शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

गावातील ज्वलंत समस्या सुटण्यासाठी ग्रामस्थांना आता ग्रामसभेची आस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:21 IST

भुसावळ : तालुक्यातील कोरोना रुग्णांची स्थिती जवळपास १०० टक्के आटोक्यात आली असून, मात्र कोरोनाच्या नावाखाली ग्रामसभा अद्यापही ...

भुसावळ : तालुक्यातील कोरोना रुग्णांची स्थिती जवळपास १०० टक्के आटोक्यात आली असून, मात्र कोरोनाच्या नावाखाली ग्रामसभा अद्यापही होत नाही. यामुळे गावातील ज्वलंत समस्या सुटणार कशा, हा प्रश्न आता उभा ठाकला आहे.

१५ ऑगस्ट रोजी गावात ग्रामसभा घेऊन त्यामध्ये पुढील वर्षीचे गावाच्या विकासाचे तसेच आर्थिक नियोजन करण्यात येते; मात्र कोरोनामुळे ग्रामसभा घेण्यास मनाई आहे. त्यामुळे या वर्षी ग्रामसभा घ्यायच्या की नाही, याबाबत गावकरी शासन निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत.

१५ ऑगस्ट रोजी गावांमध्ये ग्रामसभा घेण्यात येते. या ग्रामसभेत गतवर्षी आढावा घेण्यात येतो. तसेच पुढील वर्षीचे आर्थिक नियोजनही करण्यात येते. पुढील गावात करावयाची विकासकामे तसेच त्याकरिता लागणारा निधी याचे नियोजन करण्यात येते. कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ कुणाला द्यायचा, रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावात कोणती विकासकामे करायची, याचे नियोजन या ग्रामसभेत करण्यात येते. त्यामुळे ही ग्रामसभा गावाच्या विकासासाठी महत्त्वाची असते. त्यामुळे या वर्षी ग्रामसभा घेण्याची परवानगी मिळते की नाही, या निर्णयाच्या प्रतीक्षेत गावकरी आहेत.

ग्रामपंचायतींचा कारभार पारदर्शक व्हावा या हेतूने महाराष्ट्र शासनाने ग्रामसभेसंदर्भात १६ ऑक्टोबर २००२ रोजी ग्रामपंचायत सुधारणा अध्यादेश काढला. त्यामुळे ग्रामसभांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

गतवर्षापासून कोरोनाच्या प्रभावाने असामान्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या एकही नियमित ग्रामसभा घेतल्या गेल्या नाहीत.

तालुक्यातील ९० टक्के गावे कोरोनामुक्त झाली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या नियमित ग्रामसभा घेण्यात याव्यात. ग्रामपंचायतीच्या मासिक सभा होतात. सरपंच, सदस्य विविध ठराव पारित करीत असतात, तसेच वैयक्तिक लाभाची निवड करणे आदीबाबत अनियमितता होत आहे.

१५ ऑगस्टच्या ग्रामसभा अन्य दिवशी घेण्याचे आदेश

राज्यात दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी ग्रामसभा घेण्यात येत होत्या; मात्र ग्रामसभांमध्ये वादही होतो. काही ठिकाणी हाणामारीही होते. स्वातंत्र्यदिनीच ग्रामसभेत वाद होत असल्यामुळे शासनाने १५ ऑगस्ट रोजी होणारी ग्रामसभा याच आठवड्यात अन्य दिवशी घेण्याचे आदेश दिले आहेत.

कोरोनामुक्त गावांना ग्रामसभेची परवानगी द्या!

कोरोनाचा प्रभाव कमी झाला. गाव तीन ते चार महिन्यांपासून कोरोनामुक्त आहे. त्यामुळे आता तरी ग्रामसभा घेण्याची परवागनी द्या, अशी मागणी गावागावातून होत आहे. तसेच गटविकास अधिकाऱ्यांना काही सरपंच, सचिवांनी ग्रामसभा घेण्याची परवानगी मागितली आहे.

गावांमध्ये ग्रामसभा घेण्याबाबत अद्याप शासनाच्या वतीने कोणतेही आदेश आले नाहीत. १५ ऑगस्ट रोजी घेण्यात येणाऱ्या ग्रामसभा आता अन्य दिवशी घेण्याचे शासनाचे आदेश आहेत; मात्र ग्रामसभा घ्यायची की नाही, याबाबत आदेश आले नाहीत.

- विलास भाटकर, गटविकास अधिकारी, भुसावळ

शासनाने १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करण्याची परवानगी दिली आहे. त्याच धर्तीवर ग्रामसभा घेण्याची परवानगी द्यायला हवी. या ग्रामसभेत पुढील वर्षाचा गाव विकासाचा आराखडा तयार करण्यात येतो.

- मनीषा अजय चौधरी, सदस्य, ग्राम पंचायत, साकेगाव, साकेगाव, ता. भुसावळ