शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

समस्या सोडविण्यासाठी वारकऱ्यांचे संघटन- भाऊराव महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 19:45 IST

मतीन शेख मुक्ताईनगर , जि.जळगाव : समाजातील समस्या सोडविण्यासाठी वारकऱ्यांचे संघटन करण्यात येत असल्याचे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राज्य ...

ठळक मुद्देसंडे स्पेशल मुलाखत मंडळाचे कार्यक्षेत्र अखिल भारत स्तरावर

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : समाजातील समस्या सोडविण्यासाठी वारकऱ्यांचे संघटन करण्यात येत असल्याचे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राज्य कोषाध्यक्ष तथा मुक्ताईनगरचे रहिवासी ह.भ.प. भाऊराव महाराज पाटील यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.संत मुक्ताईच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत भूमिपुत्र म्हणून गेल्या २९ वर्षांपासून शिक्षकी पेशा सांभाळत राज्यासह गुजरात, मध्य प्रदेश येथेही ते कीर्तन सेवा देतात. संतांची शिकवण तिमिरातूनी तेजाकडे नेणाºया आध्यत्मिक कार्यातूून मानवी जीवनात सकारात्मक बदल घडविते ते कार्य वारकरी धुरंदर पुढे नेत आहे. त्यांच्या विचारांचा पगडा घेऊन भाऊराव महाराज कार्य करीत आहेत. त्यांची नुकतीच वारकरी मंडळावर निवड झाली. यानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद.प्रश्न : वारकरी मंडळाचे नेमके काम काय असते?उत्तर : अखिल भारतीय वारकरी मंडळ हे गेल्या अनेक वर्षांपासून देशात कार्यरत आहे. या मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले व प्रदेश अध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे (सोलापूर) यांच्या मार्गदर्शनाने मंडळामार्फत अनेक कार्य केले जातात. मुख्य म्हणजे संतांनी दिलेल्या शिकवणीतून समाज मनावर संस्कार करण्यासाठी संघटन आवश्यक असते. या मंडळाच्या माध्यमातून वारकºयांना एकत्रित करून वारकरी संप्रदायातील संतांचे विचार, त्याचा प्रचार, प्रसार करण्यासाठी सर्व महाराज मंडळी कीर्तन सप्ताहाचे आयोजन करतात. २००८ ला देहू येथे ४ लाख लोकांना एकत्रित करून तुकाराम गाथा पारायण केले. २०१५-१६ मध्ये आळंदीला १ लाख लोकांचे ज्ञानेश्वरी पारायण केले. तसेच दिल्ली येथे रामलीला मैदानावरसुद्धा गाथा पारायण केले. असे अनेक अध्यात्मिक कार्यक्रम या मंडळमार्फत केले जातात. विविध प्रकारच्या सामाजिक समस्या सोडवणसाठी कार्यशाळासुद्धा शासनाच्या सहकायार्ने आयोजित केल्या जातात. जसे कुपोषण निर्मूलन, स्वच्छता अभियान, पर्यावरण संवर्धन, झाडे लावा झाडे जगवा शिक्षण इत्यादी.प्रश्न : मंडळाचा उद्देश काय?उत्तर : मंडळाचा मुख्य उद्देश म्हणजे सामाजिक स्तरावर उद्भवणाºया अनेक समस्या सोडवण्यासाठी समाज प्रबोधन करण्यासाठी वारकºयांचे संघटन करणे, समाज प्रबोधनातून सुदृढ, सकारात्मक समाज निर्मिती आणि आध्यत्मिक सेवा देणे, त्याचप्रमाणे समाजातील विविध कला गुण असणाºया व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करणे, दरवर्षी आळंदी येथे माऊलींच्या समाधी सोहळ्याला पुरस्कार वितरण करण्यात येते. त्यात महिला व पुरुष असे दोन गट आहेत. त्याचप्रमाणे केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने वेगवेगळ्या कार्यशाळा आयोजित करणे, वारकºयांसाठी शासनाच्या असलेल्या योजनेचा वारकºयांना लाभ मिळवून देणे अशा अनेक स्तरावर हे मंडळ कार्य करते.प्रश्न : मंडळाचे कार्यक्षेत्र कुठपर्यंतउत्तर : या मंडळाचे कार्यक्षेत्र हे अखिल भारत स्तरावर आहे. देशाच्या अनेक राज्यांमध्ये मंडळाचे कार्य सुरू आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, तेलंगणा, हरियाणा, मध्यप्रदेश ई.राज्यात मंडळाचे कार्य जोमात सुरू आहे.प्रश्न : सध्या कोरोना महामारीचा प्रकोप सुरू आहे. तो रोखण्यासाठी वारकरी स्तरावर काय करता येऊ शकते? वारकरी पंथात यावर काही उपाय योजना आहेत का?उत्तर : सध्या साºया जगात कोरोनाने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत कायद्याने समाजमन लवकर वळत नाही. म्हणून वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाद्वारे लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम हाती घेणे गरजेचे आहे. कारण शासनापेक्षा लोकांची श्रद्धा अध्यात्मा आणि कीर्तनकारावर जास्त आहे. म्हणून ते होणे गरजेचे आहे. मंडळाचे बरेच कीर्तनकार समाजातील दानशूर मंडळींच्या मदतीने गरीब लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सध्या करत आहेत.कोरोना थांबवण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळणे, साबणाने वारंवार हात स्वच्छ धुणे, मास्क लावणे, घरीच थांबणे असे अनेक उपाय करता येतील हे शासन सांगते आहे पण लोक त्याकडे पाहिजे तेव्हढे लक्ष देत नाही. म्हणून प्रत्येक तालुक्यात असलेल्या वारकºयांनी गावागावात या प्रबोधन करणे ही काळाची गरज आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमMuktainagarमुक्ताईनगर