शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
2
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
3
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
4
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
5
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
6
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
7
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
8
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
9
"राखी आहे, पण मिठी नाही...", रुचिता जाधवची रक्षाबंधननिमित्त भावासाठी खास पोस्ट
10
नरसिंह रावांसारखे धाडस नरेंद्र मोदी दाखवतील?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
12
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
13
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
14
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
15
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
16
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
17
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
18
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
19
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
20
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी

सिखवाल नगरात पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:16 IST

मनपाचे दुर्लक्ष : लोकप्रतिनिधींकडून फक्त आश्वासन, मात्र उपाययोजना नाही जळगाव : शहरातील प्रजापत नगरला लागून असलेल्या सिखवाल नगरात गेल्या ...

मनपाचे दुर्लक्ष : लोकप्रतिनिधींकडून फक्त आश्वासन, मात्र उपाययोजना नाही

जळगाव : शहरातील प्रजापत नगरला लागून असलेल्या सिखवाल नगरात गेल्या अनेक वर्षांपासून मनपातर्फे परिसरात पिण्याच्या पाईप लाईनही न टाकण्यात आल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. पाण्याच्या टंचाईबाबत अनेकदा लोकप्रतिनिधीनी आश्वासने दिली. मात्र, गेल्या दहा वर्षांत एकाही लोकप्रतिनिधींने आश्वासन पूर्ण केले नसल्याची खंत सिखवाल नगरातील रहिवाशांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर या परिसरात नागरी वस्ती वाढली. मात्र, येथील रस्ते, गटारी आणि पिण्याच्या पाण्याची समस्या आजही जैसे थे आहे. सध्या उन्हाळा सुरू असल्याने येथील पिण्याच्या पाण्याची समस्या अधिकच बिकट झाली आहे. मनपातर्फे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे येथील नागरिकांना बोअरवेलचे पाणी प्यावे लागत आहे व वापरण्यासाठीही तेच पाणी वापरावे लागत आहे. मात्र, उन्हाळ्यात या भागातील बहुतांश नागरिकांच्या बोअरवेलचे पाणी कमी झाल्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. यामुळे टँकरने विकतचे पाणी घ्यावे लागत असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले.

इन्फो :

दहा वर्षांत लोकप्रतिनिधींकडून फक्त आश्वासनचं

या भागातील रहिवाशांनी सांगितले की, निवडणुकीच्या वेळी मते मागण्यासाठी येणाऱ्या लोकप्रतिनिधी यांना पाण्याच्या समस्यांबाबत सांगितल्यावर त्यांनी निवडून आल्यानंतर तत्काळ पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. मात्र, दहा वर्षांत निवडणुका झाल्यानंतर निवडून येणाऱ्यांनी अद्याप पाण्याचा प्रश्न सोडविला नाही. विशेष म्हणजे निवडणुकी नंतर हे लोकप्रतिनिधी वाॅर्डात कधी फिरकलेही नसल्याचेही या रहिवाशांनी सांगितले.

इन्फो :

गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. त्यामुळे बोअरवेलचे पाणी वापरावे लागत आहे. उन्हाळ्यातही या बोअरवेल आटत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे खूपच हाल होत आहेत.

-उमाकांत उपाध्ये, रहिवासी

गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात पिण्याच्या पाण्यासह रस्ते व गटारींचीही समस्या सुटलेली नाही. मनपाचे व लोकप्रतिनिधी यांचे येथील समस्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. येथील सर्व समस्या माहीत असतांनाही लोकप्रतिनिधी यांनी दखल घेतली नाही.

-छगन धनगर, रहिवासी

पिण्याच्या पाण्याची मनपाने पाइप लाईन न टाकल्यामुळे बोअरवेलचे पाणी पिण्यासाठी वापरावे लागते. उन्हाळ्यात तेही पाणी कमी होते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होतात. मनपा व लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

-कल्पना सूर्यवंशी, रहिवासी

सिखवाल नगरमध्ये तीन कोटींच्या निधीतून रस्ते व गटारींचे कामे केली जाणार असून, निविदा प्रक्रियानंतर या कामाला सुरुवात होईल. तसेच अमृत योजने अंतर्गत लवकरच पिण्याच्या पाण्याचीही समस्या सुटेल.

-किशोर बाविस्कर, नगरसेवक

मनपातर्फे पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्यामुळे खूप हाल होत आहेत. त्यामुळे बोअरवेलचे पाणी वापरावे लागत आहे. मनपा प्रशासनाने तातडीने पाण्याची समस्या सोडावी, ही आमची मागणी आहे.

-रेखा राजपूत, रहिवासी