शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

आनंदनगर तांड्याला १५ वर्षापासून पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 22:04 IST

दुष्काळ आणि दुर्लक्ष या नैसर्गिक आणि मानवी समस्यांनी ग्रासलेल्या आनंदनगर तांड्यातील नागरिक त्रस्त होत आहेत.गेल्या १५ वर्षांपासून गावात भीषण पाणी टंचाई असताना लोकप्रतिनिधींकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देआनंदनगर तांड्याला दुष्काळाची झळ कायमलोकप्रतिनिधींना गावबंदीचा इशाराअधिग्रहीत विहिरीचे पाणी आटले

निपाणे, ता.एरंडोल : दुष्काळ आणि दुर्लक्ष या नैसर्गिक आणि मानवी समस्यांनी ग्रासलेल्या आनंदनगर तांड्यातील नागरिक त्रस्त होत आहेत.गेल्या १५ वर्षांपासून गावात भीषण पाणी टंचाई असताना लोकप्रतिनिधींकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे. पाणी टंचाई आणि रोजगाराचे साधन नसल्याने अर्धे गाव स्थलांतरीत झाल्याची भीषण स्थिती आहे.आनंदनगर तांडा हे आदिवासी बांधवांचे गाव आहे. गावातील १३० कुटुंबाची ८८९ लोकसंख्या आहे. गावावर दुष्काळाचे सावट असल्याने जवळपास ३०० ते ३५० नागरिक परराज्यात ऊस तोडण्यासाठी गेले आहेत. ३० कुटुंबांची घरे बंद आहेत.लोकप्रतिनिधींना गावबंदीचा इशाराआनंदनगर तांडा येथे सुमारे १५ वर्षांपासून भीषण पाणी टंचाई आहे. सन २०१७ मध्ये मुख्यमंत्री पेय जल योजनेत आनंदनगर गावाचा समावेश केला आहे. मात्र आतापर्यंत ही योजना पुढे सरकलेली नाही. लोकप्रतिनिधींच्या सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये संतप्त वातावरण आहे. त्यामुळे आगामी काळात लोकप्रतिनिधींना गावबंदी करीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा सरपंच वंदना राठोड, उपसरपंच ग्यारशीबाई राठोड, ग्रा.पं.सदस्य भास्कर राठोड, सामाजिक कार्यकर्ते भास्कर राठोड यांनी दिला आहे.निधीअभावी विकास कामे ठप्पगावातील पथदिव्याचे सिमेंट खांब व तार हे पूर्णपणे जीर्ण झाले आहे. काही खांब तुटलेले आहेत. भास्कर राठोड यांच्यासह काही ग्रामस्थांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना याबाबत लेखी व तोंडी तक्रार दिली आहे. मात्र त्यानंतरही कामे झाली नाही. भविष्यात मोठी हानी होण्याची शक्यता आहे.अधिग्रहीत विहिरीचे पाणी आटलेसन १९९५ पूर्र्वी आनंदनगर तांडा हे निपाणे ग्रुप ग्रामपंचायत होती. त्यानंतर आनंदनगर तांडा ही स्वतंत्र ग्राम पंचायत झाली. निपाणे वॉटर सप्लाय मार्फत तांड्यासाठी पाणी पुरवठा केला जात होता. मात्र निपाणे गावासाठी पाणी कमी पडु लागल्याने तांडाचे पाणी बंद करण्यात आले व १६ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेत आनंदनगर गावाचा समावेश करण्यात आला. परंतु १६ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची पाणी पट्टी महाग पडत असल्याने ही प्रादेशिक योजना बंद केली. त्यानंतर तांड्याला भीषण पाणी टंचाई जाणवू लागली. त्यानंतर माजी सरपंच विजय धनराज राठोड यांची विहीर अधिग्रहण केली. मात्र गेल्या २ ते ३ वर्षांपासून दुष्काळीस्थिती असल्याने विहिरीला देखील पाणी नाही.

टॅग्स :JalgaonजळगावWaterपाणी