शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शहरावरील पाणी कपातीचे संकट काहीअंशी टळले आहे.

By admin | Updated: September 21, 2015 00:23 IST

खोलघर व आंबेबारा भरले : वीरचक प्रकल्पातही वाढतेय पाणीपातळी खोलघर व आंबेबारा भरले : वीरचक प्रकल्पातही वाढतेय पाणीपातळी

नंदुरबार :  शहराला पाणीपुरवठा करणारे आंबेबारा धरण 90 टक्केपेक्षा अधिक भरले आहे. तर वीरचक प्रकल्पातील पाणीसाठय़ात दोन मीटरने वाढ झाली आहे. त्यामुळे ऑक्टोबरपासून दोन दिवसाआड पाणीपुरवठय़ाचा निर्णय तुर्तास पुढे ढकलण्यात आला असून सध्या ज्या पद्धतीने पाणीपुरवठा सुरू आहे त्याच पद्धतीने सुरू ठेवण्यात येणार आहे.

पावसाळ्याच्या शेवटी का न होवो वरुणराजाने कृपा केली आहे. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात समाधानकारक पाऊस होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निम्मे प्रकल्प 50 टक्केपेक्षा अधिक भरले आहेत. तळोदा तालुक्यातील चार, शहादा तालुक्यातील दोन आणि नंदुरबार तालुक्यातील दोन असे आठ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्याच्या मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या नंदुरबार शहराच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न काहीअंशी सुटण्यास मदत झाली आहे. त्यामुळे शहरवासीयांच्या जिवातजीव आला आहे. परिणामी येते काही महिने तरी आणखी पाणी कपात होणार नाही, हे स्पष्ट आहे.

दोन धरणे भरली

शिवण नदीत ज्या धरणातून पाणी येते ते खोलघर आणि आंबेबारा धरण भरले आहे. खोलघर ओसंडून वाहत आहे तर आंबेबारा 90 टक्केपेक्षा अधिक भरले आहे. पावसाचा जोर ब:यापैकी राहिला, तर आंबेबारा देखील येत्या काही दिवसात ओसंडून वाहणार आहे.

याशिवाय धनीबारा प्रकल्पाचा पाणीसाठादेखील समाधानकारक झाला आहे. हे तिन्ही प्रकल्प पूर्ण भरल्यावर त्यातून वाहणारे पाणी हे शिवण नदीद्वारे थेट वीरचक प्रकल्पात येते. खोलघर धरण भरल्यानंतर ते पाणी शिवण नदीद्वारे वीरचक प्रकल्पात येत आहे. तर खोलघर धरण ते वीरचक प्रकल्प यादरम्यान शिवण नदीला येऊन मिळणा:या नाल्यांना पाणी आल्याने शिवण सध्या दुथडी भरून वाहत आहे. परिणामी वीरचकचा पाणीसाठा वाढू लागला आहे.

दीड ते दोन मीटरने वाढ

वीरचक प्रकल्पातील पाणी पातळी गेल्या चार दिवसात दीड ते दोन मीटरने वाढल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले. सध्या वीरचक प्रकल्पात 6.300 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. आंबेबारा आणि धनीबारा प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहेत. हे दोन्ही प्रकल्प भरल्यावर त्यातील पाणीदेखील वीरचक प्रकल्पात येणार आहे. वीरचकच्या अलीकडील हे तिन्ही प्रकल्प भरले, तर किमान डिसेंबर्पयत शिवण नदी प्रवाही असते. त्यामुळे वीरचकमधील पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पावसाचा जोर आणखी कायम राहिल्यास वीरचकची पातळी वाढण्यास मदत होणार आहे.

सध्या कपात नाही

नंदुरबार शहरात सध्या एक दिवसाआड अर्धा तास पाणीपुरवठा केला जात आहे. पूर्वी मुबलक पाणी होते, त्या वेळी एक दिवसाआड एक तास पाणीपुरवठा केला जात होता. एप्रिल महिन्यात पाणीटंचाई लक्षात घेता 15 मिनिटांची कपात करून एक दिवसाआड 45 मिनिटे पाणीपुरवठा करण्यात आला. त्यानंतर गेल्या महिन्यातील पाणीसाठा लक्षात घेऊन पालिकेने पुन्हा 15 मिनिटांची पाणी कपात करून एक दिवसाआड केवळ अर्धा तास पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. सध्या केवळ अर्धा तास पाणीपुरवठा केला जात आहे.

पाणीसाठय़ाची स्थिती गेल्या महिन्याप्रमाणेच राहिली असती तर 1 ऑक्टोबरपासून दोन दिवसाआड केवळ अर्धा तास पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात येणार होता. त्या वेळी ज्या भागात पाणीपुरवठा केला जाणार आहे, त्या भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात येणार होता. जेणेकरून नागरिकांनी विद्युत मोटारी लावू नये हा त्यामागचा उद्देश होता. दोन दिवसाआड आणि तीही केवळ अर्धा तास पाणीपुरवठय़ाची वेळ आली असती तर शहरावर पाणीटंचाईचे मोठे संकट ओढवले असते.

सुदैवाने निसर्गाने तशी वेळ सध्यातरी येऊ दिली नाही. त्यामुळे सध्या ज्या पद्धतीने अर्थात एक दिवसाआड अर्धा तास पाणीपुरवठय़ाचा निर्णय कायम राहणार आहे. जर पावसाने आणखी कृपा केली आणि वीरचक प्रकल्पात 50 टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा झाला, तर पूर्वीप्रमाणेच एक दिवसाआड एक तास पाणीपुरवठा करण्याचा निर्णय होणार आहे. अर्थात सर्वकाही पावसावर अवलंबून राहणार आहे.