शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
3
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
4
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
5
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
6
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
7
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
8
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
9
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
10
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
11
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
12
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
13
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
14
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
16
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
17
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
18
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
19
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
20
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
Daily Top 2Weekly Top 5

वा रे आपत्ती व्यवस्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 14:20 IST

नेमेची येतो मग पावसाळा...हे माहित असूनही मान्सूनपूर्व तयारी, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची सज्जता या गोष्टी केवळ बैठका, इतिवृत्त आणि अहवालापुरती मर्यादित राहिल्या आहेत, हे पहिल्याच पावसाने सिध्द केले आहे.

नेमेची येतो मग पावसाळा...हे माहित असूनही मान्सूनपूर्व तयारी, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची सज्जता या गोष्टी केवळ बैठका, इतिवृत्त आणि अहवालापुरती मर्यादित राहिल्या आहेत, हे पहिल्याच पावसाने सिध्द केले आहे. संपूर्ण खान्देशात पावसाने जी दाणादाण उडवली, त्यावरुन प्रशासकीय यंत्रणेच्या पूर्वतयारीचे बिंग फुटले आहे. धुळ्यानजिक असलेल्या वरखेडी गावात चिंचेचे जुने झाड कोसळून तीन बालकांसह आईचा मृत्यू झाला. रात्री साडेआठ वाजेच्या या घटनेनंतर मदतकार्याला तब्बल तीन तासानंतर सुरुवात झाली. यावरुन प्रशासकीय यंत्रणा किती सज्ज आहे, हे दिसून येते. शनिवारी जळगाव शहरात पाऊस पडला, सखल भागात पाणी साचलेले होते. पण महापालिकेच्या आपत्कालीन विभागाने रविवारी ‘सुटी’चा आनंद घेतला. कक्षाला कुलूप लावून अधिकारी आणि कर्मचारी निवांत होते.या दोन्ही घटना जिल्हा मुख्यालयाच्याठिकाणी वा त्या नजिक घडल्या आहेत. सगळे वर्ग एकचे अधिकारी याठिकाणी असताना एवढी बेफिकीरी असेल तर गावपातळीवर काय अवस्था असेल याची कल्पना केलेली बरी. संपूर्ण खान्देशात केळी पिकांचे मोठे नुकसान झाले. परंतु तीन दिवसांनंतरही पंचनामे केले गेलेले नाहीत. वादळ, पाऊस, वीज कोसळणे यासंबंधी अंदाज वर्तविणारी उपकरणे बसविल्याचा दावा लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणा करीत असते. पण या उपकरणांचा कोणताही फायदा शेतकरी वा सामान्य नागरिकाला होत नाही. उपकरणे असतील तर ती कार्यान्वीत आहेत काय, नादुरुस्त असतील तर त्याची दुरुस्ती कुणी करायची यासंबंधी आढावा बैठकांमध्ये चर्चा होते काय? नालेसफाई हा गाव आणि शहरांमधील जिव्हाळ्याचा विषय आहे. नदीकाठी असलेली अतिक्रमणे आणि जीर्ण इमारतींना नोटीसा हा दरवर्षीचा नैमित्तिक उपचार आहे; तो गांभीर्याने घेतला जात नाही. मानवी वस्तींमध्ये पाणी शिरले, जुनी इमारत कोसळली आणि त्यातून जीवित वा वित्त हानी झाली की, प्रशासनाचे डोळे खाडकन उघडतात. वेगवेगळ्या शासकीय विभागांमध्ये मग जबाबदारी कुणाची हा ढकलाढकलीचा लोकप्रिय कार्यक्रम सुरु होतो. दोषींवर कारवाईचे इशारे दिले जातात. ‘ये रे माझ्या मागल्या’ प्रमाणे पुढील दुर्घटना होईपर्यंत याविषयात काहीही होत नाही. शेंदुर्णीसारख्या गावात दीड दिवस वीजपुरवठा खंडित होता. अनेक ठिकाणी तासन्तास वीज गायब होती. पहिल्याच पावसात हे हाल असतील तर संपूर्ण चार महिन्यात काय होईल. तीच गत पाणीपुरवठा योजनांची होती. वीज पुरवठा नसल्याने पाणीपुरवठा लांबण्याचे समीकरण झाले आहे. वीज तारांना अडथळा आणणाऱ्या फांद्या तोडायच्या आणि त्या तशाच पडू द्यायच्या, एवढाच वीज कंपनीचा मान्सूनपूर्व कामांचा आराखडा असतो. एकंदर यंत्रणेची देखभाल दुरुस्ती वीज कंपनी आणि स्थानिक स्वराज्य संस्था करीत नाही, त्यामुळे वीज आणि पाण्यावाचून नागरिकांचे हाल निश्चितपणे होतात. राहता राहिला आरोग्य विभाग. पावसाळ्यापूर्वी सर्व आरोग्य केंद्रे, रुग्णालयांमध्ये पुरेसा औषधीसाठा, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाºयांची कायमस्वरुपी उपलब्धता असावी अशी काळजी घेणे अपेक्षित असताना तेथेही हीच बोंब आहे.-मिलींद कुलकर्णी

टॅग्स :Jalgaonजळगाव