शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

'टॉप १00' थकबाकीदारांवर 'वॉच'

By admin | Updated: November 3, 2014 15:24 IST

प्रत्येक तालुक्यातील 'टॉप १00' थकबाकीदारांचा शोध घेऊन त्यांचे वीज कनेक्शन तातडीने बंद करावे, असे आदेश महावितरण कंपनीने उपकेंद्रात काम करणार्‍या अधिकार्‍यांना दिले आहेत.

जळगाव : महावितरण कंपनीच्या जळगाव परिमंडल कार्यालयांतर्गत धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे एकूण १ हजार ९२४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी आता महावितरण कंपनीने कंबर कसली आहे. प्रत्येक तालुक्यातील 'टॉप १00' थकबाकीदारांचा शोध घेऊन त्यांचे वीज कनेक्शन तातडीने बंद करावे, असे आदेश महावितरण कंपनीने उपकेंद्रात काम करणार्‍या अधिकार्‍यांना दिले आहेत. नियमित वीज बिले जमा करा, असे आवाहन अनेकदा करूनही आपले कोण काय करणार? अशा 'तोर्‍यात' राहणार्‍या वीज ग्राहकांची संख्या खान्देशात कमी नाही. वारंवार वीज ग्राहकांना आवाहन करूनदेखील त्याकडे वीज ग्राहक दुर्लक्ष करतात. त्यामुळे महावितरण कंपनीने हा निर्णय घेतला आहे. ४७ उपकेंद्रांतील अधिकार्‍यांना सूचना वीज बिलांची वसुली करण्यासाठी महावितरण कंपनीने धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील ४७ उपकेंद्रांतील अधिकार्‍यांना परिमंडल कार्यालयातून प्रत्येक जिल्ह्यातील तालुकानिहाय 'टॉप १00' थकबाकीदार वीज ग्राहकांकडून वीज बिलांची वसुली करावी. त्यांच्याकडून बिले जमा होत नसल्यास वीज कनेक्शन बंद करावे, अशा सूचना कंपनीने दिल्या आहेत.

कृषी संजीवनी योजनेने दिलासा खान्देशातील ग्रामीण भागातील नागरिकांनी कृषी संजीवनी योजनेंतर्गत बिले जमा केल्याने ९५ कोटी रुपयांचा महसूल महावितरण कंपनीला तीन महिन्यात मिळाला आहे. मात्र, घरगुती, औद्योगिक व वाणिज्य क्षेत्रातील ग्राहकांकडून वीज बिलांची वसुली होत नसल्यामुळे वीज कनेक्शन काढून घेण्याचा निर्णय महावितरण कंपनीने घेतला आहे. 

२२६ फीडरवर भारनियमन सुरू वीज बिलांची वसुली झाली तर भारनियमन मुक्त करण्यात येईल, असे सांगण्यात आल्यानंतर खान्देशातील ३७२ फीडरपैकी १४६ फीडरवरील वीज ग्राहकांची वीज बिलांची वसुली झाल्यामुळे या फीडरवरील भारनियमन बंद करण्यात आले आहे. उर्वरित २२६ फीडरवरील ग्राहकांकडे वीज बिलांची रक्कम मोठय़ा प्रमाणात थकल्यामुळे या फीडरवरील भारनियमन अद्यापही सुरू आहे. 

वीजचोरी रोखण्याचे आवाहन विजेची गळती व मोठय़ा प्रमाणात होणारी वीजचोरी रोखण्याचे आवाहन महावितरण कंपनीसमोर आहे.  मात्र, थकबाकीदार वीज ग्राहकांकडून वीज बिलांची वसुलीकडे महावितरण कंपनीचे लक्ष असल्यामुळे विजेची चोरी होताना दिसत आहे. 

१२00 कनेक्शन बंद महावितरण कंपनीच्या आदेशाला केराची टोपली दाखविणार्‍या खान्देशातील १२00 थकबाकीदार वीज ग्राहकांचे वीज कनेक्शन महावितरण कंपनीने दिवाळीच्या काळात बंद केले आहेत. २0 टक्के लॉसेस्चे प्रमाण जळगाव परिमंडलअंतर्गत २0 टक्के विजेचे लॉसेस् आहेत. हे प्रमाण कमी करण्याआधी महावितरण कंपनीला वीजचोरीचे प्रमाण थांबवावे लागणार आहे. मात्र, महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी वीज बिल वसुलीकडे प्रामुख्याने लक्ष देत असल्यामुळे वीजचोरी व विजेच्या गळतीचे प्रमाण खान्देशात 'जैसे थे' आहे. वीजचोरीचे वाढते प्रमाण, वीज ग्राहकांकडे असणारी वीज बिलांची थकबाकी यामुळे खान्देशात भारनियमन सुरू आहे.