शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

नशिराबादला पाणीटंचाईच्या झळा तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:16 IST

नशिराबाद : वर्षानुवर्षे पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या नशिराबाद गावासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कार्यान्वित झाली नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत ...

नशिराबाद : वर्षानुवर्षे पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या नशिराबाद गावासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कार्यान्वित झाली नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. एप्रिल महिन्यात तब्बल आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. गावात पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्रोतांची पातळी खोल गेल्याने ग्रामस्थांना टंचाईची झळ बसत आहे. त्यातच ग्रामपंचायतीच्या नियोजनाअभावी ग्रामस्थांना शुद्ध पाण्यासाठी वंचित राहावे लागत आहे. संभाव्य पाणीटंचाईबाबत आतापासूनच नियोजन व्हावे, अशी मागणी आता ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून नशिराबादचा लौकिक आहे. मात्र नियोजनाअभावी ग्रामस्थ दरवर्षी पाणीटंचाईला तोंड देत असतात. ग्रामस्थ गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करीत आहे. निवडणुकीत ग्रामस्थांना पाणीसमस्येवर आश्वासने दिली जातात. मात्र आजपर्यंत कायमस्वरूपी पाणी योजना कार्यान्वित झालेली नाही. पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. जानेवारीपासूनच टंचाईची झळ ग्रामस्थांना बसत असते.

जलपातळी खालावल्याने हाल

सध्या गावात बेळी, मुर्दापूर, नशिराबाद पेठ या ठिकाणांहून पाणीपुरवठा होत आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून बेळी येथील वाघूर नदीपात्रातील विहिरीतील पातळी खोल गेल्याने पाणीटंचाईत भर पडली आहे. आता तब्बल आठव्या तर कधी नवव्या दिवशी ग्रामस्थांना पाणी मिळते. दरम्यान, मुर्दापूर धरणाजवळील विहिरीची जलपातळी वाढत्या उन्हाच्या तीव्रतेने खोल जाण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पाणीटंचाईची भीषणता वाढण्याची शक्यता आहे.

१६ कोटींची योजना पाण्यात

गावाच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा म्हणून सोळा कोटी रुपयांची पाणीयोजना मोठा गाजावाजा करीत कार्यान्वित करण्यात आली. मात्र सुरुवातीपासून आतापर्यंत अनेक अडथळ्यांचे विघ्न आल्याने शुद्ध पाण्यापासून ग्रामस्थ वंचितच राहिले. काही वर्षे ही योजना ‘मजीप्रा’ने हाताळली. आता ही योजना ग्रामपंचायतीच्या ताब्यात घेण्यात आली आहे. मात्र या योजनेसाठी लाखो रुपयांची वीज वापरली जाणार असल्यामुळे या योजनेची बिल ग्रामपंचायतीला परवडणारे नाही. लाखो रुपये थकीत असल्यामुळे शेळगाव येथील नशिराबादला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा वीजपुरवठा गेल्या महिन्यापासून खंडित केला आहे.

तहानलेल्यांसाठी हात सरसावतील का?

ऐन उन्हाळ्यात शुद्ध पाणी योजना थकीत वीज बिलामुळे बंद आहे. त्यामुळे ग्रामस्थ शुद्ध पाण्यापासून दीड महिन्यापासून वंचित आहेत. गावात अंधार असल्याने लोकप्रतिनिधींनी मदतीचा हात पुढे केला हे कौतुकास्पद आहे. त्याप्रमाणे त्यांचे हात पाण्यासाठीही सरसावतील, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.