शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

पाणी यायचं बंद होईल.. हे खरंच होऊ शकतं..!

By ram.jadhav | Updated: November 24, 2017 00:25 IST

http://www.lokmat.com/jalana/city-will-be-green/ बी़डी़ जडे, जळगावआॅनलाईन लोकमत दि़ 23 - आपल्याकडे आजही असे अनेक शेतकरी आहेत, ते ठिबक असतानाही मोकाट पाणी देतात़ मुबलक पाणी असण्याचा अर्थ असा होत नाही की, मोकाट पाणी द्यावे़ त्यामुळे उत्पादनात वाढ होईल, हा गैरसमज दूर करून शेतकºयांनी तंत्रज्ञानाचा पूर्णपणे आणि योग्य पद्धतीने वापर करणे हे शिकावे़ सण-वार-उत्सव ...

ठळक मुद्देपाण्याचा योग्य वापर करणे हे शिकावे लागणार आहे़शेतकºयांनीही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, पिकांना पाणी कसे द्यावे हे शिकावेपाणी व्यवस्थापन हा शालेय जिवनापासूनच सक्तीचा विषय असावा़

http://www.lokmat.com/jalana/city-will-be-green/बी़डी़ जडे, जळगावआॅनलाईन लोकमत दि़ 23 - आपल्याकडे आजही असे अनेक शेतकरी आहेत, ते ठिबक असतानाही मोकाट पाणी देतात़ मुबलक पाणी असण्याचा अर्थ असा होत नाही की, मोकाट पाणी द्यावे़ त्यामुळे उत्पादनात वाढ होईल, हा गैरसमज दूर करून शेतकºयांनी तंत्रज्ञानाचा पूर्णपणे आणि योग्य पद्धतीने वापर करणे हे शिकावे़ सण-वार-उत्सव साजरा करतानासुद्धा पाण्याचा अपव्यय कसा टाळता येईल याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी. प्रत्येक धर्माच्या लोकांनी, आपापल्या सणाला हे पाळायलाच हवं. गणपती असो की बकरी-ईद, कुणीही याला अपवाद असता कामा नये़ शेवटी पाणी आणि वीज ही राष्ट्राची संपत्ती आहे़ ती वाचवायलाच हवी. साठवलेल्या पाण्याचा कोटेकोरपणे वापर व्हायला हवा़ पाण्याचा पुर्नवापरही अवश्य व्हायला हवा़ शेतकºयांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जमिनीला पाणी न देता, पिकांना पाणी देण्याचे तंत्र शिकणे काळाजी गरज आहे़पाच ते सातशे वर्षांपूर्वी, चंद्रगुप्त मौर्याने कुणाशी विवाह केला, आणि महम्मद गजनीने कुणासोबत काय दिवे लावले हा अभ्यासक्रम आता बस झाला. त्यापेक्षा पाण्याचे व्यवस्थापन अर्थात वॉटर मॅनेजमेंट हा विषय शाळेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करायला हवा़ तुम्ही शेतकरी असाल किंवा शहरी, हा विषय शिकलाच पाहिजे असं सक्तीच शिक्षण असायला हवं. आज इस्त्राईलसारख्या देशात आपल्या तुलनेने केवळ १० टक्के पाऊस पडतो, तरीही तिथे नंदनवन फुलू शकतं. याचं कारण म्हणजे त्यांचा ‘पाणी व्यवस्थापन’ हा अभ्यास इतका पक्का आहे, की एकदा नळातून पडलेल्या पाण्याचा जवळपास सात वेळा पुनर्वापर होऊनच ते शेवटी जमिनीवर पडतं. हे आपण अंमलात का आणू शकत नाही?आपण स्वत:ला 'शेतीप्रधान' देश म्हणवतो़ आपल्याकडे मुबलक प्रमाणात पाऊस पडूनही, पाण्याचे दुर्भिक्ष आहे ही लाजिरवाणी गोष्ट नाही का? पाऊस पडायला आज चार दिवस उशीर झाला तर सगळ्यांची 'हवा टाईट' होईल ही परिस्थिती येतेच कशी? स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष झाली तरीही आपल्याकडच्या पाइप लाईन या गळक्या किंवा फुटक्याच़ एक पाईप लाइन फुटली तर लाखो लीटर पाणी गटारात जातं आणि त्याचं कुणालाही वाईट वाटत नाही, एकाचाही जीव जळत नाही़जपानमध्ये पाणी कसं वाचवतात हे फोटो नुसते इथे शेअर करून भागणार आहे नाही़ ते अमलात आणणे गरजेचे आहे़ इथे पाणी वाचवा हे ओरडायचं आणि दुसºया दिवशी मात्र ३२ दात घासायला ३२ भांडी पाणी ओतायचं हे चालणार आहे का? आज आपल्याला बटन दाबलं की वीज मिळते आणि नळ सोडला की पाणी पडतं याचे अनेक ठिकाणी बºयाच वेळा वाईट आकलन होताना दिसतं़गणेशोत्सव, नवरात्री-उत्सवात मनोरंजनाचे विविध कार्यक्रम व गाण्यांचा आॅर्केस्ट्रा ठेवण्यापेक्षा, ‘वर्षभर पाणी कसं वाचवता येईल’ यावर व्याख्यान देणारा एखादा वक्ता बोलवावा़ आज आपण मंगळावर पाणी आहे का हे शोधायला यान सोडतोय़ उद्या पृथ्वीवर कुठे पिण्यासाठी पाणी सापडतंय का हे शोधण्यासाठी नवीन मोहीम हाती घ्यावी लागेल़

टॅग्स :WaterपाणीFarmerशेतकरी