शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

'टॉप १00' थकबाकीदारांवर 'वॉच'

By admin | Updated: November 3, 2014 15:24 IST

प्रत्येक तालुक्यातील 'टॉप १00' थकबाकीदारांचा शोध घेऊन त्यांचे वीज कनेक्शन तातडीने बंद करावे, असे आदेश महावितरण कंपनीने उपकेंद्रात काम करणार्‍या अधिकार्‍यांना दिले आहेत.

जळगाव : महावितरण कंपनीच्या जळगाव परिमंडल कार्यालयांतर्गत धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे एकूण १ हजार ९२४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी आता महावितरण कंपनीने कंबर कसली आहे. प्रत्येक तालुक्यातील 'टॉप १00' थकबाकीदारांचा शोध घेऊन त्यांचे वीज कनेक्शन तातडीने बंद करावे, असे आदेश महावितरण कंपनीने उपकेंद्रात काम करणार्‍या अधिकार्‍यांना दिले आहेत. नियमित वीज बिले जमा करा, असे आवाहन अनेकदा करूनही आपले कोण काय करणार? अशा 'तोर्‍यात' राहणार्‍या वीज ग्राहकांची संख्या खान्देशात कमी नाही. वारंवार वीज ग्राहकांना आवाहन करूनदेखील त्याकडे वीज ग्राहक दुर्लक्ष करतात. त्यामुळे महावितरण कंपनीने हा निर्णय घेतला आहे. ४७ उपकेंद्रांतील अधिकार्‍यांना सूचना वीज बिलांची वसुली करण्यासाठी महावितरण कंपनीने धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील ४७ उपकेंद्रांतील अधिकार्‍यांना परिमंडल कार्यालयातून प्रत्येक जिल्ह्यातील तालुकानिहाय 'टॉप १00' थकबाकीदार वीज ग्राहकांकडून वीज बिलांची वसुली करावी. त्यांच्याकडून बिले जमा होत नसल्यास वीज कनेक्शन बंद करावे, अशा सूचना कंपनीने दिल्या आहेत.

कृषी संजीवनी योजनेने दिलासा खान्देशातील ग्रामीण भागातील नागरिकांनी कृषी संजीवनी योजनेंतर्गत बिले जमा केल्याने ९५ कोटी रुपयांचा महसूल महावितरण कंपनीला तीन महिन्यात मिळाला आहे. मात्र, घरगुती, औद्योगिक व वाणिज्य क्षेत्रातील ग्राहकांकडून वीज बिलांची वसुली होत नसल्यामुळे वीज कनेक्शन काढून घेण्याचा निर्णय महावितरण कंपनीने घेतला आहे. 

२२६ फीडरवर भारनियमन सुरू वीज बिलांची वसुली झाली तर भारनियमन मुक्त करण्यात येईल, असे सांगण्यात आल्यानंतर खान्देशातील ३७२ फीडरपैकी १४६ फीडरवरील वीज ग्राहकांची वीज बिलांची वसुली झाल्यामुळे या फीडरवरील भारनियमन बंद करण्यात आले आहे. उर्वरित २२६ फीडरवरील ग्राहकांकडे वीज बिलांची रक्कम मोठय़ा प्रमाणात थकल्यामुळे या फीडरवरील भारनियमन अद्यापही सुरू आहे. 

वीजचोरी रोखण्याचे आवाहन विजेची गळती व मोठय़ा प्रमाणात होणारी वीजचोरी रोखण्याचे आवाहन महावितरण कंपनीसमोर आहे.  मात्र, थकबाकीदार वीज ग्राहकांकडून वीज बिलांची वसुलीकडे महावितरण कंपनीचे लक्ष असल्यामुळे विजेची चोरी होताना दिसत आहे. 

१२00 कनेक्शन बंद महावितरण कंपनीच्या आदेशाला केराची टोपली दाखविणार्‍या खान्देशातील १२00 थकबाकीदार वीज ग्राहकांचे वीज कनेक्शन महावितरण कंपनीने दिवाळीच्या काळात बंद केले आहेत. २0 टक्के लॉसेस्चे प्रमाण जळगाव परिमंडलअंतर्गत २0 टक्के विजेचे लॉसेस् आहेत. हे प्रमाण कमी करण्याआधी महावितरण कंपनीला वीजचोरीचे प्रमाण थांबवावे लागणार आहे. मात्र, महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी वीज बिल वसुलीकडे प्रामुख्याने लक्ष देत असल्यामुळे वीजचोरी व विजेच्या गळतीचे प्रमाण खान्देशात 'जैसे थे' आहे. वीजचोरीचे वाढते प्रमाण, वीज ग्राहकांकडे असणारी वीज बिलांची थकबाकी यामुळे खान्देशात भारनियमन सुरू आहे.