शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

गाव वाघोड अन् रेल्वेस्थानक वाघोडा दोघांना सांधणारा मात्र रस्ताच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 18:41 IST

रावेर तालुक्यातील ‘वाघोड’ गावाच्या नावाचा अपभ्रंश करून खानापूर येथे असलेल्या मध्यरेल्वेच्या ब्रिटिशकालीन रेल्वेस्थानकाला ‘वाघोडा’ असे नाव देण्यात आले असले तरी, उभय गाव व रेल्वेस्थानकाला सांधणाऱ्या रेल्वेमार्गाला समांतर असलेल्या गाड रस्त्याला जिल्हा ग्रामीण मार्ग वा प्रमुख ग्रामीण मार्ग म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नकाशात समाविष्ट करण्याबाबत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने उभय रेल्वेस्थानक वाघोडवासीयांना रस्त्याअभावी कोसो दूर ठरत आहे. रस्त्याअभावी ग्रामस्थांची फरफट होत आहे.

ठळक मुद्देब्रिटिशांविरूद्ध चले जाव आंदोलनात गोºया अधिकाºयाचा बळी टिपण्यासाठी वाघोड गावाजवळ पंजाब मेल उलथून टाकणाºया उभय गावाच्या स्वातंत्र्यसेनानींच्या समरगाथेचे स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही ७१ वर्षात लोकप्रतिनिधींना व प्रशासनालाही विस्मरण झाल्याने हा रस्ता अडगळीत पडमध्य रेल्वे प्रशासन रेल्वे मार्गाला समांतर रस्ता निर्माण करण्यासाठी परवानगी देत नसल्याचा उगाचच बाऊ केला जात असला तरी माजी आमदार राजाराम महाजन यांनी जुने खानापूर रेल्वेगेट ते खानापूर रेल्वेपुलापर्यंत रेल्वे मार्गाला समांतर रस्ता तयार करण्यासाठी रेल्वे प्रशखानापूर व वाघोड शिवारातील बहुतांशी शेतकºयांचा पूर्वापार शेतीचा वहिवाट रस्ता त्याच गाडीरस्त्याने असल्याने शेतकरी बांधवांनीही या मागणीसाठी जोर लावून धरला आहे.

किरण चौधरीरावेर, जि.जळगाव : तालुक्यातील ‘वाघोड’ गावाच्या नावाचा अपभ्रंश करून खानापूर येथे असलेल्या मध्यरेल्वेच्या ब्रिटिशकालीन रेल्वेस्थानकाला ‘वाघोडा’ असे नाव देण्यात आले असले तरी, उभय गाव व रेल्वेस्थानकाला सांधणाऱ्या रेल्वेमार्गाला समांतर असलेल्या गाड रस्त्याला जिल्हा ग्रामीण मार्ग वा प्रमुख ग्रामीण मार्ग म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नकाशात समाविष्ट करण्याबाबत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने उभय रेल्वेस्थानक वाघोडवासीयांना रस्त्याअभावी कोसो दूर ठरत आहे. रस्त्याअभावी ग्रामस्थांची फरफट होत आहे.वाघोड गाव तालुक्यात स्वातंत्र्य संग्रामातील १९४२ च्या ब्रिटिश चले जाव आंदोलनात मैलाचा दगड म्हणून ठरले आहे. त्यांच्या या समरगाथेचे सदैव स्मरण राहावे म्हणून ब्रिटिशांनी खानापूर नजीकच्या रेल्वेस्थानकाला वाघोड गावाच्या नावाचा अपभ्रंश करून वाघोडा नाव दिल्याचा पूर्वातिहास आहे. वाघोड गावाच्या नावाचा अपभ्रंश करून वाघोडा नाव या मध्यरेल्वेच्या स्थानकाला दिले असले तरी, स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही ७१ वर्षे लोटली तरी सदरील रेल्वेस्थानक व वाघोड गावाला सांधणाºया रेल्वेमार्गाला समांतर असलेल्या गाडी रस्त्याचा मात्र लोकप्रतिनिधींना व सार्वजनिक बांधकाम विभागाला विसर पडला आहे.वाघोड गावातील थोर स्वातंत्र्यसेनानींच्या बलिदानाच्या चिरंतन स्मृतींसाठी ब्रिटिशांनी वाघोडा स्थानकाचे नामकरण केले. मात्र त्या स्मृतींना उजाळा देताना त्या स्थानकाला उभय ग्रामस्थांच्या संपर्कात आणण्यासाठी रेल्वे मार्गाला समांतर असलेल्या पूर्वापार गाडी रस्त्याला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कृती आराखड्यात समाविष्ट करण्याबाबत राज्य सरकारने स्वातंत्र्योत्तर काळातही अक्षम्य दुर्लक्ष केले आहे.वाघोड गावातील रेल्वे प्रवाशांना पूर्वापारप्रमाणे बैलगाडीतून रेल्वेमार्गाला समांतर असलेल्या गाडी रस्त्याने ने-आण केली जात होती. मात्र आता फास्टफूडच्या जमान्यात कुणीही बैलगाडीत बसायला तयार नसल्याने थेट वाघोडा स्थानकावर कर्जोदमार्गे पाच कि.मी.च्या फेºयाने मोटारसायकल, रिक्षा वा मिळेल त्या वाहनाने जाण्याची तसदी घ्यावी लागत असल्याची शोकांतिका आहे. यामुळे हा फेरा वाचवण्यासाठी पूर्वापारप्रमाणे या खानापूर-वाघोड गाडी रस्त्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यंत्रणेने कृती आराखड्यात समावेश करून अधिकृत प्रमुख जिल्हा मार्ग वा इतर जिल्हा मार्गाचा अधिकृत दर्जा देण्यात यावा, अशी मागणी होत आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाRaverरावेर