शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ४६ गावांना टॅँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 11:51 IST

दुष्काळाची झळ

ठळक मुद्दे  ७३ विहिरी केल्या अधिग्रहीत

जळगाव : जिल्ह्यात सर्वत्र कडाक्याची थंडी पडते आहे. मात्र अशा परिस्थितीतही टंचाईच्या झळा ग्रामीण भागाला अस्वस्थ करून असून आतापासून ४६ गावांना टॅँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. यासह टंचाई निवारणासाठी विविध योजनांची अंमलबजावणीदेखील केली जात आहे.गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात प्रारंभीच्या कालखंडात चांगला पाऊस झाला. मात्र नंतर पावसाने दडी मारल्याने बळीराजा धास्तावला. विविध तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याची नोंद आहे. त्यामुळे राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्येही जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. केवळ एरंडोल तालुक्यातील काही गावांमध्ये ही परिस्थिती नसल्याचे लक्षात येते.पाण्यासाठी वणवणपाऊस नसल्यामुळे नद्या वाहून निघतील असे पाणी आले नव्हते. याचे परिणाम सिंचन प्रकल्पांवर झाले आहेत. जिल्ह्यातील केवळ हतनूर धरणात बऱ्यापैकी पाणी साठा झाला. गिरणा प्रकल्प जेमतेम २५ टक्के तर वाघूरमध्ये सद्य स्थितीत ३४ ते ३५ टक्के पाणी साठा आहे. जिल्ह्यातील पाणी टंचाईची भीषणता लक्षात घेऊन सर्व सिंचन प्रकल्पांमधील पाणी हे पिण्यासाठी राखून ठेवण्यात आले आहे. याचा फटका रब्बी पेºयाला बसला आहे. पाऊस नसल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेची वणवण आतापासूनच सुरू असल्याचे दिसून येत आहे.अनेक गावांना टॅँकरने पाणीगावांच्या पाणी योजना आटल्याने आता तेथे टॅँकरने पाणी पुरवठा केला जावा,अशी मागणी वाढत आहे. परिणामी सद्य स्थितीत ४६ गावांना २८ टॅँकरच्या मदतीने पाणी पुरवठा केला जात आहे. गावांमध्ये रात्रंदिवस पाणी पुरवठा करावा लागत आहे. अनेक गावात रात्री उशिराने पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे महिला व लहान मुले टॅँकरची वाट पहात असतात. यात अमळनेर तालुक्यात सर्वाधिक ३० गावांना टॅँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. त्या खालोखाल चाळीसगाव तालुक्यात ८, पारोळा तालुक्यात ४ व जळगाव तालुक्यातील एका गावाला टॅँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.अनेक योजनांची अंमलबजावणीटंचाई निवारण्यासाठी गावांमध्ये अनेक योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यात सार्वजनिक स्त्रोत आटल्याने खाजगी विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. ७१ गावांमधील ७३ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. यासह सहा गावांमध्ये तात्पुरती पाणी योजना, तीन गावांमध्ये विहिरी खोल करून पाणी पुरवठा केला जात आहे. उन्हाची झळ वाढल्यानंतर टंचाईत अधिक वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई