शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
5
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
6
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
7
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
8
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
9
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
10
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
11
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
12
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
13
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
14
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
15
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
16
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
17
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
18
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
19
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
20
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल

नशिराबाद येथे महिन्यातून केवळ 4 दिवस पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 12:33 IST

जलपातळी खालावली

ठळक मुद्देभर हिवाळ्यात टंचाईच्या झळा; उपायोजना करण्याची मागणीजलशुद्धीकरण योजनेचे पाणी कधी?

ऑनलाईन लोकमत

नशिराबाद, जि. जळगाव, दि. 02 -  50 हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा करणा:या जलस्त्रोतांची पातळी आतापासूनच खोलवर गेल्याने ग्रामस्थांना आठवडय़ातून एकच वेळा अर्थात् 6 ते 7 दिवसाआड पाणीपुरवठा व तोही अवेळी होत आहे. सध्या महिन्यातून चारच दिवस पाणीपुरवठा होत असल्याने एप्रील-मे मध्ये पाणी मिळेल की नाही? अशी भीती ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे. दरम्यान संभाव्य भीषण पाणी टंचाई लक्षात घेता ग्रामपंचायतीसह आमदार- खासदार, लोकप्रतिनिधी या तहानलेल्या गावाकडे आतातरी लक्ष देणार का? असा संतप्त प्रश्न ग्रामस्थांनी केला आहे.संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कायमस्वरुपी ठोस उपाययोजना व पाण्याचे नियोजन करावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. येथील पाणी टंचाई तशी नवीन नाही मात्र गेल्या 25 वर्षापासून जानेवारी ते पाऊस पडेर्पयत पाणीटंचाईशी ग्रामस्थ- महिलांना झळ बसत असते. प्रत्येक निवडणुकीत पाणी प्रश्नाला प्राधान्य देवू, पाण्यासाठी पैशांची कमी भासू देणार नाही, असे आश्वासन देवून मतांचा जोगवा मागितला जातो. मात्र निवडणुकीनंतर तहानलेल्या ग्रामस्थांची दखलही घेतली जात नाही. या प्रश्नी अद्याप र्पयत ठोस उपाययोजना कार्यान्वित झालेली नाही.दरम्यान, बेळी व मुर्दापूर धरणालगतसह नशिराबाद पेठच्या जलस्त्रोतातून गावाला पाणीपुरवठा होत आहे. मात्र त्या जलस्त्रोतांची पातळी आतापासूनच खोलवर गेल्याने गेल्या आठवडय़ापासून 6 ते 7 दिवसाआड अवेळी पाणीपुरवठा होत आहे. त्यातच विस्कळीत होणा:या वीजपुरवठय़ामुळे टंचाईत भर पडते.कायमस्वरुपी स्वतंत्र पाणी योजनाच अद्यापर्पयत कार्यान्वित न झाल्याने दरवर्षी टंचाईला सामोरे जावे लागते. हंडाभर पाण्यासाठी वणवण होते. गतकाळात एमआयडीसीचे दूषित पाणी  घ्यावे लागते होते. पर्यायी योजनाच नसल्याने एमआयडीसीचे थकबाकीमुळे पाणी मिळण्यास अडचणी येते मात्र त्यासाठीही मंत्रालयार्पयत धाव घेत पाणी मिळविले जात होते व टंचाईची झळ कमी होण्यास  तात्पुरती  मदत होत असे.दरम्यान,गेल्या दोन वर्षापासून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी वाघूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात येते. यंदाही वाघुरच्या पाण्याचे आवर्तन धरणातून सोडावे, यासाठी नियोजन व्हावे, अशी मागणी होत आहे.नळांना तोटय़ा बसवा !ग्रामस्थांनी नळांना तोटय़ा बसवाव्यात असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टळेल, ज्या नळांना तोटय़ा नसतील ते नळ कनेक्शन खंडीत करण्याचा इशारा सरपंचांनी दिला आहे.ग्रामपंचायतीतर्फे नियोजन सुरु-सरपंचसंभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामपंचायतीचे नियोजन सुरु आहे. नशिराबाद येथील द्वारकानगर, मुक्तेश्वरनगर व सावतानगर येथे असलेल्या बोरींगचे पाणी व मूर्दापूर धरणाजवळील बोरींगचे पाणी एकत्रीत करुन पुरवठा गावास करण्याचे नियोजन आहे, त्यामुळे यंदा टंचाईची तीव्रता बसणार नाही, अशी माहिती सरपंच विकास पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. यंदा टंचाईची तीव्रता निवारणार्थ उपाययोजना सुरु आहेत, त्यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळेल, असे त्यांनी सांगितले.जलशुद्धीकरण योजनेचे पाणी कधी?ग्रामस्थांना मुबलक व शुद्ध पाणी मिळावे यासाठी सुमारे 16 कोटी रुपयांची जलशुद्धीकरण योजनेचे काम प्रलंबित आहे. शेळगाव येथून पाणी येथे आणून शुद्धीकरण करुन गावास पाणीपुरवठा करण्याची योजना आहे. भवानीमाता मंदिराजवळ सुमारे 60 फूट उंचीची भव्य पाण्याची टाकी बांधली आहे. योजनेचे काम पूर्णत्वाकडे असल्याचे सांगण्यात येते, मात्र त्यात पाणी  येवून गावास शुद्ध व नियमित पाणीपुरवठा होणार कधी? यंदाही शुद्धीकरणाच्या पाण्यापासून ग्रामस्थ वंचित राहणार का? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.