शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
2
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
3
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
4
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
5
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
6
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
7
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
8
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
9
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
10
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
11
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
12
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
13
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
14
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
15
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
16
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
17
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
18
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
19
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
20
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी

जळगाव जिल्ह्यात आग ओकणाऱ्या सूर्याचा पशुपक्षांवर कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 12:19 IST

खडकदेवळा येथे ६८ मेंढ्यांचा तर प्रतापपूरात वटवाघळांचा मृत्यू

जळगाव : दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने सर्वसामान्यांसह पशु व पक्षांना त्याचा त्रास होत आहे. तापमानवाढीमुळे पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथे ६८ मेंढ्या मृत्युमुखी पडल्या. तर तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथे वटवाघळांचा मृत्यू झाला. भुसावळ शहरातील कोळशाच्या वॅगनला व जनरेटरला अति उष्णतेमुळे आग लागल्याची घटना सोमवारी झाली.खडकदेवळा येथे ६८ मेंढ्यांचा मृत्यूपाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील हिवरा प्रकल्प परिसरात चरण्यासाठी सोडलेल्या मेंढ्यांच्या कळपातील तब्बल ६८ मेंढ्या अचानक मृत्यूमुखी पडल्या. यामुळे मेंढपाळ मालकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. वाढत्या उष्णतेमुळे ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.रेल्वे यार्डातील दगडी कोळशाच्या वॅगनला आगरेल्वे यार्डमध्ये उभ्या असलेल्या दगडी कोळशाच्या वॅगनला अतिउष्णतेमुळे अचानक आग लागली. वॅगनमधून धूर येताच जवळ असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले.आगीने उग्ररूप धारण करण्यापूर्वी अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली व मॉर्डन रोड परिसरातील मुख्य पोस्ट आॅफिसमधील जनरेटरला उष्णतेमुळे आग लागली. नागरिकांनी प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला.भुसावळात जनरेटरने घेतला पेटभुसावळ शहरात सोमवारी दुपारी एकच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला. याच वेळी टपाल कार्यालयातील जनरेटर सुरू केले. तेव्हा अति उष्णतेमुळे याच जनरेटरने अचानक पेट घेतला. ही बाब टपाल कार्यालयाच्या आवारात असलेल्या नागरिकांनी आत जावून अधिकारी व कर्मचाºयांच्या निदर्शनास आणून दिली. तेव्हा कर्मचाºयांनी अग्निरोधक यंत्रणेच्या सहाय्याने आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. त्यातच या कार्यालयाचे कर्मचारी अशोक अडकमोल (वय ५५) यांच्या पायाला इजा झाली. त्यात ते जखमी झाले. आग आटोक्यात आली असली तरी जनरेटरचे मात्र पूर्णपणे नुकसान झाले आहे.उत्तर भारताला जोडणाºया मध्यरेल्वेचे जंक्शन म्हणून ओळख असलेल्या भुसावळ शहराची आता हॉट सिटी म्हणून ओळख निर्माण केली आहे.दरम्यान, भुसावळातील केंद्रीय जलआयोगाच्या कार्यालयाने शहराच्या तापमानाचा पारा ४७.६ अंश असल्याची नोंद केली आहे. उच्चांकी तापमानामुळे आता शहरातील जनजीवनावर विपरित परिणाम झाला आहे.दीपनगर औष्णिक केंद्रामुळे होणारे थर्मल पोल्यूशन, अविकसीत ग्रीन बेल्ट आदींमुळे शहरातील तापमानाचा पारा दिवसागणिक वाढत आहे. जिल्ह्यातील इतर शहरांच्या तुलनेत भुसावळ शहराचे तापमान सरासरी दोन अंशांनी अधिक असल्याची नोंद करण्यात आली आहे. शहरात यापूर्वी १ मे २००९ रोजी ४७.५ अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली होती. या तापमानाचा रेकॉर्डदेखील आता तुटला आहे. उच्चांकी तापमानामुळे शहरात सकाळी ११ ते ५:३० वाजेपर्यंत रस्त्यांवर अघोषित संचारबंदी लागल्यासारखी स्थिती निर्माण होत असून, रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे.शहरात अजून दोन ते तीन दिवस उच्चांकी तापमान राहू शकेल, असा अंदाजही केंद्रीय जलआयोगाच्या कार्यालयातील सूत्रांनी वर्तवला आहे.असह्य तापमानामुळे प्रतापपूरात वटवाघळांचा मृत्यू्रप्रतापपूर : तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथे शंभरहून अधिक वटवाघूळ मृत आढळून आले़ तीव्र तापमानामुळे होरपळून वटवाघळांचा मृत्यू झाल्याचा अंदाज तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ़ किशोर सामुद्रे यांनी व्यक्त केला आहे़ प्रतापपूर येथील बसस्थानक परिसरात मोठ्या संख्येने वृक्ष असून येथे मोठ्या संख्येने वटवाघूळांचे वास्तव्य आहे़ वाढते तापमान व पाण्याअभावी त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे़ मृत वटवाघळांना आरोग्य विभागातील कर्मचाºयांकडून १० फूट खोल खड्डा करुन पुरण्यात आले़भुसावळच्या तापमानाचा पारा ४७.६ अंशांवरहॉट सिटी भुसावळने आता राज्यातील उच्चांकी तापमान असलेल्या अकोल्याचा रेकॉर्ड आता भुसावळने तोडला आहे. सोमवारी शहराचे कमाल तापमान यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वांत उच्चांकी अर्थात ४७.६ अंशावर पोहोचले. शहरातील केंद्रीय जलआयोगाच्या कार्यालयात ही नोंद करण्यात आली.

टॅग्स :Jalgaonजळगाव