शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

केळी प्रक्रिया उद्योग सुरू करायचाय, ‘पीएमएफएमई’साठी अर्ज केला का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2022 12:51 IST

जिल्ह्यात केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगातून आतापर्यंत ६४ नवे उद्योग उभे राहिले आहेत. त्यात केळीवर आधारित प्रक्रिया उद्योग आणि इतर पिकांवर आधारित प्रक्रिया उद्योगांचा समावेश आहे.

जळगाव : केळी प्रक्रिया उद्योग सुरू करायचा असेल तर त्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगातून कर्ज आणि अनुदान मिळवता येते. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत पीएमएफएमई या योजनेतून ६४ आणि फक्त केळीवर प्रक्रियेसाठी २३ उद्योग सुरू करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगातून आतापर्यंत ६४ नवे उद्योग उभे राहिले आहेत. त्यात केळीवर आधारित प्रक्रिया उद्योग आणि इतर पिकांवर आधारित प्रक्रिया उद्योगांचा समावेश आहे. या योजनेत सरकारकडून उद्योगांना ३५ टक्के अनुदान दिले जाते. केंद्र सरकारनेच यात एक जिल्हा एक उत्पादन ही अट काढून टाकली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यासाठी केळीचा समावेश करण्यात आला होता. मात्र, आता ही अट निघाल्याने इतर उद्योगांनाही फायदा झाला आहे.

योजनेसाठी कोणाला अर्ज करता येईल ?

यात लाभार्थी हा वैयक्तिक किंवा बचत गटदेखील असू शकतो. त्यासोबतच त्याने वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली असावी. यात महिला बचत गटांवर विशेष लक्ष दिले जाते. तसेच आधी फक्त एक जिल्हा एक उत्पादन योजनेत केळी प्रक्रिया उद्योगावरच लक्ष दिले जात होते. मात्र, आता सर्वच पिकांना त्यात स्थान मिळाले आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्जदेखील करता येतो.

जिल्ह्यात या योजनेंतर्गत ६४ उद्योग सुरू

जळगाव जिल्ह्यात या योजनेतून आतापर्यंत ६४ नवे उद्योग सुरू करण्यात आले आहेत. त्यात पापड उद्योग, केळी, लिंबू, दाळ उद्योगासाठी अर्ज केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यात फक्त केळीवरच लक्ष दिले जात होते. मात्र, केंद्र शासनाने अट काढून टाकल्यानंतर इतर उद्योगांनाही फायदा होत आहे.

केळी उद्योगासाठी करा अर्ज

जळगाव जिल्ह्यात या योजनेतून केळीवर प्रक्रिया करणारे २३ उद्योग सुरू झाले आहेत. काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनानेच केळी वेफर्स करणाऱ्या उद्योगांकडे लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला होता. यात अनेक प्रस्ताव दाखल झाल्यावर बँका त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे.

बँकांनी नाकारले १८९ प्रस्ताव

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४६५ प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. त्यातील फक्त ६४ प्रस्तावच मंजूर झाले आहेत, तर ११९ प्रस्ताव बँकांकडे प्रलंबित आहेत आणि १८९ प्रस्ताव बँकांनी नाकारले आहेत. त्यातही काही ठरावीक बँका हे प्रस्ताव नाकारत असल्याचे समोर येत आहे, तर एका बँकेने जिल्ह्यातील सर्व अर्जदारांना भुसावळला येण्याची अट घातली आहे.

अधिकारी काय म्हणतात....

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ४६५ प्रस्ताव बँकांकडे पाठवण्यात आले आहेत. त्यातील ६४ उद्योगांना कर्ज मंजूर झाले आहेत. त्यातील २३ उद्योग हे केळीशी संबधित आहेत. तसेच या योजनेत ज्यांना सहभागी व्हायचे असेल, त्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा. - अनिल भोकरे, कृषी उपसंचालक.

टॅग्स :Jalgaonजळगावbusinessव्यवसाय