शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

‘गूळ’चे पाणी धावडापर्यंत पोहोचले...धरणगावचे प्रश्न महिनाभर मिटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 20:17 IST

धरणगाव शहराचा पाणीपुरवठा सुरळीत रहावा, यासाठी गूळ मध्यम प्रकल्पातून पहिले आवर्तन शनिवारी सोडण्यात आले.

ठळक मुद्दे मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंतचे पाण्याची समस्या दूर.अजून एक आवर्तन सुरक्षित.

लोकमत न्यूज नेटवर्क

धरणगाव : शहराचा पाणीपुरवठा सुरळीत रहावा, यासाठी गूळ मध्यम प्रकल्पातून पहिले आवर्तन शनिवारी सोडण्यात आले. गूळचे पाणी रविवारी दुपारी तापीच्या धावडा डोहापर्यंत पोहोचले आहे. यामुळे आता मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंतचे पाण्याची समस्या दूर झाली आहे. गूळ प्रकल्पाच्या जलसाठ्यात धरणगाव पाणीपुरवठा योजनेचे आरक्षण आहे. येथून दोन आवर्तन शहराला मिळतात. अजून एक आवर्तन सुरक्षित असल्यामुळे धरणगावकरांची पिण्याच्या पाण्यासाठी भर उन्हाळ्यातील भटकंती टळणार असल्याचा आशावाद नगराध्यक्ष नीलेश चौधरी यांनी बोलून दाखविला.

धरणगाव शहराला तापीच्या धावडा डोहातून पाणीपुरवठा होत असतो. मार्चपर्यंत या डोहातील पाणी पुरते. मात्र, यानंतर पात्र कोरडे पडल्याने पाणीपुरवठा ठप्प होत असतो. परिणामी, गूळ मध्यम प्रकल्पावर धरणगावसाठी दोन आवर्तन राखीव करण्यात आले आहे. गूळ प्रकल्पातून नदीच्या पात्राद्वारे हे पाणी धावडा डोहापर्यंत येत असते. हा डोह भरला, म्हणजे महिनाभर धरणगाव शहराला सुरळीत पाणीपुरवठा होत असतो.

अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यामुळे यंदा अंजनीतूनही शहरासाठी एक आवर्तन मिळाल्यामुळे गूळचे आवर्तन उशिरा घेतल्याचे नगराध्यक्ष नीलेश चौधरी यांनी सांगितले. धावडा येथील पाइपलाइनमधून गाळ काढण्यात आल्यामुळे, आता एप्रिल आणि मेच्या रणरणत्या उन्हाळ्यात पाणीपुरवठ्यात कोणतीच अडचण येणार नसल्याचे सांगून, आज डोहात आलेले पाणी महिनाभर पुरवणार असल्यामुळे पुढचे आवर्तन आता मे महिन्याचा दुसऱ्या आठवड्यात घ्यावे लागले. हे पाणी महिनाभर पुरेल. परिणामी, जूनमध्ये पावसाळा लांबला, तरी १५ जूनपर्यंत धरणगावकरांना त्यांच्या हक्काचे पाणी पुरवणार असल्याचे नीलेश चौधरी यांनी सांगितले.

नागरिकांची निकड भागू शकेल, एवढंच पाणी जूनपर्यंत मिळणार आहे. पाणी जपूनच वापरावे लागणार आहे. नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा बसू नये, यासाठी गटनेते पप्पू भावे, उपनगराध्यक्षा कल्पना महाजन व सर्व नगरसेवक, पाणीपुरवठा कर्मचारी परिश्रम घेत आहे. वैयक्तिक माझे २४ तास या संपूर्ण यंत्रणेवर लक्ष आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन शेवटी नगराध्यक्ष नीलेश चौधरी यांनी केले आहे.

टॅग्स :JalgaonजळगावDharangaonधरणगावwater shortageपाणीकपात