शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

राज्य शासनाच्या हस्तक्षेपाला कंटाळून कुलगुरूंचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 21:06 IST

पत्रपरिषद : विद्यापीठ विकास मंचतर्फे शासनाचा निषेध

जळगाव : महाविकास आघाडी सरकार व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्या राजकीय हस्तक्षेपाला कंटाळून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठातील कुलगुरूंनी तडकाफडकी राजीनामा दिला असल्याचा आरोप करून विद्यापीठ विकास मंचचे विभाग प्रमुख तथा सिनेट सदस्य नितीन ठाकूर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. यावेळी अभाविप प्रदेशमंत्री सिद्धेश्वर लटपटे, सिनेट सदस्य राजेंद्र नन्नवरे, मनीषा खडके, दिनेश नाईक, अमोल मराठे आदी उपस्थित होते.गेल्या अनेक दिवसांपासून राज्य शासन विद्यापीठाच्या कामकाजात हस्तक्षेप करीत आहे. विद्यापीठाकडील शिल्लक निधी शासनाकडे वर्ग करण्याचा आग्रह, परीक्षा घ्याव्यात की नाही, विद्यापीठाच्या खर्चातून जनता दरबार भरविणे, कुलसचिव नियुक्ती संदर्भात केलेला आक्षेप व त्यानंतर न्यायालयाने राज्य शासनाला दिलेली चपराक हे ताजे असतानाच राज्यातील दोन विद्यापीठांच्या कुलगुरूंनी राजकीय हस्तक्षेपाला कंटाळून राजीनामा देणे हे शिक्षण क्षेत्रातील दुर्दैवी बाब असल्याचेही नितीन ठाकूर म्हणाले.प्रसिध्दीसाठी बिनबुडाचे आरोपमागील चार वर्षांपासून कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांच्या कार्यकाळात विद्यापीठाचा कारभार सुरळीतपणे सुरू होता. राज्यात आघाडी सरकार अस्तित्वात आल्यापासून काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वैयक्तिक प्रसिध्दीसाठी कुलगुरू व विद्यापीठ प्रशासनावर केलेल्या चुकीच्या व बिनबुडाच्या आरोपांमुळे व्यथित होऊन एका वैज्ञानिक, संवेदनशील असलेले प्रा.पी.पी.पाटील यांनी राजीनामा दिला असावा, असे स्पष्ट मत असल्याचे ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.शिक्षण क्षेत्रातील वाढता हस्तक्षेप थांबवाआता विद्यापीठात गोंधळ घालणाऱ्यांना अटकाव करण्यासाठी विद्यापीठ विकास मंच कटिबध्द राहणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने शिक्षण क्षेत्रातील वाढता हस्तक्षेप थांबवावा, अशी मागणी विद्यापीठ विकास मंचतर्फे करण्यात आली.

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव