शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

खान्देशात मंगळवारपर्यंत वरुणराजाचा रुसवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 17:54 IST

मान्सून वाऱ्यांचा प्रवाह सध्या उत्तरेकडे सरकल्याने, जळगाव जिल्ह्यासह धुळे, नंदुरबार या ठिकाणी दहा ते बारा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. मंगळवार, १४ आॅगस्टपर्यंत हवामान कोरडेच राहणार असून, काही ठिकाणी तुरळक हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

ठळक मुद्देकुलाबा वेधशाळेचा अंदाजमान्सूनचा प्रवाह उत्तरेकडे सरकलातुरळक हलक्या सरी पडण्याची शक्यता

सचिन देव ।जळगाव : मान्सून वाऱ्यांचा प्रवाह सध्या उत्तरेकडे सरकल्याने, जळगाव जिल्ह्यासह धुळे, नंदुरबार या ठिकाणी दहा ते बारा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. मंगळवार, १४ आॅगस्टपर्यंत हवामान कोरडेच राहणार असून, काही ठिकाणी तुरळक हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.गेल्या आठवड्यापासून मान्सून वाºयांचा प्रवाह उत्तर भारताकडे सरकला असल्याने, उत्तरप्रदेश, पंजाब, हरीयाणा, बिहार, हिमाचल प्रदेशचा काही भाग या ठिकाणी वादळी वाºयासह पाऊस सुरु आहे. या मान्सून वाºयांचा प्रवाह महाराष्ट्राकडे परतण्यासाठी अनुकूल वातावरण नाही.तसेच मान्सूनसाठी आवश्यक असलेला कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रात निर्माण व्हायला, किमान आठवडा लागणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचा वेग मंदावला असून, फक्त कोकण किनारपट्टीवरच सध्या मध्यम स्वरुपाच्या हलक्या सरी अधून-मधून बरसत आहे.ढगाळ वातावरण कायम राहणारगेल्या दहा ते बारा दिवसापासून पावसाने दडी मारली असून, यापुढील आठवड्यातही खान्देशातील हवामान कोरडेच राहणार आहे. तसेच सकाळपासून ढगाळ वातावरणदेखील कायम राहणार आहे. शक्य झाल्यास काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरीदेखील बरसण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे काही भागात थंड वारे वाहण्याची शक्यता आहे.मान्सून वाºयांचा प्रवाह सध्या उत्तरेकडे असल्याने, महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस लांबला आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे,नंदुरबार या जिल्हयांमध्ये १४ आॅगस्टपर्यंत हवामान कोरडे राहणार आहे. मात्र, भागात तुरळक हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे. मुसळधार पाऊस कुठेही पडणार नाही. १४ तारखेनंतर या भागात पावसाचा जोर वाढेल. -के. एस. होसाळीकर, उपसंचालक, प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई

टॅग्स :RainपाऊसJalgaonजळगाव