शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

राज्य शासनाच्या हस्तक्षेपाला कंटाळून कुलगुरूंचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 21:06 IST

पत्रपरिषद : विद्यापीठ विकास मंचतर्फे शासनाचा निषेध

जळगाव : महाविकास आघाडी सरकार व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्या राजकीय हस्तक्षेपाला कंटाळून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठातील कुलगुरूंनी तडकाफडकी राजीनामा दिला असल्याचा आरोप करून विद्यापीठ विकास मंचचे विभाग प्रमुख तथा सिनेट सदस्य नितीन ठाकूर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. यावेळी अभाविप प्रदेशमंत्री सिद्धेश्वर लटपटे, सिनेट सदस्य राजेंद्र नन्नवरे, मनीषा खडके, दिनेश नाईक, अमोल मराठे आदी उपस्थित होते.गेल्या अनेक दिवसांपासून राज्य शासन विद्यापीठाच्या कामकाजात हस्तक्षेप करीत आहे. विद्यापीठाकडील शिल्लक निधी शासनाकडे वर्ग करण्याचा आग्रह, परीक्षा घ्याव्यात की नाही, विद्यापीठाच्या खर्चातून जनता दरबार भरविणे, कुलसचिव नियुक्ती संदर्भात केलेला आक्षेप व त्यानंतर न्यायालयाने राज्य शासनाला दिलेली चपराक हे ताजे असतानाच राज्यातील दोन विद्यापीठांच्या कुलगुरूंनी राजकीय हस्तक्षेपाला कंटाळून राजीनामा देणे हे शिक्षण क्षेत्रातील दुर्दैवी बाब असल्याचेही नितीन ठाकूर म्हणाले.प्रसिध्दीसाठी बिनबुडाचे आरोपमागील चार वर्षांपासून कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांच्या कार्यकाळात विद्यापीठाचा कारभार सुरळीतपणे सुरू होता. राज्यात आघाडी सरकार अस्तित्वात आल्यापासून काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वैयक्तिक प्रसिध्दीसाठी कुलगुरू व विद्यापीठ प्रशासनावर केलेल्या चुकीच्या व बिनबुडाच्या आरोपांमुळे व्यथित होऊन एका वैज्ञानिक, संवेदनशील असलेले प्रा.पी.पी.पाटील यांनी राजीनामा दिला असावा, असे स्पष्ट मत असल्याचे ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.शिक्षण क्षेत्रातील वाढता हस्तक्षेप थांबवाआता विद्यापीठात गोंधळ घालणाऱ्यांना अटकाव करण्यासाठी विद्यापीठ विकास मंच कटिबध्द राहणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने शिक्षण क्षेत्रातील वाढता हस्तक्षेप थांबवावा, अशी मागणी विद्यापीठ विकास मंचतर्फे करण्यात आली.

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव