शहरं
Join us  
Trending Stories
1
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
2
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
3
"CCTV पाहिल्यापासून झोप येत नाही..."; १५ महिन्यांच्या मुलीला डे-केअरमध्ये मारहाण, आई ढसाढसा रडली
4
ICICI बँकेचा शेअरधारकांना सुखद धक्का! प्रति शेअर इतक्या रुपयांचा लाभांश जाहीर, तुम्हीही घेऊ शकता लाभ
5
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
6
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
7
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
8
पुन्हा जिवंत करण्यासाठी तरुणाचा मृतदेह ५ दिवस पाण्यात ठेवला अन् बाजूला बँड वाजवत बसले! कुठे घडला 'हा' प्रकार?
9
१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार
10
"भारत चकचकित मर्सिडीज, पाकिस्तान कचऱ्यानं भरलेला ट्रक", फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी PAK ची अब्रू वेशीवर टांगली!
11
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
12
Shravan Somvar 2025: शिवलिंगावर अभिषेक करताना तुम्हीसुद्धा 'ही' चूक करताय का? पूजा राहील अपूर्ण!
13
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
14
दिलदार! भीक मागून १.८३ लाख जमवले, मंदिरासाठी दान केले; रंगम्माच्या मनाचा मोठेपणा
15
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
16
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
17
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
18
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
19
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
20
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?

गावाकडे हाताला काम नसल्याने परत यावेच लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 13:26 IST

परप्रांतीय तरुणांची व्यथा : काही जण शेती कामात गुंतले

जळगाव : कोरोनाच्या संकटात गावी गेलो, तेथे तीन-साडेतीन महिने कसेबसे काढले. मात्र हाताला काम नाही, पोटाची खळगी कशी भरणार, रोजगार मिळेल तेथे जाऊन काम केल्या शिवाय पर्याय नाही, अशी खंत लॉकडाऊनच्या संकटाविषयी ‘लोकमत’शी संवाद साधताना परप्रांतीय तरुणांनी व्यक्त केली. काही परप्रांतीय तरुण परलते असले तरी काही जण गावीच शेती कामात गुंतले आहे तर बंगाली सुवर्ण कारागिरांनाही सुवर्णनगरीत परतण्याचे वेध लागले आहे. औद्योगिक वसाहत परिसरातील उद्योगांनाही मजुरांची प्रतीक्षा आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून लॉकडाऊनचे संकट ओढावले व सर्व व्यवहार ठप्प झाले. याची झळ स्थानिक व्यावसायिक, कामगार, नोकरदार यांना बसण्यासह मोठ्या प्रमाणात जळगावात असलेल्या परप्रांतीयांनाही बसला. त्यामुळे हजारो परप्रांतीय तरुण गावी परतले. यात गावी परतलेल्या बंगाली सुवर्ण कारागिरांचीच संख्या ११ ते १२ हजार आहे.व्यवसाय कमी असल्याने संख्या कमीसध्या व्यवहार सुरू झाले असले तरी पाहिजे त्या प्रमाणात व्यवसाय नसल्याने ५० टक्केच कारागिर, मजूर कामावर आहे. व्यवसायाअभावी इतर जणांना व्यावसायिकही बोलाण्यास धजावत नसल्याचे सांगण्यात येत आहे.काम नसल्याने परतले जळगावातपरप्रांतीय तरुणांना जाताना गावाची ओढ जेवढी होती, तेथे गेल्यानंतर त्यांना पुन्हा तेवढीच कामाचीही ओढ लागल्याचे या तरुणांचे म्हणणे आहे. या संदर्भात खाद्य पदार्थांच्या दुकानांवर कारागिर असलेल्या मूळ राजस्थानचे असलेल्या तरुणांनी सांगितले की, लॉकडाऊनच्या काळात दुकान बंद असल्याने येथे असताना हाताला काम नव्हते. मालक मदत करायचे. मात्र त ेदेखील किती दिवस मदत करतील, या विचाराने आम्ही गावी जायचा निर्णय घेतला. तेथे तीन-साडेतीन महिने थांबलो, मात्र तेथेही हाताला काम नव्हते. घरचे मंडळी किती दिवस संभाळणार, असाही प्रश्न तेथे उभा राहिला. त्यामुळे पुन्हा जळगावात कामाच्या ठिकाणी येण्याचे वेध लागले. कामासाठी व पोटासाठी पुन्हा येथे परतण्याशिवायही पर्याय नव्हता त्यामुळे येथे आलो असून हाताला काम मिळाल्याचे समाधान आहे, असेही अनुप माली व शिवराज माली यांनी सांगितले.बंगाली कारागिरही येण्यासाठी उत्सुकसुवर्णनगरीत कलाकुसरीचे सुवर्ण अलंकार घडविण्यात हातखंडा असलेले बंगाली सुवर्ण कारागिरांपैकीही ११ ते १२ हजार कारागिर गावी गेले आहे. त्यातील १०० ते १५० जण परतले आहे. इतरांनाही कामासाठी जळगावात यायचे आहे, मात्र प्रवासाची सुविधा नसल्याने त्यांच्यासमोर येण्याबाबत चिंता असल्याचे बंगाली सुवर्णकार असोसिएशनचे सचिव महेंद ्रमायटी यांनी सांगितले.गावी गेलेल्या मजुरांपैकी २० ते २५ टक्के मजूर परतले आहेत. आता उर्वरित मजुरांची परतण्याची प्रतीक्षा आहे.- सचिन चोरडिया,सचिव, जिंदागावी तीन ते साडेतीन महिने राहिलो. मात्र घरात बसून उदरनिर्वाह कसा चालणार, असा प्रश्न होता. पोटासाठी काम मिळेल, तेथे जावेच लागणार.- शिवराज माली,राजस्थानी कारागिर.गावाकडे गेलो, मात्र तेथे काही काम नव्हते. कामाच्या शोधात कोठे भटकणार, या चिंतेत होतो. कामासाठी येण्याशिवाय पर्याय नव्हता.- अनुप माली, राजस्थानी कारागिरव्यवसाय सुरू झाल्याने मजूर परतत आहे. यात निम्मे मजूर आले असून उर्वरित मजूर गावी शेतीकामात गुंतले आहेत. व्यवसायही मंदावला असल्याने जास्त मजूर कसे येणार, अशीही चिंता आहे.- किरण तापडिया, फरसाण, मिठाई विक्रेते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव