शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भडगाव तालुक्यात पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 15:24 IST

अशोक परदेशी भडगाव , जि.जळगाव : तालुक्यात वाढत्या उन्हाळी चटक्यांनी जमिनीतील पाण्याची पातळी खालावल्याने तालुक्यात पाणीटंचाईचे चटके नागरिकांना सोसावे ...

ठळक मुद्देगिरणेच्या आवर्तनाने भागणार तहानदोन गावांना टँकर सुरूआठ गावांना विहिरी अधिग्रहीत२६ गावांना उपाययोजनानऊ गावांना पाणीटंचाईच्या झळा

अशोक परदेशीभडगाव, जि.जळगाव : तालुक्यात वाढत्या उन्हाळी चटक्यांनी जमिनीतील पाण्याची पातळी खालावल्याने तालुक्यात पाणीटंचाईचे चटके नागरिकांना सोसावे लागत आहेत. तालुक्यात मळगाव व पिंपरखेड या दोन गावांना शासनाने पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू केले आहेत, तर तालुक्यात ६३ गावांपैकी नऊ गावांना पाणीटंचाई अधिक दिसत आहे. तालुक्यात आठ गावांना विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.भडगाव तहसील व पंचायत समिती प्रशासनाने तालुक्यात जानेवारी ते मार्च २०१९ या काळासाठी २६ गावांसाठी ४५ वेगवेगळया उपाययोजना केलेल्या आहेत. या संभाव्य पाणीटंचाई आराखड्यात एकूण ५५ लाख रुपये खचार्ची अपेक्षित अशी तरतूद केलेली आहे, अशी माहिती नायब तहसीलदार मुकेश हिवाळे, लिपीक संदीप बढे यांनी दिली.एकीकडे तालुक्यात घोटभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण फिरावे लागत आहे. तालुक्यात पाणीटंचाईचे सावट पसरले आहे. प्रशासन उपाययोजना करण्याचा प्रयत्न करीत आहे, तर दुसरीकडे गिरणा धरणातून गिरणा नदीला पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे गिरणा काठावरील पाणीटंचाईवरील गावांना पिण्याच्या पाण्याची तहान भागण्यास मोठा हातभार लागणार आहे.नऊ गावांना जास्त पाणीटंचाईतालुक्यात एकून नऊ गावांना गंभीर स्वरुपाची पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यात तांदूळवाडी, भोरटेक, वसंतवाडी, पासर्डी, आंचळगाव, धोत्रे, पिंपरखेड, तळवण तांडा, मळगाव या गावांचा संभाव्य पाणीटंचाई आराखड्यात प्रशासनाने समावेश केलेला आहे.तालुक्यात दोन गावांना पाण्याचे टँकर सुरूतालुक्यात मळगाव व पिंपरखेड या दोन गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत. ग्रामपंचायतींनी प्रशासनास प्रस्ताव देवून मागणी केली होती.तालुक्यात आठ गावांना विहिरी अधिग्रहीततालुक्यात एकूण आठ गावांना विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. यात तांदूळवाडी, भोरटेक, वसंतवाडी, आंचळगाव, पासर्डी, पिंपरखड, तळवण तांडा, धोत्रे आदी गावांचा समावेश आहे. पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने उपाय योजना केलेल्या आहेत.तालुक्यात जानेवारी ते मार्चसाठी २६ गावांवर ४५ उपाययोजनापंचायत समितीमार्फत संभाव्य पाणीटंचाई आराखड्यात जानेवारी ते मार्च २०१९ या दरम्यान एकूण २६ गावांसाठी ४५ वेगवगळया उपाययोजना केलेल्या आहेत. यात पाणीपुरवठा विहिरी खोलीकरण करणे, शेवड्या, खाजगी विहिरी अधिग्रहीत करणे, नवीन विंधन विहिरी, तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा करणे आदी कामांसाठी एकूण ५५ लाख संभाव्य खर्च अपेक्षित आहे.तालुक्यात मार्च ते जूनसाठी २१ गावांवर उपाययोजनातालुक्यात मार्च ते जून २०१९ या दरम्यान एकूण १२ गावांसाठी पाणीटंचाईवर २१ विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या कामासाठी प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाई आराखड्यात एकूण १६ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती नायब तहसीलदार मुकेश हिवाळे, लिपीक संदीप बढे यांनी दिली.गिरणा नदीच्या आवर्तनाने पाणीटंचाई होणार दूरएकीकडे पाणीटंचाईची समस्या असताना दुसरीकडे गिरणा धरणातून गिरणा नदीला आवर्तन सोडल्याने तहान भागण्यास हातभार लागणार आहे. भडगाव शहराचा पाणीपुरवठा करणारा गिरणा नदीवरचा बंधाराही कोरडा झाला होता. गिरणेवरचा सावदे बंधाराही कोरडा पडला होता. मात्र गिरणेच्या पाण्याने या बंधाऱ्यात पाणी साचून पाणी प्रश्न सुटण्यास भर उन्हाळयात हातभार लागणार आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBhadgaon भडगाव