शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

धरणगावात भर पावसाळ्यातही उन्हाळ्यासारखी पाणीटंचाईची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:12 IST

पाणीप्रश्नी शहरात हंडामोर्चा, पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यासारखी आंदोलने होऊनदेखील पालिका प्रशानासनाला कुठलाही फरक पडलेला दिसून येत नाही. शहरात ...

पाणीप्रश्नी शहरात हंडामोर्चा, पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यासारखी आंदोलने होऊनदेखील पालिका प्रशानासनाला कुठलाही फरक पडलेला दिसून येत नाही.

शहरात गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून पाण्यावरच राजकारण सुरू आहे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे याच मतदारसंघातून निवडून आले आहेत. तरीही पाण्याची अशी बिकट स्थिती शहरात आहे.

सणासुदीला अनेक लोक मूळ गावी म्हणजे धरणगावला येत असतात. त्यांनाही बाहेरून पाणी आणून तहान भागवावी लागत असते. विशेष म्हणजे या गंभीर विषयावर विरोधकदेखील मौन पाळून असल्याने सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अनेक वेळा आंदोलने

शहरास सोळा ते सतरा दिवसाआड एकदा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी शिवसेनेची सत्ता असलेल्या धरणगाव नगरपालिकेवर डिसेंबर २०२० मध्ये देखील हंडा मोर्चा काढला होता. यासह अनेकवेळा आंदोलने झाली आहेत. मात्र, केवळ आश्वासन मिळत असते. तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून जळगाव जिल्ह्यात वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडत आहे. असे असताना धरणगाव शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न निकाली निघालेला नाही. पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असताना केवळ योग्य नियोजनाअभावी नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा होऊ शकत नाही. कृत्रिम पाणी टंचाईला धरणगावकर कंटाळले आहेत. मागे भाजपनेही याविरूद्ध आंदोलन केले होते. मात्र उपयोग झाला नाही.

----

पाण्यासाठी नगराध्यक्षांनी पाठपुरावा करून पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते. परंतु, पालिकेतील राजकारणी गटा-तटाच्या राजकारणात गुंतले आहेत. आम्ही आधीही आंदोलन केली आहेत आणि पाणी न मिळाल्यास आणखी तीव्र आंदोलन करू

-ॲड. संजय महाजन

----

धरणगावच्या नागरिकांची संयमाची परीक्षा न घेता नगरपालिका प्रशासन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाणी प्रश्न हा कायमस्वरूपी सोडविण्याच्या दृष्टीने त्वरित पाऊल उचलावे हीच अपेक्षा.

चंदन पाटील

तालुका उपाध्यक्ष काँग्रेस

----

कुंभारवाड्यात सोळा दिवसांनंतर पाणीपुरवठा होत आहे. नगरपालिका प्रशासनाने आम्हांला पाण्याच्या प्रश्नावर न्याय मिळवून द्यावा, हीच माफक अपेक्षा असून अगदी गढूळ असेल तरी चालेल. पण आम्हांला आठ दिवसांनंतर पाणीपुरवठा करावा.

- भगवान कुंभार

सामान्य नागरिक धरणगाव

----

धरणगाव शहरात पाणीपुरवठा सुरळीत झाला पाहिजे. गेल्या अनेक वर्षांपासून धरणगावचा पाणीप्रश्न सुटलेला नाही, तो लवकरात लवकर सुरळीत करावा, हीच प्रशासनाला विनंती आहे.

राहुल पवार, धरणगाव