शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

‘गूळ’चे पाणी धावडापर्यंत पोहोचले...धरणगावचे प्रश्न महिनाभर मिटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 20:17 IST

धरणगाव शहराचा पाणीपुरवठा सुरळीत रहावा, यासाठी गूळ मध्यम प्रकल्पातून पहिले आवर्तन शनिवारी सोडण्यात आले.

ठळक मुद्दे मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंतचे पाण्याची समस्या दूर.अजून एक आवर्तन सुरक्षित.

लोकमत न्यूज नेटवर्क

धरणगाव : शहराचा पाणीपुरवठा सुरळीत रहावा, यासाठी गूळ मध्यम प्रकल्पातून पहिले आवर्तन शनिवारी सोडण्यात आले. गूळचे पाणी रविवारी दुपारी तापीच्या धावडा डोहापर्यंत पोहोचले आहे. यामुळे आता मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंतचे पाण्याची समस्या दूर झाली आहे. गूळ प्रकल्पाच्या जलसाठ्यात धरणगाव पाणीपुरवठा योजनेचे आरक्षण आहे. येथून दोन आवर्तन शहराला मिळतात. अजून एक आवर्तन सुरक्षित असल्यामुळे धरणगावकरांची पिण्याच्या पाण्यासाठी भर उन्हाळ्यातील भटकंती टळणार असल्याचा आशावाद नगराध्यक्ष नीलेश चौधरी यांनी बोलून दाखविला.

धरणगाव शहराला तापीच्या धावडा डोहातून पाणीपुरवठा होत असतो. मार्चपर्यंत या डोहातील पाणी पुरते. मात्र, यानंतर पात्र कोरडे पडल्याने पाणीपुरवठा ठप्प होत असतो. परिणामी, गूळ मध्यम प्रकल्पावर धरणगावसाठी दोन आवर्तन राखीव करण्यात आले आहे. गूळ प्रकल्पातून नदीच्या पात्राद्वारे हे पाणी धावडा डोहापर्यंत येत असते. हा डोह भरला, म्हणजे महिनाभर धरणगाव शहराला सुरळीत पाणीपुरवठा होत असतो.

अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यामुळे यंदा अंजनीतूनही शहरासाठी एक आवर्तन मिळाल्यामुळे गूळचे आवर्तन उशिरा घेतल्याचे नगराध्यक्ष नीलेश चौधरी यांनी सांगितले. धावडा येथील पाइपलाइनमधून गाळ काढण्यात आल्यामुळे, आता एप्रिल आणि मेच्या रणरणत्या उन्हाळ्यात पाणीपुरवठ्यात कोणतीच अडचण येणार नसल्याचे सांगून, आज डोहात आलेले पाणी महिनाभर पुरवणार असल्यामुळे पुढचे आवर्तन आता मे महिन्याचा दुसऱ्या आठवड्यात घ्यावे लागले. हे पाणी महिनाभर पुरेल. परिणामी, जूनमध्ये पावसाळा लांबला, तरी १५ जूनपर्यंत धरणगावकरांना त्यांच्या हक्काचे पाणी पुरवणार असल्याचे नीलेश चौधरी यांनी सांगितले.

नागरिकांची निकड भागू शकेल, एवढंच पाणी जूनपर्यंत मिळणार आहे. पाणी जपूनच वापरावे लागणार आहे. नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा बसू नये, यासाठी गटनेते पप्पू भावे, उपनगराध्यक्षा कल्पना महाजन व सर्व नगरसेवक, पाणीपुरवठा कर्मचारी परिश्रम घेत आहे. वैयक्तिक माझे २४ तास या संपूर्ण यंत्रणेवर लक्ष आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन शेवटी नगराध्यक्ष नीलेश चौधरी यांनी केले आहे.

टॅग्स :JalgaonजळगावDharangaonधरणगावwater shortageपाणीकपात