शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पारोळा तालुक्यातील सांगवी येथे पाण्यासाठी दाही दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 15:55 IST

दोन योजना ठरल्या अयशस्वी

पारोळा : सांगवी, ता. पारोळा येथे जानेवारी महिन्यापासून गावाला शासकीय टँकरने पाणीपुरवठा केला जात असून गेल्या तीन महिन्यांपासून पाणीटंचाइमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. गावाच्या दोन्ही बाजूला असलेल्या दोन विहिरीत टँकरने पाणी आणून टाकले जाते, मात्र ते बोरी धरणावरून आणून थेट गावाच्या विहिरीत टाकले जात असल्याने अशुद्ध पाण्यावर शुद्धीकरणासाठी कोणतीही प्रकिया होत नसल्याने त्याचा पिण्यासाठी उपयोग होत नसल्याने समस्यांमध्ये अधिक भर पडते. हे पाणी केवळ गुरांना पिण्यासाठी, सांडपाणी, कपडे धुणे, अंघोळीसाठी वापरले जाते.पाण्यासाठी कसरतटँकर गावात आले म्हणजे विहिरीवर पाणी भरण्यासाठी एकच झुंबड उडते. सर्वजण दोर-बादलीने पाणी तोलून काढतात. पाणी भरण्यासाठी सर्वात जास्त गर्दी ही महिला वर्गाची असते. या गर्दीत मोठा धोका पत्करत पाण्यासाठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र या गावात आहे.गावात दोन पाणीपुरवठा योजना बंदगावाला पाणीपुरवठ्यासाठी २००३-०४मध्ये २२ लाखांची भारत निर्माण योजना राबविली गेली. पण ही योजना विहिरीत पाणी नसल्याने बंद पडली ती कायमची. त्यानंतर गावात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी २०१४ -१५मध्ये राष्ट्रीय पाणीपुरवठा पेयजल योजना सुमारे २५ लाखांची योजना मिळाली. पण गावाला पुरेसे पाणी मिळण्या आधीच त्या योजनेचा बोजवारा उडाला. त्यानंतर ५१ हजारांची दलित वस्ती सुधार योजना मिळाली पण तिचाही उपयोग झाला नाही. आता या भीषण पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ६५ लाखांची राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाली आहे. मात्र तीदेखील लालफितीत अडकली आहे.पिण्यासाठी विकतचे पाणीसांगवी गावात २० रुपयेप्रमाणे पारोळा येथून पाणी विकत घेऊन पित आहेत. अशुद्ध पाणी पिऊन दवाखाना भरण्यापेक्षा विकतचे पाणी घेऊन पिलेले बरे असा सूर ग्रामस्थांकडून उमटला. जे पाणी विकत घेऊ शकत नाही ते दिवसभर रणरणत्या उन्हात दाही दिशांना रानावनात हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करतात.पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळावीगावाला तीव्र पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. शेतातील विहिरीवरून पिण्यासाठी पाणी आणत आहे. सांगवी गावाला राष्ट्रीय पेयजल ६५ लाखांची योजना मंजूर व्हावी यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. आचारसंहितामुळे रखडला आहे. ही योजना लवकर मंजूर व्हावी, अशी मागणी सरपंच महेंद्र शालीग्राम पाटील यांनी केली.टँकरची वाट पाहावी लागतेदिवसभराचे उद्योग व्यवसाय सोडून पाण्याचे टँकर येण्याची वाट पहात राहावी लागते. टँकर येताच पाणी भरण्यासाठी एकच गर्दी होते. विहिरीतून पाणी तोलून काढावे लागते. यामुळे खूप दमछाक होते. कोणता दिवस उजडेल की त्या दिवशी नळांना पाणी येईल याची आम्ही सर्व महिला प्रतीक्षा करीत आहे, असे सुनिता राठोड यांनी सांगितले.हंडाभर पाण्यासाठी रानावनात भटकंतीसांडपाण्यासाठी टँकरने आलेल्या पाण्याचा उपयोग होतो. मात्र पिण्याच्या पाण्यासाठी रानावनात रणरणत्या उन्हात भटकंती करावी लागते. अनेक विहिरींनी तळ गाठला आहे. दोन-चार दिवसांनी पाणी असलेल्या विहिरींचा शोध घ्यावा लागतो आणि त्यातच दिवस मात्र निघून जातो, असे शेतकरी श्रीराम भिवसन पाटील यांनी सांगितले.पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रयत्नसांगवी गावात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासकीय टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. गावालगत असलेल्या धरणात असलेली पाणीपुरवठा विहीरीत आडवे बोअर, उभे बोअर करणे सूचविले आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ग्रामसेवक नीलेश साळुंखे यांनी सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव