शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

नशिराबाद येथे महिन्यातून केवळ 4 दिवस पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 12:33 IST

जलपातळी खालावली

ठळक मुद्देभर हिवाळ्यात टंचाईच्या झळा; उपायोजना करण्याची मागणीजलशुद्धीकरण योजनेचे पाणी कधी?

ऑनलाईन लोकमत

नशिराबाद, जि. जळगाव, दि. 02 -  50 हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा करणा:या जलस्त्रोतांची पातळी आतापासूनच खोलवर गेल्याने ग्रामस्थांना आठवडय़ातून एकच वेळा अर्थात् 6 ते 7 दिवसाआड पाणीपुरवठा व तोही अवेळी होत आहे. सध्या महिन्यातून चारच दिवस पाणीपुरवठा होत असल्याने एप्रील-मे मध्ये पाणी मिळेल की नाही? अशी भीती ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे. दरम्यान संभाव्य भीषण पाणी टंचाई लक्षात घेता ग्रामपंचायतीसह आमदार- खासदार, लोकप्रतिनिधी या तहानलेल्या गावाकडे आतातरी लक्ष देणार का? असा संतप्त प्रश्न ग्रामस्थांनी केला आहे.संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कायमस्वरुपी ठोस उपाययोजना व पाण्याचे नियोजन करावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. येथील पाणी टंचाई तशी नवीन नाही मात्र गेल्या 25 वर्षापासून जानेवारी ते पाऊस पडेर्पयत पाणीटंचाईशी ग्रामस्थ- महिलांना झळ बसत असते. प्रत्येक निवडणुकीत पाणी प्रश्नाला प्राधान्य देवू, पाण्यासाठी पैशांची कमी भासू देणार नाही, असे आश्वासन देवून मतांचा जोगवा मागितला जातो. मात्र निवडणुकीनंतर तहानलेल्या ग्रामस्थांची दखलही घेतली जात नाही. या प्रश्नी अद्याप र्पयत ठोस उपाययोजना कार्यान्वित झालेली नाही.दरम्यान, बेळी व मुर्दापूर धरणालगतसह नशिराबाद पेठच्या जलस्त्रोतातून गावाला पाणीपुरवठा होत आहे. मात्र त्या जलस्त्रोतांची पातळी आतापासूनच खोलवर गेल्याने गेल्या आठवडय़ापासून 6 ते 7 दिवसाआड अवेळी पाणीपुरवठा होत आहे. त्यातच विस्कळीत होणा:या वीजपुरवठय़ामुळे टंचाईत भर पडते.कायमस्वरुपी स्वतंत्र पाणी योजनाच अद्यापर्पयत कार्यान्वित न झाल्याने दरवर्षी टंचाईला सामोरे जावे लागते. हंडाभर पाण्यासाठी वणवण होते. गतकाळात एमआयडीसीचे दूषित पाणी  घ्यावे लागते होते. पर्यायी योजनाच नसल्याने एमआयडीसीचे थकबाकीमुळे पाणी मिळण्यास अडचणी येते मात्र त्यासाठीही मंत्रालयार्पयत धाव घेत पाणी मिळविले जात होते व टंचाईची झळ कमी होण्यास  तात्पुरती  मदत होत असे.दरम्यान,गेल्या दोन वर्षापासून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी वाघूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात येते. यंदाही वाघुरच्या पाण्याचे आवर्तन धरणातून सोडावे, यासाठी नियोजन व्हावे, अशी मागणी होत आहे.नळांना तोटय़ा बसवा !ग्रामस्थांनी नळांना तोटय़ा बसवाव्यात असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टळेल, ज्या नळांना तोटय़ा नसतील ते नळ कनेक्शन खंडीत करण्याचा इशारा सरपंचांनी दिला आहे.ग्रामपंचायतीतर्फे नियोजन सुरु-सरपंचसंभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामपंचायतीचे नियोजन सुरु आहे. नशिराबाद येथील द्वारकानगर, मुक्तेश्वरनगर व सावतानगर येथे असलेल्या बोरींगचे पाणी व मूर्दापूर धरणाजवळील बोरींगचे पाणी एकत्रीत करुन पुरवठा गावास करण्याचे नियोजन आहे, त्यामुळे यंदा टंचाईची तीव्रता बसणार नाही, अशी माहिती सरपंच विकास पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. यंदा टंचाईची तीव्रता निवारणार्थ उपाययोजना सुरु आहेत, त्यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळेल, असे त्यांनी सांगितले.जलशुद्धीकरण योजनेचे पाणी कधी?ग्रामस्थांना मुबलक व शुद्ध पाणी मिळावे यासाठी सुमारे 16 कोटी रुपयांची जलशुद्धीकरण योजनेचे काम प्रलंबित आहे. शेळगाव येथून पाणी येथे आणून शुद्धीकरण करुन गावास पाणीपुरवठा करण्याची योजना आहे. भवानीमाता मंदिराजवळ सुमारे 60 फूट उंचीची भव्य पाण्याची टाकी बांधली आहे. योजनेचे काम पूर्णत्वाकडे असल्याचे सांगण्यात येते, मात्र त्यात पाणी  येवून गावास शुद्ध व नियमित पाणीपुरवठा होणार कधी? यंदाही शुद्धीकरणाच्या पाण्यापासून ग्रामस्थ वंचित राहणार का? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.