शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

जळगाव जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 11:59 IST

खरीप दुष्काळ अनुदानाचे ९९.६१ टक्के वाटप पूर्ण

जळगाव : जिल्ह्यातील १५ पैकी १३ तालुके पूर्णपणे दुष्काळी तसेच उर्वरीत दोन तालुक्यांनाही पैसेवारी कमी आल्याने दुष्काळाचे निकष लागू झालेले असल्याने संपूर्ण जिल्ह्यातच परिस्थिती गंभीर आहे. दुष्काळ जाहीर झालेल्या १३ तालुक्यातील खरीपाचे नुकसान झालेल्या ५ लाख ८२ हजार १४६ शेतकऱ्यांना खरीप दुष्काळी अनुदानाचे ३८६ कोटी ३८ लाख ५८ हजार ७५३ रूपयांचे म्हणजेच ९९.६१ टक्के रक्कमेचे वाटप करण्यात आले असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. मात्र जिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर असून १९३ गावांना सध्या १७५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार जिल्ह्याचे पालक सचिव राजेशकुमार मीना हे बुधवार, १५ रोजी जिल्हा दौºयावर येत असून ते सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी दालनात दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.जिल्ह्यात सरासरीच्या जेमतेम ६८ टक्केच पाऊस झाल्याने यंदा गत १५ वर्षातील गंभीर दुष्काळ पडला असून आहे. त्यापैकी जळगाव, जामनेर, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, पारोळा, यावल, रावेर, अमळनेर, चोपडा, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव या १३ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. तर एरंडोल व धरणगाव हे तालुके मात्र केंद्र शासनाच्या निकषात न बसल्याने वगळण्यात आले. मात्र या दोन तालुक्यांमध्ये देखील पीक पैसेवारी ५० टक्क्यांच्या आतच आली आहे. मात्र खरीप दुष्काळ अनुदान मात्र १३ तालुक्यातील बाधीत शेतकऱ्यांनाच वाटप करण्यात आले आहे.५ लाख ८२ हजार शेतकºयांना दुष्काळ अनुदान वाटपजिल्ह्यातील दुष्काळ जाहीर झालेल्या १३ तालुक्यातील १३४६ गावांमधील ५ लाख ८२ हजार १४६ शेतकºयांना खरीप दुष्काळ अनुदान वाटप करण्यासाठी शासनाकडून ४०४ कोटी ६१ लाख ४१ हजार २८० रूपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्यातून ३८६ कोटी ३८ लाख ५८ हजार ७५३ रूपये इतका निधी दुष्काळ अनुदान म्हणून वाटप करण्यात आला आहे. तर प्रशासकीय खर्चाचे ५९ लाख ९४ हजार ८०० रूपये वगळण्यात आले आहेत. तसेच १७ कोटी ६२ लाख ८७हजारांचा निधी आवश्यकता नसल्याने शासनाला परत करण्यात आला आहे. १३ पैकी भुसावळ व बोदवड तालुका वगळता उर्वरीत ११ तालुक्यांमध्ये १०० टक्के अनुदानाचे वाटप झाले असून भुसावळमध्ये ९५.१३ टक्के तर बोदवड तालुक्यात ९४.०१ टक्के अनुदानाचे वाटप झाले आहे.बोंडअळी अनुदान वितरणाची आकडेवारीच नाहीमागील वर्षी बोंडअळीमुळे कपाशी पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यातील शेतकºयांना वाटपासाठी ४३९ कोटी ४० लाख ८० हजारांचे वितरण जिल्हा प्रशासनाकडून तालुकास्तरावर वितरीत करण्यात आले आहे. मात्र तालुकास्तरावरून किती शेतकºयांना त्याचे वितरण झाले? याची आकडेवारीच जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेली नाही. तहसीलदारांकडून ही माहिती मागवूनही तातडीने सादर करण्यात आलेली नाही. निवडणुकीच्या कामाचे कारण त्यासाठी पुढे केले जात आहे.२७१ गावांसाठी २७८ विहिरींचे अधिग्रहणजिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर आहे. जोरदार पाऊस न झाल्याने धरण, बंधाºयांमध्ये ठणठणाट आहे. मोजक्या धरणांमध्येच पाणी शिल्लक आहे. त्यामुळे १९३ गावांना १७५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सध्या सुरू आहे. तर २७१ गावांसाठी २७८ विहिरी अधिग्रहित करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ५४ गावांसाठी ५१ तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहेत. तर ६१ गवांसाठी १११ नवीन विंधन विहिरी तर ४२ गावांना ५८ नवीन कपूनलिका घेण्यात आल्या आहेत. ४८ गावांमध्ये ४८ विहिरींचे खोलीकरण करण्यात आले आहे. तर २ गावांना २ नळपाणी योजनांची दुरूस्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव