शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जळगावातील धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 12:26 IST

यंदाही पावसाची सरासरी मागील वर्षी आजच्या तारखेइतकीच म्हणजे ३८.५ टक्के आहे. मात्र धरणांमध्ये पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे. हा पाणीसाठा वाढण्यासाठी आणखी जोरदार पावसाची गरज आहे.

ठळक मुद्देजळगावात पंधरा दिवसांपासून पावसाची दांडीजळगाव जिल्ह्यात पावसाची सरासरी मागील वर्षाइतकीच

जळगाव : यंदाही पावसाची सरासरी मागील वर्षी आजच्या तारखेइतकीच म्हणजे ३८.५ टक्के आहे. मात्र धरणांमध्ये पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे. हा पाणीसाठा वाढण्यासाठी आणखी जोरदार पावसाची गरज आहे.यंदा जून महिन्याच्या सुरूवातीपासूनच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे यंदा भरपूर पाऊस होईल अशी अपेक्षा होती. मात्र आजअखेर सरासरीच्या ३८.५ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला ३८.३ टक्के पाऊस झाला होता.धरणातील साठा चिंताजनकमागील वर्षी आजच्या तारखेला झाला होता, तेवढाच पाऊस जिल्ह्यात यंदाही झालेला असला तरीही धरणांमधील पाणीसाठ्याची स्थिती मात्र चिंताजनक आहे. कारण मागील वर्षी आजच्या तारखेला जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण ३५.६५ टक्के पाणीसाठा होता. मात्र यंदा केवळ २२.८१ टक्के पाणीसाठा धरणांमध्ये आहे.वाघूर, गिरणकची स्थिती चिंताजनकजिल्ह्यातील तीन मोठ्या धरणांमध्ये मागील वर्षी आजच्या तारखेला ४३.८४ टक्के पाणीसाठा होता. आजच्या स्थितीला २७.७४ टक्के पाणीसाठा आहे. हतनूरमध्ये मागील वर्षी आजच्या तारखेला ७.५३ उपयुक्त जलसाठा होता. त्या तुलनेत यंदा चांगली स्थिती असून २१.०२ टक्के पाणीसाठा आहे. वाघूर व गिरणा धरणातील पाणीसाठ्याची स्थिती मात्र चिंताजनक आहे. गिरणा धरणात मागील वर्षी ५२.३१ टक्के पाणीसाठा होता. त्या तुलनेत यंदा केवळ २७.८१ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर वाघूर धरणात ६३.३६ टक्के पाणीसाठा होता. त्या तुलनेत यंदा केवळ ३४.४९ टक्के पाणीसाठा झाला आहे. वाघूर धरणावर जळगाव शहरासह पाच पाणी योजना अवलंबून आहेत. तर गिरणा धरणावर जिल्ह्यातील चाळीसगावसह अनेक गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. तसेच शेतीही अवलंबून आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होण्यासाठी जोरदार पावसाची गरज आहे.

टॅग्स :JalgaonजळगावRainपाऊस