शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

जळगावातील धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 12:26 IST

यंदाही पावसाची सरासरी मागील वर्षी आजच्या तारखेइतकीच म्हणजे ३८.५ टक्के आहे. मात्र धरणांमध्ये पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे. हा पाणीसाठा वाढण्यासाठी आणखी जोरदार पावसाची गरज आहे.

ठळक मुद्देजळगावात पंधरा दिवसांपासून पावसाची दांडीजळगाव जिल्ह्यात पावसाची सरासरी मागील वर्षाइतकीच

जळगाव : यंदाही पावसाची सरासरी मागील वर्षी आजच्या तारखेइतकीच म्हणजे ३८.५ टक्के आहे. मात्र धरणांमध्ये पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे. हा पाणीसाठा वाढण्यासाठी आणखी जोरदार पावसाची गरज आहे.यंदा जून महिन्याच्या सुरूवातीपासूनच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे यंदा भरपूर पाऊस होईल अशी अपेक्षा होती. मात्र आजअखेर सरासरीच्या ३८.५ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला ३८.३ टक्के पाऊस झाला होता.धरणातील साठा चिंताजनकमागील वर्षी आजच्या तारखेला झाला होता, तेवढाच पाऊस जिल्ह्यात यंदाही झालेला असला तरीही धरणांमधील पाणीसाठ्याची स्थिती मात्र चिंताजनक आहे. कारण मागील वर्षी आजच्या तारखेला जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण ३५.६५ टक्के पाणीसाठा होता. मात्र यंदा केवळ २२.८१ टक्के पाणीसाठा धरणांमध्ये आहे.वाघूर, गिरणकची स्थिती चिंताजनकजिल्ह्यातील तीन मोठ्या धरणांमध्ये मागील वर्षी आजच्या तारखेला ४३.८४ टक्के पाणीसाठा होता. आजच्या स्थितीला २७.७४ टक्के पाणीसाठा आहे. हतनूरमध्ये मागील वर्षी आजच्या तारखेला ७.५३ उपयुक्त जलसाठा होता. त्या तुलनेत यंदा चांगली स्थिती असून २१.०२ टक्के पाणीसाठा आहे. वाघूर व गिरणा धरणातील पाणीसाठ्याची स्थिती मात्र चिंताजनक आहे. गिरणा धरणात मागील वर्षी ५२.३१ टक्के पाणीसाठा होता. त्या तुलनेत यंदा केवळ २७.८१ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर वाघूर धरणात ६३.३६ टक्के पाणीसाठा होता. त्या तुलनेत यंदा केवळ ३४.४९ टक्के पाणीसाठा झाला आहे. वाघूर धरणावर जळगाव शहरासह पाच पाणी योजना अवलंबून आहेत. तर गिरणा धरणावर जिल्ह्यातील चाळीसगावसह अनेक गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. तसेच शेतीही अवलंबून आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होण्यासाठी जोरदार पावसाची गरज आहे.

टॅग्स :JalgaonजळगावRainपाऊस