शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

वा रे आपत्ती व्यवस्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 14:20 IST

नेमेची येतो मग पावसाळा...हे माहित असूनही मान्सूनपूर्व तयारी, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची सज्जता या गोष्टी केवळ बैठका, इतिवृत्त आणि अहवालापुरती मर्यादित राहिल्या आहेत, हे पहिल्याच पावसाने सिध्द केले आहे.

नेमेची येतो मग पावसाळा...हे माहित असूनही मान्सूनपूर्व तयारी, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची सज्जता या गोष्टी केवळ बैठका, इतिवृत्त आणि अहवालापुरती मर्यादित राहिल्या आहेत, हे पहिल्याच पावसाने सिध्द केले आहे. संपूर्ण खान्देशात पावसाने जी दाणादाण उडवली, त्यावरुन प्रशासकीय यंत्रणेच्या पूर्वतयारीचे बिंग फुटले आहे. धुळ्यानजिक असलेल्या वरखेडी गावात चिंचेचे जुने झाड कोसळून तीन बालकांसह आईचा मृत्यू झाला. रात्री साडेआठ वाजेच्या या घटनेनंतर मदतकार्याला तब्बल तीन तासानंतर सुरुवात झाली. यावरुन प्रशासकीय यंत्रणा किती सज्ज आहे, हे दिसून येते. शनिवारी जळगाव शहरात पाऊस पडला, सखल भागात पाणी साचलेले होते. पण महापालिकेच्या आपत्कालीन विभागाने रविवारी ‘सुटी’चा आनंद घेतला. कक्षाला कुलूप लावून अधिकारी आणि कर्मचारी निवांत होते.या दोन्ही घटना जिल्हा मुख्यालयाच्याठिकाणी वा त्या नजिक घडल्या आहेत. सगळे वर्ग एकचे अधिकारी याठिकाणी असताना एवढी बेफिकीरी असेल तर गावपातळीवर काय अवस्था असेल याची कल्पना केलेली बरी. संपूर्ण खान्देशात केळी पिकांचे मोठे नुकसान झाले. परंतु तीन दिवसांनंतरही पंचनामे केले गेलेले नाहीत. वादळ, पाऊस, वीज कोसळणे यासंबंधी अंदाज वर्तविणारी उपकरणे बसविल्याचा दावा लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणा करीत असते. पण या उपकरणांचा कोणताही फायदा शेतकरी वा सामान्य नागरिकाला होत नाही. उपकरणे असतील तर ती कार्यान्वीत आहेत काय, नादुरुस्त असतील तर त्याची दुरुस्ती कुणी करायची यासंबंधी आढावा बैठकांमध्ये चर्चा होते काय? नालेसफाई हा गाव आणि शहरांमधील जिव्हाळ्याचा विषय आहे. नदीकाठी असलेली अतिक्रमणे आणि जीर्ण इमारतींना नोटीसा हा दरवर्षीचा नैमित्तिक उपचार आहे; तो गांभीर्याने घेतला जात नाही. मानवी वस्तींमध्ये पाणी शिरले, जुनी इमारत कोसळली आणि त्यातून जीवित वा वित्त हानी झाली की, प्रशासनाचे डोळे खाडकन उघडतात. वेगवेगळ्या शासकीय विभागांमध्ये मग जबाबदारी कुणाची हा ढकलाढकलीचा लोकप्रिय कार्यक्रम सुरु होतो. दोषींवर कारवाईचे इशारे दिले जातात. ‘ये रे माझ्या मागल्या’ प्रमाणे पुढील दुर्घटना होईपर्यंत याविषयात काहीही होत नाही. शेंदुर्णीसारख्या गावात दीड दिवस वीजपुरवठा खंडित होता. अनेक ठिकाणी तासन्तास वीज गायब होती. पहिल्याच पावसात हे हाल असतील तर संपूर्ण चार महिन्यात काय होईल. तीच गत पाणीपुरवठा योजनांची होती. वीज पुरवठा नसल्याने पाणीपुरवठा लांबण्याचे समीकरण झाले आहे. वीज तारांना अडथळा आणणाऱ्या फांद्या तोडायच्या आणि त्या तशाच पडू द्यायच्या, एवढाच वीज कंपनीचा मान्सूनपूर्व कामांचा आराखडा असतो. एकंदर यंत्रणेची देखभाल दुरुस्ती वीज कंपनी आणि स्थानिक स्वराज्य संस्था करीत नाही, त्यामुळे वीज आणि पाण्यावाचून नागरिकांचे हाल निश्चितपणे होतात. राहता राहिला आरोग्य विभाग. पावसाळ्यापूर्वी सर्व आरोग्य केंद्रे, रुग्णालयांमध्ये पुरेसा औषधीसाठा, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाºयांची कायमस्वरुपी उपलब्धता असावी अशी काळजी घेणे अपेक्षित असताना तेथेही हीच बोंब आहे.-मिलींद कुलकर्णी

टॅग्स :Jalgaonजळगाव