शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सप्टेंबरपर्यंत वाघनगरवासीयांना पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 12:54 IST

जळगाव : गेल्या काही वर्षांपासून रेंगाळलेल्या वाघनगरातील पाणी योजना पूर्णत्वाला अखेर मुहूर्त मिळाला असून सप्टेंबर अखेरपर्यंत नागरिकांना पाणी मिळले, ...

जळगाव : गेल्या काही वर्षांपासून रेंगाळलेल्या वाघनगरातील पाणी योजना पूर्णत्वाला अखेर मुहूर्त मिळाला असून सप्टेंबर अखेरपर्यंत नागरिकांना पाणी मिळले, असा शब्द मजिप्राच्या अधिकाऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना दिला आहे़ पालकमंत्री पाटील यांनी या योजनांबाबत अजिंठा विश्रामगृहात सोमवारी आढावा बैठक घेतली़ दरम्यान, वाढीव वस्तीच्या योजनेबाबत मात्र मार्चपर्यंत वाट पाहावी लागणार आहे़, अशी माहिती उपअभियंता बी़ जे़ पाटील यांनी दिली़

वाघनगरातील जलस्वराज्य टप्पा टू अंतर्गत १५ किमीच्या योजनेचे काम ८० टक्के झाले असून जलवाहिनीचे कामे सुरू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली़ वाढीव २२ किमीच्या योजनेसाठी नवीन अंदाजपत्रक सादर करण्यात आले असून त्याला मार्चपर्यंतचा अवधी लागणार आहे़ अशी माहिती अधिकाºयांनी यावेळी दिली़ दरम्यान, योजना रेंगाळत असल्याने शिवाय वाढीवस्तीबाबत ठोस निर्णय होत नसल्याने नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात असून तीन वर्षांपासून पाण्यासाठी झगडावे लागते हे दुर्देव असल्याचेही बोलले जात आहे़ नागरिकांनी पाण्यासाठी असंख्य निवेदनही दिली आहेत, मात्र, त्यावर तातडीने कार्यवाही होत नसल्याने नाराजीचा सूर उमटत आहे़जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची आढावा घेण्यासाठी येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, जळगाव पंचायत समितीचे सभापती नंदलाल पाटील, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता सुनंदा नरवाडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता निकम, उपअभियंता बी. जे. पाटील, ए. बी. किंरगे यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, विविध गावांचे सरपंच आदी उपस्थित होते.५०० मिटरचे काम अपूर्णजळगाव शहरातील वाघनगर भागातील नागरीकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडविण्यात यावा. याबाबत नागरीक वारंवार तक्रारी करीत असल्याचे पालकमंत्री आणि आमदार सुरेश भोळे यांनी बैठकीत सांगितले असता वाघनगरसाठी वाघूर धरणावरील जॅकवेलचे व जलशुध्दीकरण केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. पाईपलाईनचे फक्त ५०० मीटरचे काम अपूर्ण आहे. येत्या सप्टेंबर अखेरपर्यत वाघनगराला वाघूर धरणावरुन पाणीपुरवठा सुरु होईल, अशी ग्वाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता बी. जे. पाटील यांनी बैठकीत दिली.नवीन भागांसाठी योजनेचे नियोजनपाळधी खुर्द व बुद्रक या गावांना पाणीपुरवठ्यासाठी जलवाहिनीच्या सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. या योजनेचे अंदाजपत्रक तातडीने तयार करावे. आव्हाणे गावाच्या आजूबाजूला असणाºया सत्यमपार्क, रोहनवाडी, हरीओमनगर या भागासाठी स्वतंत्र योजना तयार करता येईल का याचा अंदाज घेण्यात यावा. विदगावसाठी नवीन पाण्याची टाकी बांधण्याचे अंदाजपत्रक तयार करावे, तरसोदला पाणीपुरवठा करण्यासाठी मन्यारखेडे येथून पाणीपुरवठा करता येईल किंवा कसे याबाबतचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. पुढील काम लवकरात लवकर करावे. त्याचप्रमाणे आसोदा येथे नवीन पाईपलाईन करावी. शिरसोली येथील पाण्याची टाकी जुनी व नादुरुस्त झाल्याने नवीन टाकी तयार करावी. याबाबतचे अंदाजपत्रक तयार करतांना नवीन नियमाप्रमाणे प्रती नागरीक प्रती दिवसासाठी ५५ लिटर पाणी याप्रमाणे करण्यात यावे. त्याचबरोबर नशिराबाद येथील पाणीपुरवठ्याची तपासणी करुन घेण्याचे निर्देशही पालकमत्री गुलाबराव पाटील यांनी यंत्रणेला दिले आहेत.

 

टॅग्स :WaterपाणीJalgaonजळगाव