शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

पाणी यायचं बंद होईल.. हे खरंच होऊ शकतं..!

By ram.jadhav | Updated: November 24, 2017 00:25 IST

http://www.lokmat.com/jalana/city-will-be-green/ बी़डी़ जडे, जळगावआॅनलाईन लोकमत दि़ 23 - आपल्याकडे आजही असे अनेक शेतकरी आहेत, ते ठिबक असतानाही मोकाट पाणी देतात़ मुबलक पाणी असण्याचा अर्थ असा होत नाही की, मोकाट पाणी द्यावे़ त्यामुळे उत्पादनात वाढ होईल, हा गैरसमज दूर करून शेतकºयांनी तंत्रज्ञानाचा पूर्णपणे आणि योग्य पद्धतीने वापर करणे हे शिकावे़ सण-वार-उत्सव ...

ठळक मुद्देपाण्याचा योग्य वापर करणे हे शिकावे लागणार आहे़शेतकºयांनीही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, पिकांना पाणी कसे द्यावे हे शिकावेपाणी व्यवस्थापन हा शालेय जिवनापासूनच सक्तीचा विषय असावा़

http://www.lokmat.com/jalana/city-will-be-green/बी़डी़ जडे, जळगावआॅनलाईन लोकमत दि़ 23 - आपल्याकडे आजही असे अनेक शेतकरी आहेत, ते ठिबक असतानाही मोकाट पाणी देतात़ मुबलक पाणी असण्याचा अर्थ असा होत नाही की, मोकाट पाणी द्यावे़ त्यामुळे उत्पादनात वाढ होईल, हा गैरसमज दूर करून शेतकºयांनी तंत्रज्ञानाचा पूर्णपणे आणि योग्य पद्धतीने वापर करणे हे शिकावे़ सण-वार-उत्सव साजरा करतानासुद्धा पाण्याचा अपव्यय कसा टाळता येईल याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी. प्रत्येक धर्माच्या लोकांनी, आपापल्या सणाला हे पाळायलाच हवं. गणपती असो की बकरी-ईद, कुणीही याला अपवाद असता कामा नये़ शेवटी पाणी आणि वीज ही राष्ट्राची संपत्ती आहे़ ती वाचवायलाच हवी. साठवलेल्या पाण्याचा कोटेकोरपणे वापर व्हायला हवा़ पाण्याचा पुर्नवापरही अवश्य व्हायला हवा़ शेतकºयांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जमिनीला पाणी न देता, पिकांना पाणी देण्याचे तंत्र शिकणे काळाजी गरज आहे़पाच ते सातशे वर्षांपूर्वी, चंद्रगुप्त मौर्याने कुणाशी विवाह केला, आणि महम्मद गजनीने कुणासोबत काय दिवे लावले हा अभ्यासक्रम आता बस झाला. त्यापेक्षा पाण्याचे व्यवस्थापन अर्थात वॉटर मॅनेजमेंट हा विषय शाळेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करायला हवा़ तुम्ही शेतकरी असाल किंवा शहरी, हा विषय शिकलाच पाहिजे असं सक्तीच शिक्षण असायला हवं. आज इस्त्राईलसारख्या देशात आपल्या तुलनेने केवळ १० टक्के पाऊस पडतो, तरीही तिथे नंदनवन फुलू शकतं. याचं कारण म्हणजे त्यांचा ‘पाणी व्यवस्थापन’ हा अभ्यास इतका पक्का आहे, की एकदा नळातून पडलेल्या पाण्याचा जवळपास सात वेळा पुनर्वापर होऊनच ते शेवटी जमिनीवर पडतं. हे आपण अंमलात का आणू शकत नाही?आपण स्वत:ला 'शेतीप्रधान' देश म्हणवतो़ आपल्याकडे मुबलक प्रमाणात पाऊस पडूनही, पाण्याचे दुर्भिक्ष आहे ही लाजिरवाणी गोष्ट नाही का? पाऊस पडायला आज चार दिवस उशीर झाला तर सगळ्यांची 'हवा टाईट' होईल ही परिस्थिती येतेच कशी? स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष झाली तरीही आपल्याकडच्या पाइप लाईन या गळक्या किंवा फुटक्याच़ एक पाईप लाइन फुटली तर लाखो लीटर पाणी गटारात जातं आणि त्याचं कुणालाही वाईट वाटत नाही, एकाचाही जीव जळत नाही़जपानमध्ये पाणी कसं वाचवतात हे फोटो नुसते इथे शेअर करून भागणार आहे नाही़ ते अमलात आणणे गरजेचे आहे़ इथे पाणी वाचवा हे ओरडायचं आणि दुसºया दिवशी मात्र ३२ दात घासायला ३२ भांडी पाणी ओतायचं हे चालणार आहे का? आज आपल्याला बटन दाबलं की वीज मिळते आणि नळ सोडला की पाणी पडतं याचे अनेक ठिकाणी बºयाच वेळा वाईट आकलन होताना दिसतं़गणेशोत्सव, नवरात्री-उत्सवात मनोरंजनाचे विविध कार्यक्रम व गाण्यांचा आॅर्केस्ट्रा ठेवण्यापेक्षा, ‘वर्षभर पाणी कसं वाचवता येईल’ यावर व्याख्यान देणारा एखादा वक्ता बोलवावा़ आज आपण मंगळावर पाणी आहे का हे शोधायला यान सोडतोय़ उद्या पृथ्वीवर कुठे पिण्यासाठी पाणी सापडतंय का हे शोधण्यासाठी नवीन मोहीम हाती घ्यावी लागेल़

टॅग्स :WaterपाणीFarmerशेतकरी