शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

उद्योग क्षेत्रात काम करण्यासाठी मूल्ये व सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 07:50 IST

‘गती‘तर्फे कौशल्य प्रशिक्षण सर्वेक्षण : इंग्रजी संभाषण समजण्याला ३१ टक्के युवकांनी दिले महत्त्व

जळगाव  - उद्योग क्षेत्रात काम करण्यासाठी युवकांमध्ये मूल्ये व सकारात्मक दृष्टिकोन हे कौशल्य महत्त्वाचे आहे तर इंग्रजी संभाषण काळजीपूर्वक ऐकणे व समजणे महत्त्वाचे असल्याचा निष्कर्ष एका सर्वेक्षणातून पुढे आला आहे. एवढेच नाही तर व्यावसायिक शिष्टाचार, शिकण्याची तयारी, कल्पकता व टीमवर्क या कौशल्यांचा अभाव दिसून आला. उत्तर महाराष्ट्रातील उद्योगविश्वाचा गरजा पूर्ण करण्याचा दृष्टीने ‘गती’ (गोखलेज अ‍ॅडव्हॉन्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ) या संस्थेच्यावतीने दोन वेगवेगळे सर्वेक्षण करण्यात आले. उद्योग क्षेत्रात आवश्यक कौशल्य व इंग्रजी भाषेचे महत्त्व या कौशल्यांवर ३६५ युवक व उद्योजकांचे मतं जाणून घेण्यात आले.

‘गती’तर्फे पहिले सर्वेक्षण उद्योगामध्ये काम करताना युवकांमध्ये आवश्क सूक्ष्म कौशल्याबाबत करण्यात आले. यात शहरातील ११० उद्योजकांचे सर्वेक्षण करण्यात आले, यामध्ये २१ प्रकारचे उद्योगांचा समावेश होता. त्यात पॉलीमर, प्लॉस्टिक, इलेक्ट्रिकल आणि फेब्रीकेशन या उद्योगांचा सहभाग होता. उद्योग संस्थेत नव्याने होणारे पदविका व पदवीधर विद्यार्थी यांच्याकडून अपेक्षित असलेल्या विविध सूक्ष्म कौशल्यांचा अभ्यास या सर्वेक्षणात करण्यात आला. यातून महत्त्वपूर्ण मुद्दे समोर आले आहेत.२.९५ टक्के उद्योजकांच्या मते मूल्ये आणि सकारात्मक दृष्टिकोन हे कौशल्य सगळ्यात महत्वाचे आहे. त्या खालोखाल ९४ टक्के उद्योजकांनी परिणामकारक संवाद कौशल्याला प्राधान्य दिले आहे. एकूणच सर्वेक्षणात सकारात्मक कार्य संस्कृती यावर भर देण्यात आला आहे.

हे मुद्दे नोकरीसाठी अडसरया सर्वेक्षणात विद्यार्थी व कामगार यांच्याकडून अपेक्षित असलेल्या विविध सूक्ष्म कौशल्यांवरदेखील अभ्यास करण्यात आला. त्यांचे प्रश्न व त्यांच्याकडून अपेक्षित असलेले कौशल्य पाहता सध्यस्थितीत दिले जाणारे शिक्षण व कामागारांचा बदलता दृष्टिकोन हे मुद्दे नोकरीसाठी अडसर ठरत असल्याचे दिसून आले. तसेच व्यावसायिक शिष्टाचार, शिकण्याची तयारी, कल्पकता व टिमवर्क या कौशल्यांचा अभाव दिसून आला.दुसरे सर्वेक्षण ‘व्यावसायिक इंग्रजी’ या विषयावर करण्यात आले. यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील व्यावसायिक महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक व उद्योग क्षेत्रातील अधिकाऱ्यांचे मते जाणून घेण्यात आली. या सर्वेक्षणासाठी संजय प्रभुदेसाई, प्रा.एस.एम.छापेकर, व्ही.एम.भट, एम.जे.चौधरी , प्रा.चारुदत्त गोखले, आर.व्ही.पाटील, प्रा.एस.ओ.दहाड यांनी मार्गदर्शन केले.१५० प्राध्यापकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात ६५ टक्के प्राध्यापकांनी ई-मेल व विविध व्यावसायिक अर्ज आणि पत्रांसाठी अचूक इंग्रजी लिखाण हे महत्त्वपूर्ण कौशल्य असल्याचे सांगितले. त्या खालोखाल इंग्रजी संभाष काळजीपूर्वक ऐकणे व समजणे या मुद्याला ६४ टक्के प्राध्यापकांनी संमती दिली.

विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणात २५५ च्यावर अभिप्राय घेण्यात आले. यात अभियांत्रिकी, औषधनिर्माण आणि व्यवस्थापन विद्याशाखेतील विद्यार्थी सहभागी होते. ३१ टक्के विद्यार्थ्यांनी इंग्रजी संभाषण काळजीपूर्वक ऐकणे व समजण्याला प्राधान्य दिले. २८ टक्के विद्यार्थ्यांच्या मते इंग्रजी शब्दांचे अचूक स्पेलींग व २७ टक्के विद्यार्थ्यांच्या मते संभाषण करतेवेळी योग्य काळ वापरणे महत्त्वाचे आहे.याशिवाय उद्योग संस्थामधील ५० अधिका-यांचा अभिप्राय घेण्यात आला. ७० टक्के अधिका-यांचा मते ई-मेल व व्यावसायिक अर्ज किंवा पत्रांसाठी अचूक इंग्रजी लिखाण महत्त्वपूर्ण कौशल्य असल्याचे मत व्यक्त केले. या सर्वेक्षणाचा अहवाल विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.

टॅग्स :englishइंग्रजी