शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

राज्य शासनाच्या हस्तक्षेपाला कंटाळून कुलगुरूंचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 21:06 IST

पत्रपरिषद : विद्यापीठ विकास मंचतर्फे शासनाचा निषेध

जळगाव : महाविकास आघाडी सरकार व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्या राजकीय हस्तक्षेपाला कंटाळून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठातील कुलगुरूंनी तडकाफडकी राजीनामा दिला असल्याचा आरोप करून विद्यापीठ विकास मंचचे विभाग प्रमुख तथा सिनेट सदस्य नितीन ठाकूर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. यावेळी अभाविप प्रदेशमंत्री सिद्धेश्वर लटपटे, सिनेट सदस्य राजेंद्र नन्नवरे, मनीषा खडके, दिनेश नाईक, अमोल मराठे आदी उपस्थित होते.गेल्या अनेक दिवसांपासून राज्य शासन विद्यापीठाच्या कामकाजात हस्तक्षेप करीत आहे. विद्यापीठाकडील शिल्लक निधी शासनाकडे वर्ग करण्याचा आग्रह, परीक्षा घ्याव्यात की नाही, विद्यापीठाच्या खर्चातून जनता दरबार भरविणे, कुलसचिव नियुक्ती संदर्भात केलेला आक्षेप व त्यानंतर न्यायालयाने राज्य शासनाला दिलेली चपराक हे ताजे असतानाच राज्यातील दोन विद्यापीठांच्या कुलगुरूंनी राजकीय हस्तक्षेपाला कंटाळून राजीनामा देणे हे शिक्षण क्षेत्रातील दुर्दैवी बाब असल्याचेही नितीन ठाकूर म्हणाले.प्रसिध्दीसाठी बिनबुडाचे आरोपमागील चार वर्षांपासून कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांच्या कार्यकाळात विद्यापीठाचा कारभार सुरळीतपणे सुरू होता. राज्यात आघाडी सरकार अस्तित्वात आल्यापासून काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वैयक्तिक प्रसिध्दीसाठी कुलगुरू व विद्यापीठ प्रशासनावर केलेल्या चुकीच्या व बिनबुडाच्या आरोपांमुळे व्यथित होऊन एका वैज्ञानिक, संवेदनशील असलेले प्रा.पी.पी.पाटील यांनी राजीनामा दिला असावा, असे स्पष्ट मत असल्याचे ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.शिक्षण क्षेत्रातील वाढता हस्तक्षेप थांबवाआता विद्यापीठात गोंधळ घालणाऱ्यांना अटकाव करण्यासाठी विद्यापीठ विकास मंच कटिबध्द राहणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने शिक्षण क्षेत्रातील वाढता हस्तक्षेप थांबवावा, अशी मागणी विद्यापीठ विकास मंचतर्फे करण्यात आली.

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव