शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

पारोळा तालुक्यातील सांगवी येथे पाण्यासाठी दाही दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 15:55 IST

दोन योजना ठरल्या अयशस्वी

पारोळा : सांगवी, ता. पारोळा येथे जानेवारी महिन्यापासून गावाला शासकीय टँकरने पाणीपुरवठा केला जात असून गेल्या तीन महिन्यांपासून पाणीटंचाइमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. गावाच्या दोन्ही बाजूला असलेल्या दोन विहिरीत टँकरने पाणी आणून टाकले जाते, मात्र ते बोरी धरणावरून आणून थेट गावाच्या विहिरीत टाकले जात असल्याने अशुद्ध पाण्यावर शुद्धीकरणासाठी कोणतीही प्रकिया होत नसल्याने त्याचा पिण्यासाठी उपयोग होत नसल्याने समस्यांमध्ये अधिक भर पडते. हे पाणी केवळ गुरांना पिण्यासाठी, सांडपाणी, कपडे धुणे, अंघोळीसाठी वापरले जाते.पाण्यासाठी कसरतटँकर गावात आले म्हणजे विहिरीवर पाणी भरण्यासाठी एकच झुंबड उडते. सर्वजण दोर-बादलीने पाणी तोलून काढतात. पाणी भरण्यासाठी सर्वात जास्त गर्दी ही महिला वर्गाची असते. या गर्दीत मोठा धोका पत्करत पाण्यासाठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र या गावात आहे.गावात दोन पाणीपुरवठा योजना बंदगावाला पाणीपुरवठ्यासाठी २००३-०४मध्ये २२ लाखांची भारत निर्माण योजना राबविली गेली. पण ही योजना विहिरीत पाणी नसल्याने बंद पडली ती कायमची. त्यानंतर गावात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी २०१४ -१५मध्ये राष्ट्रीय पाणीपुरवठा पेयजल योजना सुमारे २५ लाखांची योजना मिळाली. पण गावाला पुरेसे पाणी मिळण्या आधीच त्या योजनेचा बोजवारा उडाला. त्यानंतर ५१ हजारांची दलित वस्ती सुधार योजना मिळाली पण तिचाही उपयोग झाला नाही. आता या भीषण पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ६५ लाखांची राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाली आहे. मात्र तीदेखील लालफितीत अडकली आहे.पिण्यासाठी विकतचे पाणीसांगवी गावात २० रुपयेप्रमाणे पारोळा येथून पाणी विकत घेऊन पित आहेत. अशुद्ध पाणी पिऊन दवाखाना भरण्यापेक्षा विकतचे पाणी घेऊन पिलेले बरे असा सूर ग्रामस्थांकडून उमटला. जे पाणी विकत घेऊ शकत नाही ते दिवसभर रणरणत्या उन्हात दाही दिशांना रानावनात हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करतात.पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळावीगावाला तीव्र पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. शेतातील विहिरीवरून पिण्यासाठी पाणी आणत आहे. सांगवी गावाला राष्ट्रीय पेयजल ६५ लाखांची योजना मंजूर व्हावी यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. आचारसंहितामुळे रखडला आहे. ही योजना लवकर मंजूर व्हावी, अशी मागणी सरपंच महेंद्र शालीग्राम पाटील यांनी केली.टँकरची वाट पाहावी लागतेदिवसभराचे उद्योग व्यवसाय सोडून पाण्याचे टँकर येण्याची वाट पहात राहावी लागते. टँकर येताच पाणी भरण्यासाठी एकच गर्दी होते. विहिरीतून पाणी तोलून काढावे लागते. यामुळे खूप दमछाक होते. कोणता दिवस उजडेल की त्या दिवशी नळांना पाणी येईल याची आम्ही सर्व महिला प्रतीक्षा करीत आहे, असे सुनिता राठोड यांनी सांगितले.हंडाभर पाण्यासाठी रानावनात भटकंतीसांडपाण्यासाठी टँकरने आलेल्या पाण्याचा उपयोग होतो. मात्र पिण्याच्या पाण्यासाठी रानावनात रणरणत्या उन्हात भटकंती करावी लागते. अनेक विहिरींनी तळ गाठला आहे. दोन-चार दिवसांनी पाणी असलेल्या विहिरींचा शोध घ्यावा लागतो आणि त्यातच दिवस मात्र निघून जातो, असे शेतकरी श्रीराम भिवसन पाटील यांनी सांगितले.पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रयत्नसांगवी गावात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासकीय टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. गावालगत असलेल्या धरणात असलेली पाणीपुरवठा विहीरीत आडवे बोअर, उभे बोअर करणे सूचविले आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ग्रामसेवक नीलेश साळुंखे यांनी सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव