शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
3
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
4
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
5
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
6
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
7
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
8
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
9
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
10
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
11
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
12
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
13
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
14
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
15
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
16
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
17
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
18
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
19
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
20
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?

गावातील ज्वलंत समस्या सुटण्यासाठी ग्रामस्थांना आता ग्रामसभेची आस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:21 IST

भुसावळ : तालुक्यातील कोरोना रुग्णांची स्थिती जवळपास १०० टक्के आटोक्यात आली असून, मात्र कोरोनाच्या नावाखाली ग्रामसभा अद्यापही ...

भुसावळ : तालुक्यातील कोरोना रुग्णांची स्थिती जवळपास १०० टक्के आटोक्यात आली असून, मात्र कोरोनाच्या नावाखाली ग्रामसभा अद्यापही होत नाही. यामुळे गावातील ज्वलंत समस्या सुटणार कशा, हा प्रश्न आता उभा ठाकला आहे.

१५ ऑगस्ट रोजी गावात ग्रामसभा घेऊन त्यामध्ये पुढील वर्षीचे गावाच्या विकासाचे तसेच आर्थिक नियोजन करण्यात येते; मात्र कोरोनामुळे ग्रामसभा घेण्यास मनाई आहे. त्यामुळे या वर्षी ग्रामसभा घ्यायच्या की नाही, याबाबत गावकरी शासन निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत.

१५ ऑगस्ट रोजी गावांमध्ये ग्रामसभा घेण्यात येते. या ग्रामसभेत गतवर्षी आढावा घेण्यात येतो. तसेच पुढील वर्षीचे आर्थिक नियोजनही करण्यात येते. पुढील गावात करावयाची विकासकामे तसेच त्याकरिता लागणारा निधी याचे नियोजन करण्यात येते. कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ कुणाला द्यायचा, रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावात कोणती विकासकामे करायची, याचे नियोजन या ग्रामसभेत करण्यात येते. त्यामुळे ही ग्रामसभा गावाच्या विकासासाठी महत्त्वाची असते. त्यामुळे या वर्षी ग्रामसभा घेण्याची परवानगी मिळते की नाही, या निर्णयाच्या प्रतीक्षेत गावकरी आहेत.

ग्रामपंचायतींचा कारभार पारदर्शक व्हावा या हेतूने महाराष्ट्र शासनाने ग्रामसभेसंदर्भात १६ ऑक्टोबर २००२ रोजी ग्रामपंचायत सुधारणा अध्यादेश काढला. त्यामुळे ग्रामसभांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

गतवर्षापासून कोरोनाच्या प्रभावाने असामान्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या एकही नियमित ग्रामसभा घेतल्या गेल्या नाहीत.

तालुक्यातील ९० टक्के गावे कोरोनामुक्त झाली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या नियमित ग्रामसभा घेण्यात याव्यात. ग्रामपंचायतीच्या मासिक सभा होतात. सरपंच, सदस्य विविध ठराव पारित करीत असतात, तसेच वैयक्तिक लाभाची निवड करणे आदीबाबत अनियमितता होत आहे.

१५ ऑगस्टच्या ग्रामसभा अन्य दिवशी घेण्याचे आदेश

राज्यात दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी ग्रामसभा घेण्यात येत होत्या; मात्र ग्रामसभांमध्ये वादही होतो. काही ठिकाणी हाणामारीही होते. स्वातंत्र्यदिनीच ग्रामसभेत वाद होत असल्यामुळे शासनाने १५ ऑगस्ट रोजी होणारी ग्रामसभा याच आठवड्यात अन्य दिवशी घेण्याचे आदेश दिले आहेत.

कोरोनामुक्त गावांना ग्रामसभेची परवानगी द्या!

कोरोनाचा प्रभाव कमी झाला. गाव तीन ते चार महिन्यांपासून कोरोनामुक्त आहे. त्यामुळे आता तरी ग्रामसभा घेण्याची परवागनी द्या, अशी मागणी गावागावातून होत आहे. तसेच गटविकास अधिकाऱ्यांना काही सरपंच, सचिवांनी ग्रामसभा घेण्याची परवानगी मागितली आहे.

गावांमध्ये ग्रामसभा घेण्याबाबत अद्याप शासनाच्या वतीने कोणतेही आदेश आले नाहीत. १५ ऑगस्ट रोजी घेण्यात येणाऱ्या ग्रामसभा आता अन्य दिवशी घेण्याचे शासनाचे आदेश आहेत; मात्र ग्रामसभा घ्यायची की नाही, याबाबत आदेश आले नाहीत.

- विलास भाटकर, गटविकास अधिकारी, भुसावळ

शासनाने १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करण्याची परवानगी दिली आहे. त्याच धर्तीवर ग्रामसभा घेण्याची परवानगी द्यायला हवी. या ग्रामसभेत पुढील वर्षाचा गाव विकासाचा आराखडा तयार करण्यात येतो.

- मनीषा अजय चौधरी, सदस्य, ग्राम पंचायत, साकेगाव, साकेगाव, ता. भुसावळ