शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
13
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
14
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
15
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
16
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
17
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
18
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
19
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
20
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला

जळगाव जिल्ह्यात आग ओकणाऱ्या सूर्याचा पशुपक्षांवर कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 12:19 IST

खडकदेवळा येथे ६८ मेंढ्यांचा तर प्रतापपूरात वटवाघळांचा मृत्यू

जळगाव : दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने सर्वसामान्यांसह पशु व पक्षांना त्याचा त्रास होत आहे. तापमानवाढीमुळे पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथे ६८ मेंढ्या मृत्युमुखी पडल्या. तर तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथे वटवाघळांचा मृत्यू झाला. भुसावळ शहरातील कोळशाच्या वॅगनला व जनरेटरला अति उष्णतेमुळे आग लागल्याची घटना सोमवारी झाली.खडकदेवळा येथे ६८ मेंढ्यांचा मृत्यूपाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील हिवरा प्रकल्प परिसरात चरण्यासाठी सोडलेल्या मेंढ्यांच्या कळपातील तब्बल ६८ मेंढ्या अचानक मृत्यूमुखी पडल्या. यामुळे मेंढपाळ मालकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. वाढत्या उष्णतेमुळे ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.रेल्वे यार्डातील दगडी कोळशाच्या वॅगनला आगरेल्वे यार्डमध्ये उभ्या असलेल्या दगडी कोळशाच्या वॅगनला अतिउष्णतेमुळे अचानक आग लागली. वॅगनमधून धूर येताच जवळ असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले.आगीने उग्ररूप धारण करण्यापूर्वी अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली व मॉर्डन रोड परिसरातील मुख्य पोस्ट आॅफिसमधील जनरेटरला उष्णतेमुळे आग लागली. नागरिकांनी प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला.भुसावळात जनरेटरने घेतला पेटभुसावळ शहरात सोमवारी दुपारी एकच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला. याच वेळी टपाल कार्यालयातील जनरेटर सुरू केले. तेव्हा अति उष्णतेमुळे याच जनरेटरने अचानक पेट घेतला. ही बाब टपाल कार्यालयाच्या आवारात असलेल्या नागरिकांनी आत जावून अधिकारी व कर्मचाºयांच्या निदर्शनास आणून दिली. तेव्हा कर्मचाºयांनी अग्निरोधक यंत्रणेच्या सहाय्याने आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. त्यातच या कार्यालयाचे कर्मचारी अशोक अडकमोल (वय ५५) यांच्या पायाला इजा झाली. त्यात ते जखमी झाले. आग आटोक्यात आली असली तरी जनरेटरचे मात्र पूर्णपणे नुकसान झाले आहे.उत्तर भारताला जोडणाºया मध्यरेल्वेचे जंक्शन म्हणून ओळख असलेल्या भुसावळ शहराची आता हॉट सिटी म्हणून ओळख निर्माण केली आहे.दरम्यान, भुसावळातील केंद्रीय जलआयोगाच्या कार्यालयाने शहराच्या तापमानाचा पारा ४७.६ अंश असल्याची नोंद केली आहे. उच्चांकी तापमानामुळे आता शहरातील जनजीवनावर विपरित परिणाम झाला आहे.दीपनगर औष्णिक केंद्रामुळे होणारे थर्मल पोल्यूशन, अविकसीत ग्रीन बेल्ट आदींमुळे शहरातील तापमानाचा पारा दिवसागणिक वाढत आहे. जिल्ह्यातील इतर शहरांच्या तुलनेत भुसावळ शहराचे तापमान सरासरी दोन अंशांनी अधिक असल्याची नोंद करण्यात आली आहे. शहरात यापूर्वी १ मे २००९ रोजी ४७.५ अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली होती. या तापमानाचा रेकॉर्डदेखील आता तुटला आहे. उच्चांकी तापमानामुळे शहरात सकाळी ११ ते ५:३० वाजेपर्यंत रस्त्यांवर अघोषित संचारबंदी लागल्यासारखी स्थिती निर्माण होत असून, रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे.शहरात अजून दोन ते तीन दिवस उच्चांकी तापमान राहू शकेल, असा अंदाजही केंद्रीय जलआयोगाच्या कार्यालयातील सूत्रांनी वर्तवला आहे.असह्य तापमानामुळे प्रतापपूरात वटवाघळांचा मृत्यू्रप्रतापपूर : तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथे शंभरहून अधिक वटवाघूळ मृत आढळून आले़ तीव्र तापमानामुळे होरपळून वटवाघळांचा मृत्यू झाल्याचा अंदाज तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ़ किशोर सामुद्रे यांनी व्यक्त केला आहे़ प्रतापपूर येथील बसस्थानक परिसरात मोठ्या संख्येने वृक्ष असून येथे मोठ्या संख्येने वटवाघूळांचे वास्तव्य आहे़ वाढते तापमान व पाण्याअभावी त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे़ मृत वटवाघळांना आरोग्य विभागातील कर्मचाºयांकडून १० फूट खोल खड्डा करुन पुरण्यात आले़भुसावळच्या तापमानाचा पारा ४७.६ अंशांवरहॉट सिटी भुसावळने आता राज्यातील उच्चांकी तापमान असलेल्या अकोल्याचा रेकॉर्ड आता भुसावळने तोडला आहे. सोमवारी शहराचे कमाल तापमान यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वांत उच्चांकी अर्थात ४७.६ अंशावर पोहोचले. शहरातील केंद्रीय जलआयोगाच्या कार्यालयात ही नोंद करण्यात आली.

टॅग्स :Jalgaonजळगाव