शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
2
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
3
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
4
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
5
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
6
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
7
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
8
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
9
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
10
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
11
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
12
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
13
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
14
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
15
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
16
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
17
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
18
अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
19
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
20
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?

खचत्या डोंगराची ग्रामस्थांना भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क हरताळा, ता. मुक्ताईनगर : हरताळे गाव पूर्वापार डोंगराजवळ वसलेले आहे. डोंगराच्या पायथ्याशी मोठी वस्ती आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

हरताळा, ता. मुक्ताईनगर : हरताळे गाव पूर्वापार डोंगराजवळ वसलेले आहे. डोंगराच्या पायथ्याशी मोठी वस्ती आहे. त्या वस्तीजवळ असलेला डोंगर पावसाळ्याच्या दिवसात ढासळत असून, डोंगराचे पाणी घरांमध्ये शिरते. डोंगराच्या भागाखाली राहणाऱ्या ग्रामस्थांच्या घरापर्यंत दगड-माती खचून घरावर पडत असल्याने डोंगराचे पाणीही भिंतींमध्ये मुरते. यामुळे रहिवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्याठिकाणी आरसीसी बांधकाम करून मोठी संरक्षक भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामपंचायत प्रशासनानेही या ठिकाणी भराव टाकून घरांमध्ये शिरणाऱ्या पाण्याला आडोसा घालावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून डोंगराच्या पायथ्याशी वस्ती असलेले हे गाव आहे. या ठिकाणी दगड, माती धसत असते. २५ ते ३० फूट उंच डोंगराच्या पायथ्याशी नागरी वस्ती असल्याने त्या ठिकाणी मोठी दरी आहे. तेथूनच वरच्या बाजूलादेखील वस्ती आहे.

गेल्या ६०-७० वर्षांपूर्वी येथील जाणकारांनी या वस्तीला दगडांमध्ये भिंत बांधून आडोसा करून गैरसोय दूर केली होती. काहींनी त्याची आठवण करून दिली, तर काहींना माळीण गावासारख्या भूस्खलनाची आठवण झाली.

हरताळे येथील वस्तीतील लोक मोठे कसरत करत ये-जा करत असतात. त्यासाठी येथे संरक्षक भिंत किंवा आरसीसी बांधकाम करून ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी येथील रहिवासी अशोक श्रीराम तायडे, प्रकाश सीताराम निकम व जवळ राहणाऱ्या सर्व ग्रामस्थांनी केली आहे.

रात्री-अपरात्री दरड धसून पडल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. मागील वर्षी यासंदर्भात येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला अर्ज दिला होता. काही वेळा वरील डोंगराचे पाणी घरातूनसुद्धा झिरपत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरवेळेस भिंती भिजतात. त्यामुळे घरात लहान मुले असल्याने भीती वाटत असल्याचे सांगितले. दुर्घटना घडण्यापूर्वीच येथील मोठा निधी उपलब्ध करून आरसीसी काम करून गैरसोय दूर करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

तसेच वरिष्ठांनी व लोकप्रतिनिधींनीदेखील या प्रश्नात लक्ष घालावे. भविष्यात दुर्घटना होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया

संरक्षक भिंतीसाठी वरिष्ठ स्तरावर मागणी केली आहे. संबंधित कामाविषयी प्रस्ताव पाठवला आहे. येथे आरसीसी काम करणे अपेक्षित आहे. सुमारे १५ लाख रुपयांपर्यंत निधी मिळणे अपेक्षित आहे. पाणी शिरणाऱ्या ठिकाणी लवकरच आडोसा करून भराव टाकण्यात येईल.

-एस.एन. इंगळे, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत, हरताळा, ता. मुक्ताईनगर

प्रतिक्रिया

संपूर्ण डोंगराचे पाणी घरात शिरते. घरात लहान मुले आहेत. खूप भीती वाटते. ग्रामपंचायतीकडे सांगितले असता वाॅर्डातील सदस्यांना सांगा. सदस्यांना सांगितले असता तुम्ही आम्हाला मतदान केले नाही. ज्यांना मतदान केले असेल त्यांच्याकडे जावे, असे सांगितले जाते. निवडणुकीच्या वेळी पाया पडत येतात. गरिबाने कोणाकडे धाव घ्यावी? एकमेकांवर टोलवाटोलवी करून वेळ निभावून नेली जात आहे. प्रशासनाने घरात पाणी शिरणार नाही, याची दक्षता घ्यावी, एवढीच अपेक्षा आहे.

-अशोक श्रीराम तायडे, ग्रामस्थ, हरताळा