शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

आम्ही आमच्या गावाचा विकास करण्यास सक्षम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 4:27 AM

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिका हद्दीत जावून पिंप्राळा परिसर असो वा मेहरूण भाग त्या भागात देखील अजूनही विकास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महापालिका हद्दीत जावून पिंप्राळा परिसर असो वा मेहरूण भाग त्या भागात देखील अजूनही विकास झालेला नाही. तसेच जळगाव शहरातील रस्त्यांची स्थिती पाहिली तर एखाद्या खेडेगावापेक्षाही खराब स्थिती जळगाव शहराची झाली आहे. त्यामुळे जळगाव शहराची स्थिती सत्ताधाऱ्यांनी सुधारण्याकडे लक्ष द्यायला हवे, हद्दवाढीसारखे ठराव सत्ताधाऱ्यांनी करू नयेत, महानगरपालिका जर पिंपरी-चिंचवड सारखी राहिली तर हद्दवाढीचा विचार होवू शकतो. मात्र, जी महापालिका हद्दीत असलेल्या कॉलन्यांचा विकास करू शकत नाही. ती महापालिका आमच्या गावांचा काय विकास करेल अशा संतप्त प्रतिक्रिया देत सावखेडा ग्रामस्थांनी देखील मनपा हद्दवाढीचा प्रस्तावाला विरोध केला आहे.

सावखेडा हे गाव जळगाव शहरापासून ६ किमीच्या अंतरावर आहे. तसेच लहानशे खेडे असल्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा विकास बऱ्यापैकी होत असून, त्यात महापालिकेच्या हद्दीत गावाचा समावेश झाला तर नागरिकांना लहानलहान अडचणी सोडविण्यासाठी इतर महापालिकेत जावे लागेल. तसेच जळगाव शहरातील नागरिकच आता महापालिकेला कंटाळले असून, महापालिकेपेक्षा एखाद्या गावाची ग्रामपंचायतच चांगली असते असे जळगावकर म्हणत आहेत. अशा परिस्थितीत आमच्या गावाचा समावेश महापालिका हद्दीत होवू देणार नाही अशी भूमिका सावखेडा ग्रामस्थांनी घेतली आहे.

ठराव रद्द केलाच पाहिजे, आमचा विरोध राहणारच

कोणत्याही परिस्थितीत सावखेडा गावाचा समावेश जळगाव महापालिकेच्या हद्दीत होवू देणार नाही अशी भूमिका सावखेडा ग्रामस्थांनी घेतली असून, मनपातील सत्ताधाऱ्यांनी केलेला ठराव रद्द करावा. तसेच हा ठराव रद्द न केल्यास महापालिकेच्या इमारतीवर मोर्चा आणला जाईल असा इशारा सावखेडा गामस्थांनी दिला आहे.

कोट..

सावखेडा गावाचा सर्वांगिन विकास करायला आमची ग्रामपंचायत पुर्णपणे सक्षम आहे. महापालिकेच्या हद्दीत जाण्याचा आमचा कोणताही विचार नाही. महापालिका ठराव करू शकते, तर आमची ग्रामपंचायत देखील महापालिकेत न जाण्याचा ठराव करू शकते. त्यामुळे आमच्या गावातील नागरिकांचा मनपा हद्दीत जाण्यास विरोध आहे.

-भगवान पाटील, सरपंच

बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, शेतकऱ्यांची जमिनी हडपण्याचा हा डाव आहे. मात्र, आम्ही ग्रामस्थ या ठरावाला कडाडून विरोध करू. पालकमंत्र्यांकडे याबाबतचे निवेदन देवून हा ठराव रद्द करण्यासाठी प्रयत्न करु.

-मंगेश पानपाटील, सदस्य, ग्रामपंचायत

सावखेडा गावाचा विकास हा जळगाव शहरापेक्षा बराच चांगला आहे. नागरिकांना मुलभूत सुविधा मिळत आहेत. अशा परिस्थितीत जळगाव शहराचा हद्दीत गावाचा समावेश झाला तर आमच्या गावाचे गावपण कायमचे हरवून जाईल. त्यामुळे मनपाच्या ठरावाला आमचा विरोध आहे.

- रिता पवार, सदस्या, ग्रामपंचायत

जळगाव शहराचा नागरिकांना सुविधा मिळत नाही, आणि महापालिका हद्दीत इतर गावांचा समावेश करण्याचा ठराव करणे म्हणजे, स्वत:चे मुलं सांभाळता येत नाही आणी दुसऱ्यांचे मुलं दत्तक घेण्यासारखेच आहे. आधी जळगाव शहराचा विकास सत्ताधाऱ्यांनी करावा त्यानंतरच हद्दवाढीचा विचार केला पाहिजे.

-उत्तम चौधरी, ग्रामस्थ, सावखेडा