शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

नशिराबादला पाणीटंचाईच्या झळा तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:16 IST

नशिराबाद : वर्षानुवर्षे पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या नशिराबाद गावासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कार्यान्वित झाली नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत ...

नशिराबाद : वर्षानुवर्षे पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या नशिराबाद गावासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कार्यान्वित झाली नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. एप्रिल महिन्यात तब्बल आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. गावात पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्रोतांची पातळी खोल गेल्याने ग्रामस्थांना टंचाईची झळ बसत आहे. त्यातच ग्रामपंचायतीच्या नियोजनाअभावी ग्रामस्थांना शुद्ध पाण्यासाठी वंचित राहावे लागत आहे. संभाव्य पाणीटंचाईबाबत आतापासूनच नियोजन व्हावे, अशी मागणी आता ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून नशिराबादचा लौकिक आहे. मात्र नियोजनाअभावी ग्रामस्थ दरवर्षी पाणीटंचाईला तोंड देत असतात. ग्रामस्थ गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करीत आहे. निवडणुकीत ग्रामस्थांना पाणीसमस्येवर आश्वासने दिली जातात. मात्र आजपर्यंत कायमस्वरूपी पाणी योजना कार्यान्वित झालेली नाही. पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. जानेवारीपासूनच टंचाईची झळ ग्रामस्थांना बसत असते.

जलपातळी खालावल्याने हाल

सध्या गावात बेळी, मुर्दापूर, नशिराबाद पेठ या ठिकाणांहून पाणीपुरवठा होत आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून बेळी येथील वाघूर नदीपात्रातील विहिरीतील पातळी खोल गेल्याने पाणीटंचाईत भर पडली आहे. आता तब्बल आठव्या तर कधी नवव्या दिवशी ग्रामस्थांना पाणी मिळते. दरम्यान, मुर्दापूर धरणाजवळील विहिरीची जलपातळी वाढत्या उन्हाच्या तीव्रतेने खोल जाण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पाणीटंचाईची भीषणता वाढण्याची शक्यता आहे.

१६ कोटींची योजना पाण्यात

गावाच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा म्हणून सोळा कोटी रुपयांची पाणीयोजना मोठा गाजावाजा करीत कार्यान्वित करण्यात आली. मात्र सुरुवातीपासून आतापर्यंत अनेक अडथळ्यांचे विघ्न आल्याने शुद्ध पाण्यापासून ग्रामस्थ वंचितच राहिले. काही वर्षे ही योजना ‘मजीप्रा’ने हाताळली. आता ही योजना ग्रामपंचायतीच्या ताब्यात घेण्यात आली आहे. मात्र या योजनेसाठी लाखो रुपयांची वीज वापरली जाणार असल्यामुळे या योजनेची बिल ग्रामपंचायतीला परवडणारे नाही. लाखो रुपये थकीत असल्यामुळे शेळगाव येथील नशिराबादला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा वीजपुरवठा गेल्या महिन्यापासून खंडित केला आहे.

तहानलेल्यांसाठी हात सरसावतील का?

ऐन उन्हाळ्यात शुद्ध पाणी योजना थकीत वीज बिलामुळे बंद आहे. त्यामुळे ग्रामस्थ शुद्ध पाण्यापासून दीड महिन्यापासून वंचित आहेत. गावात अंधार असल्याने लोकप्रतिनिधींनी मदतीचा हात पुढे केला हे कौतुकास्पद आहे. त्याप्रमाणे त्यांचे हात पाण्यासाठीही सरसावतील, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.