शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

शहरावरील पाणी कपातीचे संकट काहीअंशी टळले आहे.

By admin | Updated: September 21, 2015 00:23 IST

खोलघर व आंबेबारा भरले : वीरचक प्रकल्पातही वाढतेय पाणीपातळी खोलघर व आंबेबारा भरले : वीरचक प्रकल्पातही वाढतेय पाणीपातळी

नंदुरबार :  शहराला पाणीपुरवठा करणारे आंबेबारा धरण 90 टक्केपेक्षा अधिक भरले आहे. तर वीरचक प्रकल्पातील पाणीसाठय़ात दोन मीटरने वाढ झाली आहे. त्यामुळे ऑक्टोबरपासून दोन दिवसाआड पाणीपुरवठय़ाचा निर्णय तुर्तास पुढे ढकलण्यात आला असून सध्या ज्या पद्धतीने पाणीपुरवठा सुरू आहे त्याच पद्धतीने सुरू ठेवण्यात येणार आहे.

पावसाळ्याच्या शेवटी का न होवो वरुणराजाने कृपा केली आहे. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात समाधानकारक पाऊस होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निम्मे प्रकल्प 50 टक्केपेक्षा अधिक भरले आहेत. तळोदा तालुक्यातील चार, शहादा तालुक्यातील दोन आणि नंदुरबार तालुक्यातील दोन असे आठ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्याच्या मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या नंदुरबार शहराच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न काहीअंशी सुटण्यास मदत झाली आहे. त्यामुळे शहरवासीयांच्या जिवातजीव आला आहे. परिणामी येते काही महिने तरी आणखी पाणी कपात होणार नाही, हे स्पष्ट आहे.

दोन धरणे भरली

शिवण नदीत ज्या धरणातून पाणी येते ते खोलघर आणि आंबेबारा धरण भरले आहे. खोलघर ओसंडून वाहत आहे तर आंबेबारा 90 टक्केपेक्षा अधिक भरले आहे. पावसाचा जोर ब:यापैकी राहिला, तर आंबेबारा देखील येत्या काही दिवसात ओसंडून वाहणार आहे.

याशिवाय धनीबारा प्रकल्पाचा पाणीसाठादेखील समाधानकारक झाला आहे. हे तिन्ही प्रकल्प पूर्ण भरल्यावर त्यातून वाहणारे पाणी हे शिवण नदीद्वारे थेट वीरचक प्रकल्पात येते. खोलघर धरण भरल्यानंतर ते पाणी शिवण नदीद्वारे वीरचक प्रकल्पात येत आहे. तर खोलघर धरण ते वीरचक प्रकल्प यादरम्यान शिवण नदीला येऊन मिळणा:या नाल्यांना पाणी आल्याने शिवण सध्या दुथडी भरून वाहत आहे. परिणामी वीरचकचा पाणीसाठा वाढू लागला आहे.

दीड ते दोन मीटरने वाढ

वीरचक प्रकल्पातील पाणी पातळी गेल्या चार दिवसात दीड ते दोन मीटरने वाढल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले. सध्या वीरचक प्रकल्पात 6.300 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. आंबेबारा आणि धनीबारा प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहेत. हे दोन्ही प्रकल्प भरल्यावर त्यातील पाणीदेखील वीरचक प्रकल्पात येणार आहे. वीरचकच्या अलीकडील हे तिन्ही प्रकल्प भरले, तर किमान डिसेंबर्पयत शिवण नदी प्रवाही असते. त्यामुळे वीरचकमधील पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पावसाचा जोर आणखी कायम राहिल्यास वीरचकची पातळी वाढण्यास मदत होणार आहे.

सध्या कपात नाही

नंदुरबार शहरात सध्या एक दिवसाआड अर्धा तास पाणीपुरवठा केला जात आहे. पूर्वी मुबलक पाणी होते, त्या वेळी एक दिवसाआड एक तास पाणीपुरवठा केला जात होता. एप्रिल महिन्यात पाणीटंचाई लक्षात घेता 15 मिनिटांची कपात करून एक दिवसाआड 45 मिनिटे पाणीपुरवठा करण्यात आला. त्यानंतर गेल्या महिन्यातील पाणीसाठा लक्षात घेऊन पालिकेने पुन्हा 15 मिनिटांची पाणी कपात करून एक दिवसाआड केवळ अर्धा तास पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. सध्या केवळ अर्धा तास पाणीपुरवठा केला जात आहे.

पाणीसाठय़ाची स्थिती गेल्या महिन्याप्रमाणेच राहिली असती तर 1 ऑक्टोबरपासून दोन दिवसाआड केवळ अर्धा तास पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात येणार होता. त्या वेळी ज्या भागात पाणीपुरवठा केला जाणार आहे, त्या भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात येणार होता. जेणेकरून नागरिकांनी विद्युत मोटारी लावू नये हा त्यामागचा उद्देश होता. दोन दिवसाआड आणि तीही केवळ अर्धा तास पाणीपुरवठय़ाची वेळ आली असती तर शहरावर पाणीटंचाईचे मोठे संकट ओढवले असते.

सुदैवाने निसर्गाने तशी वेळ सध्यातरी येऊ दिली नाही. त्यामुळे सध्या ज्या पद्धतीने अर्थात एक दिवसाआड अर्धा तास पाणीपुरवठय़ाचा निर्णय कायम राहणार आहे. जर पावसाने आणखी कृपा केली आणि वीरचक प्रकल्पात 50 टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा झाला, तर पूर्वीप्रमाणेच एक दिवसाआड एक तास पाणीपुरवठा करण्याचा निर्णय होणार आहे. अर्थात सर्वकाही पावसावर अवलंबून राहणार आहे.