शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

‘गूळ’चे पाणी धावडापर्यंत पोहोचले...धरणगावचे प्रश्न महिनाभर मिटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 20:17 IST

धरणगाव शहराचा पाणीपुरवठा सुरळीत रहावा, यासाठी गूळ मध्यम प्रकल्पातून पहिले आवर्तन शनिवारी सोडण्यात आले.

ठळक मुद्दे मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंतचे पाण्याची समस्या दूर.अजून एक आवर्तन सुरक्षित.

लोकमत न्यूज नेटवर्क

धरणगाव : शहराचा पाणीपुरवठा सुरळीत रहावा, यासाठी गूळ मध्यम प्रकल्पातून पहिले आवर्तन शनिवारी सोडण्यात आले. गूळचे पाणी रविवारी दुपारी तापीच्या धावडा डोहापर्यंत पोहोचले आहे. यामुळे आता मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंतचे पाण्याची समस्या दूर झाली आहे. गूळ प्रकल्पाच्या जलसाठ्यात धरणगाव पाणीपुरवठा योजनेचे आरक्षण आहे. येथून दोन आवर्तन शहराला मिळतात. अजून एक आवर्तन सुरक्षित असल्यामुळे धरणगावकरांची पिण्याच्या पाण्यासाठी भर उन्हाळ्यातील भटकंती टळणार असल्याचा आशावाद नगराध्यक्ष नीलेश चौधरी यांनी बोलून दाखविला.

धरणगाव शहराला तापीच्या धावडा डोहातून पाणीपुरवठा होत असतो. मार्चपर्यंत या डोहातील पाणी पुरते. मात्र, यानंतर पात्र कोरडे पडल्याने पाणीपुरवठा ठप्प होत असतो. परिणामी, गूळ मध्यम प्रकल्पावर धरणगावसाठी दोन आवर्तन राखीव करण्यात आले आहे. गूळ प्रकल्पातून नदीच्या पात्राद्वारे हे पाणी धावडा डोहापर्यंत येत असते. हा डोह भरला, म्हणजे महिनाभर धरणगाव शहराला सुरळीत पाणीपुरवठा होत असतो.

अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यामुळे यंदा अंजनीतूनही शहरासाठी एक आवर्तन मिळाल्यामुळे गूळचे आवर्तन उशिरा घेतल्याचे नगराध्यक्ष नीलेश चौधरी यांनी सांगितले. धावडा येथील पाइपलाइनमधून गाळ काढण्यात आल्यामुळे, आता एप्रिल आणि मेच्या रणरणत्या उन्हाळ्यात पाणीपुरवठ्यात कोणतीच अडचण येणार नसल्याचे सांगून, आज डोहात आलेले पाणी महिनाभर पुरवणार असल्यामुळे पुढचे आवर्तन आता मे महिन्याचा दुसऱ्या आठवड्यात घ्यावे लागले. हे पाणी महिनाभर पुरेल. परिणामी, जूनमध्ये पावसाळा लांबला, तरी १५ जूनपर्यंत धरणगावकरांना त्यांच्या हक्काचे पाणी पुरवणार असल्याचे नीलेश चौधरी यांनी सांगितले.

नागरिकांची निकड भागू शकेल, एवढंच पाणी जूनपर्यंत मिळणार आहे. पाणी जपूनच वापरावे लागणार आहे. नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा बसू नये, यासाठी गटनेते पप्पू भावे, उपनगराध्यक्षा कल्पना महाजन व सर्व नगरसेवक, पाणीपुरवठा कर्मचारी परिश्रम घेत आहे. वैयक्तिक माझे २४ तास या संपूर्ण यंत्रणेवर लक्ष आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन शेवटी नगराध्यक्ष नीलेश चौधरी यांनी केले आहे.

टॅग्स :JalgaonजळगावDharangaonधरणगावwater shortageपाणीकपात