शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाणी यायचं बंद होईल.. हे खरंच होऊ शकतं..!

By ram.jadhav | Updated: November 24, 2017 00:25 IST

http://www.lokmat.com/jalana/city-will-be-green/ बी़डी़ जडे, जळगावआॅनलाईन लोकमत दि़ 23 - आपल्याकडे आजही असे अनेक शेतकरी आहेत, ते ठिबक असतानाही मोकाट पाणी देतात़ मुबलक पाणी असण्याचा अर्थ असा होत नाही की, मोकाट पाणी द्यावे़ त्यामुळे उत्पादनात वाढ होईल, हा गैरसमज दूर करून शेतकºयांनी तंत्रज्ञानाचा पूर्णपणे आणि योग्य पद्धतीने वापर करणे हे शिकावे़ सण-वार-उत्सव ...

ठळक मुद्देपाण्याचा योग्य वापर करणे हे शिकावे लागणार आहे़शेतकºयांनीही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, पिकांना पाणी कसे द्यावे हे शिकावेपाणी व्यवस्थापन हा शालेय जिवनापासूनच सक्तीचा विषय असावा़

http://www.lokmat.com/jalana/city-will-be-green/बी़डी़ जडे, जळगावआॅनलाईन लोकमत दि़ 23 - आपल्याकडे आजही असे अनेक शेतकरी आहेत, ते ठिबक असतानाही मोकाट पाणी देतात़ मुबलक पाणी असण्याचा अर्थ असा होत नाही की, मोकाट पाणी द्यावे़ त्यामुळे उत्पादनात वाढ होईल, हा गैरसमज दूर करून शेतकºयांनी तंत्रज्ञानाचा पूर्णपणे आणि योग्य पद्धतीने वापर करणे हे शिकावे़ सण-वार-उत्सव साजरा करतानासुद्धा पाण्याचा अपव्यय कसा टाळता येईल याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी. प्रत्येक धर्माच्या लोकांनी, आपापल्या सणाला हे पाळायलाच हवं. गणपती असो की बकरी-ईद, कुणीही याला अपवाद असता कामा नये़ शेवटी पाणी आणि वीज ही राष्ट्राची संपत्ती आहे़ ती वाचवायलाच हवी. साठवलेल्या पाण्याचा कोटेकोरपणे वापर व्हायला हवा़ पाण्याचा पुर्नवापरही अवश्य व्हायला हवा़ शेतकºयांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जमिनीला पाणी न देता, पिकांना पाणी देण्याचे तंत्र शिकणे काळाजी गरज आहे़पाच ते सातशे वर्षांपूर्वी, चंद्रगुप्त मौर्याने कुणाशी विवाह केला, आणि महम्मद गजनीने कुणासोबत काय दिवे लावले हा अभ्यासक्रम आता बस झाला. त्यापेक्षा पाण्याचे व्यवस्थापन अर्थात वॉटर मॅनेजमेंट हा विषय शाळेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करायला हवा़ तुम्ही शेतकरी असाल किंवा शहरी, हा विषय शिकलाच पाहिजे असं सक्तीच शिक्षण असायला हवं. आज इस्त्राईलसारख्या देशात आपल्या तुलनेने केवळ १० टक्के पाऊस पडतो, तरीही तिथे नंदनवन फुलू शकतं. याचं कारण म्हणजे त्यांचा ‘पाणी व्यवस्थापन’ हा अभ्यास इतका पक्का आहे, की एकदा नळातून पडलेल्या पाण्याचा जवळपास सात वेळा पुनर्वापर होऊनच ते शेवटी जमिनीवर पडतं. हे आपण अंमलात का आणू शकत नाही?आपण स्वत:ला 'शेतीप्रधान' देश म्हणवतो़ आपल्याकडे मुबलक प्रमाणात पाऊस पडूनही, पाण्याचे दुर्भिक्ष आहे ही लाजिरवाणी गोष्ट नाही का? पाऊस पडायला आज चार दिवस उशीर झाला तर सगळ्यांची 'हवा टाईट' होईल ही परिस्थिती येतेच कशी? स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष झाली तरीही आपल्याकडच्या पाइप लाईन या गळक्या किंवा फुटक्याच़ एक पाईप लाइन फुटली तर लाखो लीटर पाणी गटारात जातं आणि त्याचं कुणालाही वाईट वाटत नाही, एकाचाही जीव जळत नाही़जपानमध्ये पाणी कसं वाचवतात हे फोटो नुसते इथे शेअर करून भागणार आहे नाही़ ते अमलात आणणे गरजेचे आहे़ इथे पाणी वाचवा हे ओरडायचं आणि दुसºया दिवशी मात्र ३२ दात घासायला ३२ भांडी पाणी ओतायचं हे चालणार आहे का? आज आपल्याला बटन दाबलं की वीज मिळते आणि नळ सोडला की पाणी पडतं याचे अनेक ठिकाणी बºयाच वेळा वाईट आकलन होताना दिसतं़गणेशोत्सव, नवरात्री-उत्सवात मनोरंजनाचे विविध कार्यक्रम व गाण्यांचा आॅर्केस्ट्रा ठेवण्यापेक्षा, ‘वर्षभर पाणी कसं वाचवता येईल’ यावर व्याख्यान देणारा एखादा वक्ता बोलवावा़ आज आपण मंगळावर पाणी आहे का हे शोधायला यान सोडतोय़ उद्या पृथ्वीवर कुठे पिण्यासाठी पाणी सापडतंय का हे शोधण्यासाठी नवीन मोहीम हाती घ्यावी लागेल़

टॅग्स :WaterपाणीFarmerशेतकरी