शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

भाजीपाल्याचे भाव भिडले पुन्हा गगनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 11:00 IST

आवकमध्ये निम्म्याने घट : बटाटे ४० तर टमाटे ८० रुपये किलोवर, मालवाहतूकदार येण्यास तयार नाही

जळगाव : कोरोनाच्या धास्तीने मालवाहतूकदार येण्यास तयार नसल्याने भाजीपाल्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे त्यांचे भाव चढेच असून आता तर बटाटे ४० रुपये प्रति किलोवर पोहचले आहे. अशाच प्रकारे दररोज वापरात असणारी हिरवी मिरचीदेखील ६० रुपये तर टमाटे ८० रुपये प्रति किलोने विक्री होत आहे.आवक निम्म्यावरकृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज दोन हजार क्विंटलच्या जवळपास भाजीपाल्याची आवक होते. यात जळगावात ७ ते १३ जुलै दरम्यान असलेल्या कडक लॉकडाऊनच्या काळात भाजीपाल्याची आवक २५ ते ३० टक्क्यांवर आली होती. त्यानंतर आता लॉकडाऊन संपून आठवडा होईल तरी आवक पूर्णपणे सुरू झालेली नसल्याचे चित्र आहे. लॉकडाऊनच्या काळातील तुलनेत हळूहळू आवक वाढत जाऊन ती आता ५० टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. सध्या केवळ ९०० ते एक हजार क्विंटल भाजीपाल्याची आवक सुरू असून नेहमीच्या तुलनेत अद्यापही ती ५० टक्केच आहे. मालवाहतूकदारांच्या धोरणामुळे ही आवक कमीच राहण्याची शक्यता आहे.कोथिंबीर पुन्हा महागशनिवारी कोथिंबीरची मोठी आवक वाढली व जागोजागी कोथिंबीर विक्री करणारे वाहने व दुकान लागल्या होत्या. १० रुपये जुडीप्रमाणे विक्री होत असलेला कोथिंबीर पुन्हा महागला व तो पुन्हा ६० ते ७० रुपये प्रति किलोने विक्री होत आहे.या कारणामुळेभाज्यांचे भाव वाढले-सध्या पावसाळ््यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन चांगले येत असले तरी व मालवाहतुकीस बंदी नसली तरी मालवाहतूकदार मालाची ने-आण करण्यास तयार होत नसल्याने आवकवर परिणाम होत आहे.-जळगावात जिल्ह्यातील विविध भागांसह औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, कन्नड या भागातून भाजीपाल्याची आवक होत असते. यात प्रामुख्याने हिरवी मिरची व टमाटे हे बाहेरील जिल्ह्यातून येतात.-सध्या अनेक वाहतूकदार येण्यास तयार नसल्याने या वस्तूंचे भाव वाढण्यासह बटाटे, कोबी, मेथी, पालक यांचेही भाव वाढत आहे. इतकेच नव्हे श्रावण सोमवारी मागणी वाढणाऱ्या गंगाफळचे भावदेखील आतापासून ६० रुपये प्रति किलोवर पोहचले आहे.वाढीव भावाने विक्रीबाजार समितीमध्ये केवळ घाऊक विक्रेत्यांनाच भाजीपाला खरेदीची परवानगी असल्याने इतर विक्रेत्यांना माल मिळत नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. घाऊक विक्रेते नंतर इतर विक्रेत्यांना जादा दराने भाजीपाला विक्री करतात.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव