शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

जळगाव जिल्ह्यात आग ओकणाऱ्या सूर्याचा पशुपक्षांवर कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 12:19 IST

खडकदेवळा येथे ६८ मेंढ्यांचा तर प्रतापपूरात वटवाघळांचा मृत्यू

जळगाव : दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने सर्वसामान्यांसह पशु व पक्षांना त्याचा त्रास होत आहे. तापमानवाढीमुळे पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथे ६८ मेंढ्या मृत्युमुखी पडल्या. तर तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथे वटवाघळांचा मृत्यू झाला. भुसावळ शहरातील कोळशाच्या वॅगनला व जनरेटरला अति उष्णतेमुळे आग लागल्याची घटना सोमवारी झाली.खडकदेवळा येथे ६८ मेंढ्यांचा मृत्यूपाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील हिवरा प्रकल्प परिसरात चरण्यासाठी सोडलेल्या मेंढ्यांच्या कळपातील तब्बल ६८ मेंढ्या अचानक मृत्यूमुखी पडल्या. यामुळे मेंढपाळ मालकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. वाढत्या उष्णतेमुळे ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.रेल्वे यार्डातील दगडी कोळशाच्या वॅगनला आगरेल्वे यार्डमध्ये उभ्या असलेल्या दगडी कोळशाच्या वॅगनला अतिउष्णतेमुळे अचानक आग लागली. वॅगनमधून धूर येताच जवळ असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले.आगीने उग्ररूप धारण करण्यापूर्वी अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली व मॉर्डन रोड परिसरातील मुख्य पोस्ट आॅफिसमधील जनरेटरला उष्णतेमुळे आग लागली. नागरिकांनी प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला.भुसावळात जनरेटरने घेतला पेटभुसावळ शहरात सोमवारी दुपारी एकच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला. याच वेळी टपाल कार्यालयातील जनरेटर सुरू केले. तेव्हा अति उष्णतेमुळे याच जनरेटरने अचानक पेट घेतला. ही बाब टपाल कार्यालयाच्या आवारात असलेल्या नागरिकांनी आत जावून अधिकारी व कर्मचाºयांच्या निदर्शनास आणून दिली. तेव्हा कर्मचाºयांनी अग्निरोधक यंत्रणेच्या सहाय्याने आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. त्यातच या कार्यालयाचे कर्मचारी अशोक अडकमोल (वय ५५) यांच्या पायाला इजा झाली. त्यात ते जखमी झाले. आग आटोक्यात आली असली तरी जनरेटरचे मात्र पूर्णपणे नुकसान झाले आहे.उत्तर भारताला जोडणाºया मध्यरेल्वेचे जंक्शन म्हणून ओळख असलेल्या भुसावळ शहराची आता हॉट सिटी म्हणून ओळख निर्माण केली आहे.दरम्यान, भुसावळातील केंद्रीय जलआयोगाच्या कार्यालयाने शहराच्या तापमानाचा पारा ४७.६ अंश असल्याची नोंद केली आहे. उच्चांकी तापमानामुळे आता शहरातील जनजीवनावर विपरित परिणाम झाला आहे.दीपनगर औष्णिक केंद्रामुळे होणारे थर्मल पोल्यूशन, अविकसीत ग्रीन बेल्ट आदींमुळे शहरातील तापमानाचा पारा दिवसागणिक वाढत आहे. जिल्ह्यातील इतर शहरांच्या तुलनेत भुसावळ शहराचे तापमान सरासरी दोन अंशांनी अधिक असल्याची नोंद करण्यात आली आहे. शहरात यापूर्वी १ मे २००९ रोजी ४७.५ अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली होती. या तापमानाचा रेकॉर्डदेखील आता तुटला आहे. उच्चांकी तापमानामुळे शहरात सकाळी ११ ते ५:३० वाजेपर्यंत रस्त्यांवर अघोषित संचारबंदी लागल्यासारखी स्थिती निर्माण होत असून, रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे.शहरात अजून दोन ते तीन दिवस उच्चांकी तापमान राहू शकेल, असा अंदाजही केंद्रीय जलआयोगाच्या कार्यालयातील सूत्रांनी वर्तवला आहे.असह्य तापमानामुळे प्रतापपूरात वटवाघळांचा मृत्यू्रप्रतापपूर : तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथे शंभरहून अधिक वटवाघूळ मृत आढळून आले़ तीव्र तापमानामुळे होरपळून वटवाघळांचा मृत्यू झाल्याचा अंदाज तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ़ किशोर सामुद्रे यांनी व्यक्त केला आहे़ प्रतापपूर येथील बसस्थानक परिसरात मोठ्या संख्येने वृक्ष असून येथे मोठ्या संख्येने वटवाघूळांचे वास्तव्य आहे़ वाढते तापमान व पाण्याअभावी त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे़ मृत वटवाघळांना आरोग्य विभागातील कर्मचाºयांकडून १० फूट खोल खड्डा करुन पुरण्यात आले़भुसावळच्या तापमानाचा पारा ४७.६ अंशांवरहॉट सिटी भुसावळने आता राज्यातील उच्चांकी तापमान असलेल्या अकोल्याचा रेकॉर्ड आता भुसावळने तोडला आहे. सोमवारी शहराचे कमाल तापमान यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वांत उच्चांकी अर्थात ४७.६ अंशावर पोहोचले. शहरातील केंद्रीय जलआयोगाच्या कार्यालयात ही नोंद करण्यात आली.

टॅग्स :Jalgaonजळगाव