शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आनंदनगर तांड्याला १५ वर्षापासून पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 22:04 IST

दुष्काळ आणि दुर्लक्ष या नैसर्गिक आणि मानवी समस्यांनी ग्रासलेल्या आनंदनगर तांड्यातील नागरिक त्रस्त होत आहेत.गेल्या १५ वर्षांपासून गावात भीषण पाणी टंचाई असताना लोकप्रतिनिधींकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देआनंदनगर तांड्याला दुष्काळाची झळ कायमलोकप्रतिनिधींना गावबंदीचा इशाराअधिग्रहीत विहिरीचे पाणी आटले

निपाणे, ता.एरंडोल : दुष्काळ आणि दुर्लक्ष या नैसर्गिक आणि मानवी समस्यांनी ग्रासलेल्या आनंदनगर तांड्यातील नागरिक त्रस्त होत आहेत.गेल्या १५ वर्षांपासून गावात भीषण पाणी टंचाई असताना लोकप्रतिनिधींकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे. पाणी टंचाई आणि रोजगाराचे साधन नसल्याने अर्धे गाव स्थलांतरीत झाल्याची भीषण स्थिती आहे.आनंदनगर तांडा हे आदिवासी बांधवांचे गाव आहे. गावातील १३० कुटुंबाची ८८९ लोकसंख्या आहे. गावावर दुष्काळाचे सावट असल्याने जवळपास ३०० ते ३५० नागरिक परराज्यात ऊस तोडण्यासाठी गेले आहेत. ३० कुटुंबांची घरे बंद आहेत.लोकप्रतिनिधींना गावबंदीचा इशाराआनंदनगर तांडा येथे सुमारे १५ वर्षांपासून भीषण पाणी टंचाई आहे. सन २०१७ मध्ये मुख्यमंत्री पेय जल योजनेत आनंदनगर गावाचा समावेश केला आहे. मात्र आतापर्यंत ही योजना पुढे सरकलेली नाही. लोकप्रतिनिधींच्या सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये संतप्त वातावरण आहे. त्यामुळे आगामी काळात लोकप्रतिनिधींना गावबंदी करीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा सरपंच वंदना राठोड, उपसरपंच ग्यारशीबाई राठोड, ग्रा.पं.सदस्य भास्कर राठोड, सामाजिक कार्यकर्ते भास्कर राठोड यांनी दिला आहे.निधीअभावी विकास कामे ठप्पगावातील पथदिव्याचे सिमेंट खांब व तार हे पूर्णपणे जीर्ण झाले आहे. काही खांब तुटलेले आहेत. भास्कर राठोड यांच्यासह काही ग्रामस्थांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना याबाबत लेखी व तोंडी तक्रार दिली आहे. मात्र त्यानंतरही कामे झाली नाही. भविष्यात मोठी हानी होण्याची शक्यता आहे.अधिग्रहीत विहिरीचे पाणी आटलेसन १९९५ पूर्र्वी आनंदनगर तांडा हे निपाणे ग्रुप ग्रामपंचायत होती. त्यानंतर आनंदनगर तांडा ही स्वतंत्र ग्राम पंचायत झाली. निपाणे वॉटर सप्लाय मार्फत तांड्यासाठी पाणी पुरवठा केला जात होता. मात्र निपाणे गावासाठी पाणी कमी पडु लागल्याने तांडाचे पाणी बंद करण्यात आले व १६ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेत आनंदनगर गावाचा समावेश करण्यात आला. परंतु १६ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची पाणी पट्टी महाग पडत असल्याने ही प्रादेशिक योजना बंद केली. त्यानंतर तांड्याला भीषण पाणी टंचाई जाणवू लागली. त्यानंतर माजी सरपंच विजय धनराज राठोड यांची विहीर अधिग्रहण केली. मात्र गेल्या २ ते ३ वर्षांपासून दुष्काळीस्थिती असल्याने विहिरीला देखील पाणी नाही.

टॅग्स :JalgaonजळगावWaterपाणी