शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

जामनेर तालुक्यात ‘वॉश आऊट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 16:51 IST

पालकमंत्र्यांकडून कानउघाडणी : पोलिसांकडून ११ गावांमध्ये दारुचे रसायन नष्ट

पहूर, ता.जामनेर : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची कान उघडणी केल्यानंतर झोपेचे सोंग घेतलेला पोलीस विभाग खडबडून जागा झाला आहे. सोमवारी पाचोरा विभागाचे डिवायएसपी ईश्वर कातकडे यांच्यासह जामनेर व पहूर पोलिसांनी अकरा गावातील अवैधधंद्यावाल्या विरूद्ध वॉशआऊट मोहीमेचे हत्यार उपसले आहे.पहूर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या काही गावांमध्ये सट्टा, पत्ता राजरोस पणे सुरू असून पहूर, तोंडापूर, भारूडखेडा, शेंगोळा चिलगाव व वाकोद देऊळगाव गुजरी, फत्तेपूर परीसर, पाळधी याठिकाणी अवैध दारूची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वी साहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाठ यांनी अवैध धंद्यावाल्यांविरुद्ध कारवाई अस्त्र उपसले खरे मात्र सातत्य नसल्याने पुन्हा अवैध धंद्यांनी डोके वर काढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. पहूर पोलीस फक्त अवैध धंदे बंद असल्याच्या वल्गना करून सर्व आलबेल असल्याचे दाखवित होते. शेवटी हा प्रश्न पालकमंत्री महाजन यांच्या कोर्टात शनिवारी गेला. भारूडखड्यातील संतप्त महिलांनी याला वाचा फोडल्याने महाजन यांनी पोलीस विभागाला खडेबोल सुनावून गाठ माझ्याशी आहे, असा दम भरला आहे. त्यामुळे पोलीस दल हादरला असल्याने कारवाईसाठी अखेर डिवायएसपी ईश्वर कातकडे यांना रस्त्यावर उतरण्यास भाग पाडले आहे.याप्रकरणी रूमशाद सलीम तडवी, हिमताज मस्तान तडवी, रूपेश सिध्दार्थ पवार( रा वडाळी), नशीर सांडू तडवी , नजीर दगडू तडवी, चिंधू रहेमान तडवी (रा शेंगोळा), रोहिदास रामलाल मोची( रा वाकडी), शिवाजी संभाजी मोरे (वाकोद) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मोहिमेत जामनेरचे सपोनि राजेश काळे, पोलीस उपनिरीक्षक सुनिल कदम, पाचोºयाचे पोलीस उपनिरीक्षक चौबे यांच्यासह पाचोरा येथील पाच, पिंपळगाव हरेश्वर पाच व पहूर पोलिस स्टेशनचे संपूर्ण पोलीस कर्मचारी सहभागी झाले. पहूर पोलीस स्टेशन अंतर्गत ७८ गावे असून अकरा गावात धडक कारवाई राबविण्यात आली आहे.आता उर्वरित गावातील अवैधधंद्याचे काय असा प्रश्न समोर आला आहे. तसेच कारवाईत सातत्य राहणे अपेक्षित आहे.स्वत :डीवायएसपींकडून कारवाईएलसीबीने तोंडापूर -ढालगांव रस्त्यावर छापा मारल्या नंतर वाकोद, वडाळी, भारूडखेडा, तोंडापूर, ढालसिंगी, शेंगोळा, वाकडी, नाचनखेडा, पाळधी, शेंदूर्णी व चिलगाव या अकरा गावात सकाळी पाच वाजेपासून पाचोरा विभागाचे डीवायएसपी ईश्वर कातकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाठ यांच्या पथकाने धडक कारवाईत ५७ हजार सहाशे दहाचे कच्चे व पक्के गावठी दारूचे रसायन नष्ट केले. तर देशीदारूच्या बारा बाटल्या जप्त केल्या आहेत. कारवाईची माहिती मिळताच काही गावातील अवैध धंद्यावाल्यांनी पलायन केल्याचे दिसून आले आहे.