शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

गावाकडे हाताला काम नसल्याने परत यावेच लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 13:26 IST

परप्रांतीय तरुणांची व्यथा : काही जण शेती कामात गुंतले

जळगाव : कोरोनाच्या संकटात गावी गेलो, तेथे तीन-साडेतीन महिने कसेबसे काढले. मात्र हाताला काम नाही, पोटाची खळगी कशी भरणार, रोजगार मिळेल तेथे जाऊन काम केल्या शिवाय पर्याय नाही, अशी खंत लॉकडाऊनच्या संकटाविषयी ‘लोकमत’शी संवाद साधताना परप्रांतीय तरुणांनी व्यक्त केली. काही परप्रांतीय तरुण परलते असले तरी काही जण गावीच शेती कामात गुंतले आहे तर बंगाली सुवर्ण कारागिरांनाही सुवर्णनगरीत परतण्याचे वेध लागले आहे. औद्योगिक वसाहत परिसरातील उद्योगांनाही मजुरांची प्रतीक्षा आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून लॉकडाऊनचे संकट ओढावले व सर्व व्यवहार ठप्प झाले. याची झळ स्थानिक व्यावसायिक, कामगार, नोकरदार यांना बसण्यासह मोठ्या प्रमाणात जळगावात असलेल्या परप्रांतीयांनाही बसला. त्यामुळे हजारो परप्रांतीय तरुण गावी परतले. यात गावी परतलेल्या बंगाली सुवर्ण कारागिरांचीच संख्या ११ ते १२ हजार आहे.व्यवसाय कमी असल्याने संख्या कमीसध्या व्यवहार सुरू झाले असले तरी पाहिजे त्या प्रमाणात व्यवसाय नसल्याने ५० टक्केच कारागिर, मजूर कामावर आहे. व्यवसायाअभावी इतर जणांना व्यावसायिकही बोलाण्यास धजावत नसल्याचे सांगण्यात येत आहे.काम नसल्याने परतले जळगावातपरप्रांतीय तरुणांना जाताना गावाची ओढ जेवढी होती, तेथे गेल्यानंतर त्यांना पुन्हा तेवढीच कामाचीही ओढ लागल्याचे या तरुणांचे म्हणणे आहे. या संदर्भात खाद्य पदार्थांच्या दुकानांवर कारागिर असलेल्या मूळ राजस्थानचे असलेल्या तरुणांनी सांगितले की, लॉकडाऊनच्या काळात दुकान बंद असल्याने येथे असताना हाताला काम नव्हते. मालक मदत करायचे. मात्र त ेदेखील किती दिवस मदत करतील, या विचाराने आम्ही गावी जायचा निर्णय घेतला. तेथे तीन-साडेतीन महिने थांबलो, मात्र तेथेही हाताला काम नव्हते. घरचे मंडळी किती दिवस संभाळणार, असाही प्रश्न तेथे उभा राहिला. त्यामुळे पुन्हा जळगावात कामाच्या ठिकाणी येण्याचे वेध लागले. कामासाठी व पोटासाठी पुन्हा येथे परतण्याशिवायही पर्याय नव्हता त्यामुळे येथे आलो असून हाताला काम मिळाल्याचे समाधान आहे, असेही अनुप माली व शिवराज माली यांनी सांगितले.बंगाली कारागिरही येण्यासाठी उत्सुकसुवर्णनगरीत कलाकुसरीचे सुवर्ण अलंकार घडविण्यात हातखंडा असलेले बंगाली सुवर्ण कारागिरांपैकीही ११ ते १२ हजार कारागिर गावी गेले आहे. त्यातील १०० ते १५० जण परतले आहे. इतरांनाही कामासाठी जळगावात यायचे आहे, मात्र प्रवासाची सुविधा नसल्याने त्यांच्यासमोर येण्याबाबत चिंता असल्याचे बंगाली सुवर्णकार असोसिएशनचे सचिव महेंद ्रमायटी यांनी सांगितले.गावी गेलेल्या मजुरांपैकी २० ते २५ टक्के मजूर परतले आहेत. आता उर्वरित मजुरांची परतण्याची प्रतीक्षा आहे.- सचिन चोरडिया,सचिव, जिंदागावी तीन ते साडेतीन महिने राहिलो. मात्र घरात बसून उदरनिर्वाह कसा चालणार, असा प्रश्न होता. पोटासाठी काम मिळेल, तेथे जावेच लागणार.- शिवराज माली,राजस्थानी कारागिर.गावाकडे गेलो, मात्र तेथे काही काम नव्हते. कामाच्या शोधात कोठे भटकणार, या चिंतेत होतो. कामासाठी येण्याशिवाय पर्याय नव्हता.- अनुप माली, राजस्थानी कारागिरव्यवसाय सुरू झाल्याने मजूर परतत आहे. यात निम्मे मजूर आले असून उर्वरित मजूर गावी शेतीकामात गुंतले आहेत. व्यवसायही मंदावला असल्याने जास्त मजूर कसे येणार, अशीही चिंता आहे.- किरण तापडिया, फरसाण, मिठाई विक्रेते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव