शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

बापरे... जलसाठा गतवर्षापेक्षाही कमी! तापमान कमी असतानाही फटका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 13:11 IST

२८ मार्च २०२२ आणि २८ मार्च २०२३ या जलसाठ्याची आकडेवारी पाहता गेल्यावर्षाच्या तुलनेत साठा कमी झाल्याचे दिसून येत आहे.

- कुंदन पाटील

जळगाव : जिल्ह्यातील १३ जलप्रकल्पातील साठा गतवर्षाच्या तुलनेत कमी आहे. या प्रकल्पांपैकी केवळ गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्यात आली आहे. यंदा मार्च महिन्यात तापमान नसतानाही प्रत्येक प्रकल्पातील जलसाठा कमी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

२८ मार्च २०२२ आणि २८ मार्च २०२३ या जलसाठ्याची आकडेवारी पाहता गेल्यावर्षाच्या तुलनेत साठा कमी झाल्याचे दिसून येत आहे. यंदा गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्यात आली आहेत. त्यामुळे गिरणा धरणातील जलसाठा कमी होणे अपेक्षित आहे. मात्र हतनूर, वाघूरसह अन्य प्रकल्पांतील जलसाठा सुरक्षित असतानाही यंदा तो कमी झाल्याचे दिसून येत आहे.

विशेष म्हणजे गेल्यावर्षी भोकरबारी धरणातील साठा ४२ टक्क्यांवर होता. यंदा मात्र हा साठा केवळ ४.९३ टक्के आहे.बोरीतील जलसाठा गेल्यावर्षी ४२ टक्के होता.यंदा मात्र तो २६ टक्के इतकाच शिल्लक आहे. गिरणा धरणातील साठाही ३२.५४ टक्के शिल्लक आहे. गेल्यावर्षी सर्वच प्रकल्पातील साठा ६० टक्के होता. यंदा मात्र ५१ टक्के इतका जलसाठा शिल्लक आहे.

प्रकल्पातील गतवर्षाची व यंदा असलेल्या जलसाठ्याची टक्केवारीप्रकल्प         २०२२               २०२३हतनूर           ६७.०६            ६५.८८गिरणा          ४८.३५            ३२.६४वाघूर            ८५.६३             ७६.४६सुकी            ६९.१७              ७२.६२अभोरा         ७०.४४             ७२.३९मंगरुळ        ५७.३६             ६२.१२मोर             ७४.२२              ७३.७६अग्नावती     ४०.६०             ३१.३७हिवरा         २८.४७              ३०.४६  बहुळा         ५६.५५               ४२.२५तोंडापूर       ५८.२७              ५६.०९अंजनी        ६०.९९               ३४.९९गूळ            ६१.५७              ७४.४२भोकरबारी   ३२.८९              ४.९३बोरी            ४२.१२              ३३.४९मन्याड        ३९.१३              ३३.४९एकूण         ६०.६९              ५१.०४

टॅग्स :Jalgaonजळगाव