शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

सिखवाल नगरात पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:16 IST

मनपाचे दुर्लक्ष : लोकप्रतिनिधींकडून फक्त आश्वासन, मात्र उपाययोजना नाही जळगाव : शहरातील प्रजापत नगरला लागून असलेल्या सिखवाल नगरात गेल्या ...

मनपाचे दुर्लक्ष : लोकप्रतिनिधींकडून फक्त आश्वासन, मात्र उपाययोजना नाही

जळगाव : शहरातील प्रजापत नगरला लागून असलेल्या सिखवाल नगरात गेल्या अनेक वर्षांपासून मनपातर्फे परिसरात पिण्याच्या पाईप लाईनही न टाकण्यात आल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. पाण्याच्या टंचाईबाबत अनेकदा लोकप्रतिनिधीनी आश्वासने दिली. मात्र, गेल्या दहा वर्षांत एकाही लोकप्रतिनिधींने आश्वासन पूर्ण केले नसल्याची खंत सिखवाल नगरातील रहिवाशांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर या परिसरात नागरी वस्ती वाढली. मात्र, येथील रस्ते, गटारी आणि पिण्याच्या पाण्याची समस्या आजही जैसे थे आहे. सध्या उन्हाळा सुरू असल्याने येथील पिण्याच्या पाण्याची समस्या अधिकच बिकट झाली आहे. मनपातर्फे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे येथील नागरिकांना बोअरवेलचे पाणी प्यावे लागत आहे व वापरण्यासाठीही तेच पाणी वापरावे लागत आहे. मात्र, उन्हाळ्यात या भागातील बहुतांश नागरिकांच्या बोअरवेलचे पाणी कमी झाल्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. यामुळे टँकरने विकतचे पाणी घ्यावे लागत असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले.

इन्फो :

दहा वर्षांत लोकप्रतिनिधींकडून फक्त आश्वासनचं

या भागातील रहिवाशांनी सांगितले की, निवडणुकीच्या वेळी मते मागण्यासाठी येणाऱ्या लोकप्रतिनिधी यांना पाण्याच्या समस्यांबाबत सांगितल्यावर त्यांनी निवडून आल्यानंतर तत्काळ पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. मात्र, दहा वर्षांत निवडणुका झाल्यानंतर निवडून येणाऱ्यांनी अद्याप पाण्याचा प्रश्न सोडविला नाही. विशेष म्हणजे निवडणुकी नंतर हे लोकप्रतिनिधी वाॅर्डात कधी फिरकलेही नसल्याचेही या रहिवाशांनी सांगितले.

इन्फो :

गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. त्यामुळे बोअरवेलचे पाणी वापरावे लागत आहे. उन्हाळ्यातही या बोअरवेल आटत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे खूपच हाल होत आहेत.

-उमाकांत उपाध्ये, रहिवासी

गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात पिण्याच्या पाण्यासह रस्ते व गटारींचीही समस्या सुटलेली नाही. मनपाचे व लोकप्रतिनिधी यांचे येथील समस्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. येथील सर्व समस्या माहीत असतांनाही लोकप्रतिनिधी यांनी दखल घेतली नाही.

-छगन धनगर, रहिवासी

पिण्याच्या पाण्याची मनपाने पाइप लाईन न टाकल्यामुळे बोअरवेलचे पाणी पिण्यासाठी वापरावे लागते. उन्हाळ्यात तेही पाणी कमी होते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होतात. मनपा व लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

-कल्पना सूर्यवंशी, रहिवासी

सिखवाल नगरमध्ये तीन कोटींच्या निधीतून रस्ते व गटारींचे कामे केली जाणार असून, निविदा प्रक्रियानंतर या कामाला सुरुवात होईल. तसेच अमृत योजने अंतर्गत लवकरच पिण्याच्या पाण्याचीही समस्या सुटेल.

-किशोर बाविस्कर, नगरसेवक

मनपातर्फे पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्यामुळे खूप हाल होत आहेत. त्यामुळे बोअरवेलचे पाणी वापरावे लागत आहे. मनपा प्रशासनाने तातडीने पाण्याची समस्या सोडावी, ही आमची मागणी आहे.

-रेखा राजपूत, रहिवासी