर्षात शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेस व कॉग्रेस असे मिळून महाविकास आघाडीचे सरकार कायम होते. त्यामुळे आगामी काळात राज्यात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका देखील महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्याची तयारी आहे. मात्र, अनेकवेळा स्थानिक परिस्थिती वेगळी असते, अनेक कार्यकर्त्यांची इच्छा निवडणूक लढविण्याची असते, त्यामुळे जरी मविआ म्हणून निवडणूक लढविण्याची आमची इच्छा असली तरी हा निर्णय जिल्हापातळीवरील नेत्यांवर सोडण्यात येणार असल्याची माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

गुरुवारी अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. दुपारी शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात कार्यकर्त्यांच्या मेळावा झाल्यानंतर पवार यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी आमदार एकनाथ खडसे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्र पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर, जिल्हा बँकेच्या संचालिका रोहिणी खडसे, महानगरप्रमुख अशोक लाडवंजारी, महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना पवार यांनी सांगितले की, "आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका शिंदे गट व भाजप एकत्र लढविण्याची तयारी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली गेली तर तिघांची ताकद वाढेल, त्यामुळे तिन्ही पक्षांच्या प्रमुखांसोबत चर्चा करण्यात येऊनच अंतिम निर्णय घेण्यात येईल."

‘त्या’ बकालेंना बडतर्फ करा....सध्याचे राजकारण तर खालच्या पातळीवर तर गेलेच आहे. मात्र, पोलीस देखील खालच्या पातळीवर बोलायला लागले आहे. जिल्हा पोलीस दलातील अधिकारी बकाले यांनी ज्या प्रकारे वक्तव्य केले आहे. ते माफ करण्याजोगे नसून, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन, त्या पोलीस अधिकाऱ्याला बडतर्फ करण्याची मागणी करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

शिंदे सरकारला गांभीर्य नाही...१. अजित पवार यांनी यावेळी वेगवेगळ्या मुद्द्यांवर राज्यातील शिंदे सरकारवर जोरदार टीका केली, एकीकडे राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना राज्य शासन शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष देत नाही.२. शेतकऱ्यांना मदतीची गरज असताना, पालकमंत्र्यांना नेमणुका थांबल्या असल्याने शेतकऱ्यांना मदत दिली जात नाही. निधीच्या परवानग्या थांबल्या आहेत. त्यामुळे अनेक विकासकामे रखडून पडले आहेत.३. राज्यासाठी मंजुर होणारा प्रकल्प गुजरात ला गेला. तरी राज्य शासन लक्ष देत नाही. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकार अडचणीत आल्यामुळे आता काहीही आरोप करून या मुद्द्यापासून दुर जाण्याचा प्रयत्न राज्यसरकारकडून होत असल्याची टीका पवारांनी केली.

तर उदय सामंत तेव्हा गप्प का होते..?मविआच्या काळात देखील अनेक उद्योग परराज्यात गेल्याची टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली होती. तसेच या उद्योगांची यादीच जाहीर करणार असल्याचे सामंत यांनी म्हटले होते. याबाबत पवार यांना प्रश्न विचारला असता मविआच्या काळात सामंत देखील मंत्री होती. मात्र, तेव्हा सामंत गप्प का होते ? असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला. जर उद्योग गेले तर त्या उद्योगांची यादी जाहीर करण्याचे आव्हान देखील पवार यांनी उदय सामंत यांना दिले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारJalgaonजळगावMahavikas Aghadiमहाविकास आघाडी