शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

जिल्ह्यात ४६ गावांना टॅँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 11:51 IST

दुष्काळाची झळ

ठळक मुद्दे  ७३ विहिरी केल्या अधिग्रहीत

जळगाव : जिल्ह्यात सर्वत्र कडाक्याची थंडी पडते आहे. मात्र अशा परिस्थितीतही टंचाईच्या झळा ग्रामीण भागाला अस्वस्थ करून असून आतापासून ४६ गावांना टॅँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. यासह टंचाई निवारणासाठी विविध योजनांची अंमलबजावणीदेखील केली जात आहे.गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात प्रारंभीच्या कालखंडात चांगला पाऊस झाला. मात्र नंतर पावसाने दडी मारल्याने बळीराजा धास्तावला. विविध तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याची नोंद आहे. त्यामुळे राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्येही जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. केवळ एरंडोल तालुक्यातील काही गावांमध्ये ही परिस्थिती नसल्याचे लक्षात येते.पाण्यासाठी वणवणपाऊस नसल्यामुळे नद्या वाहून निघतील असे पाणी आले नव्हते. याचे परिणाम सिंचन प्रकल्पांवर झाले आहेत. जिल्ह्यातील केवळ हतनूर धरणात बऱ्यापैकी पाणी साठा झाला. गिरणा प्रकल्प जेमतेम २५ टक्के तर वाघूरमध्ये सद्य स्थितीत ३४ ते ३५ टक्के पाणी साठा आहे. जिल्ह्यातील पाणी टंचाईची भीषणता लक्षात घेऊन सर्व सिंचन प्रकल्पांमधील पाणी हे पिण्यासाठी राखून ठेवण्यात आले आहे. याचा फटका रब्बी पेºयाला बसला आहे. पाऊस नसल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेची वणवण आतापासूनच सुरू असल्याचे दिसून येत आहे.अनेक गावांना टॅँकरने पाणीगावांच्या पाणी योजना आटल्याने आता तेथे टॅँकरने पाणी पुरवठा केला जावा,अशी मागणी वाढत आहे. परिणामी सद्य स्थितीत ४६ गावांना २८ टॅँकरच्या मदतीने पाणी पुरवठा केला जात आहे. गावांमध्ये रात्रंदिवस पाणी पुरवठा करावा लागत आहे. अनेक गावात रात्री उशिराने पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे महिला व लहान मुले टॅँकरची वाट पहात असतात. यात अमळनेर तालुक्यात सर्वाधिक ३० गावांना टॅँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. त्या खालोखाल चाळीसगाव तालुक्यात ८, पारोळा तालुक्यात ४ व जळगाव तालुक्यातील एका गावाला टॅँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.अनेक योजनांची अंमलबजावणीटंचाई निवारण्यासाठी गावांमध्ये अनेक योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यात सार्वजनिक स्त्रोत आटल्याने खाजगी विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. ७१ गावांमधील ७३ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. यासह सहा गावांमध्ये तात्पुरती पाणी योजना, तीन गावांमध्ये विहिरी खोल करून पाणी पुरवठा केला जात आहे. उन्हाची झळ वाढल्यानंतर टंचाईत अधिक वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई