शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कविवर्य ना. धों. महानोर यांना आचार्य अत्रे मानचिन्ह पुरस्कार

By विलास.बारी | Updated: August 4, 2022 23:06 IST

जळगावातील गांधी तीर्थ येथे १३ ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

विलास बारी, जळगाव | लोकमत न्यूज नेटवर्क: आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या १२४ व्या जयंतीदिनी आचार्य अत्रे मानचिन्हाचा पुरस्कार या वर्षी कवी ना. धों. महानोर यांना प्रदान केला जाणार आहे. विशेष म्हणजे, हा समारंभ १३ ऑगस्ट रोजी कस्तुरबा सभागृह, गांधी तीर्थ येथे सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे.

आचार्य अत्रे यांचे निधन १३ जून १९६९ रोजी झाले. त्यानंतर १९७१ पासून २०२१ पर्यंत 'साहित्यसम्राट आचार्य अत्रे मानचिन्ह पुरस्कार' प्रदान करण्याचे कार्यक्रम मुंबईत आणि पुण्यात झाले. पहिल्यांदा हा कार्यक्रम जळगावात होत आहे. या वर्षीचा पुरस्कार कविवर्य ना. धों. महानोर यांना 'आत्रेय'तर्फे ॲड. राजेंद्र पै यांनी जाहीर केला. ते आचार्य अत्रे यांचे नातू आहेत. हा कार्यक्रम मुंबईत न करता जळगाव येथेच करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येईल. आमदार शिरीष मधुकरराव चौधरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. खान्देशमध्ये होणाऱ्या आचार्य अत्रे जयंती समारंभाला उपस्थित राहावे, असे आवाहन ॲड. राजेंद्र पै यांनी केले आहे. या समारंभाला ॲड. हर्षवर्धन देशपांडे हेसुद्धा उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव