शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
4
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
5
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
6
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
8
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
9
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
10
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
11
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
12
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
13
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
14
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
15
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
16
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
17
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
18
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
19
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
20
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ

विविध प्रदेशांना आपल्या अंत:करणात सामावून घेणारा वाल्मीकी-व्यासांचा खानदेश

By admin | Updated: May 2, 2017 13:54 IST

वीकेण्ड या सदरात प्रा.डॉ.विश्वास पाटील यांनी खान्देशातील संतांची मांदियाळी या विषयावर केलेले लिखाण.

 खानदेशच्या अर्थ आणि अर्थाच्या व्याप्तीच्या संदर्भात नाना मते आहेत.  कुणाला वाटते हा कान्हाचा देश तर कुणी म्हणतो खानांचा देश. इतिहासाचा अभ्यास करणा:या विद्याथ्र्यासाठी मात्र हा कान्हाचा - आभिरांचा देश तसेच हा फारूकी घराण्यातील खानांचाही देश ठरतो, अशी समन्वयात्मक भूमिका खानदेशच्या नावाच्या संदर्भात तर आढळतेच पण इथल्या वैविध्यपूर्ण संत साहित्याच्या संदर्भात विचार करून जाताही असे ठळकपणे ध्यानात येते. इथे नाना धर्म-मत-पंथ-संप्रदायांच्या सिद्धांताचे प्रवाह आनंदाने एकत्र नांदले. हिंदू वा मुसलमान अशाप्रकारे कुठलाही अभिनिवेश मनी न बाळगता ही संत परंपरा विकसली. नाही तरी संतांच्या अंगणात मानवी धर्माचेच जयगान असते. खानदेशही याला अपवाद नाही. असा हा खानदेशचा प्रदेश विविध धर्म मतांच्या गलबल्याला आपल्या अंत:करणात सामावून घेणारा आहे. उत्तरेला सातपुडा, दक्षिणेला सातमाळा किंवा अजिंठा, पूव्रेकडे हत्ती टेकडय़ा, पश्चिमेला सह्यगिरी, पूव्रेस राजे भोसले तर पश्चिमेला गायकवाड, उत्तरेला होळकर तर दक्षिणेला निजाम अशी राज्य व्यवस्था आहे. या भूमीला सहजच समन्वयात्मक असण्याचा एक निसर्गदत्त आशीर्वाद लाभला आहे. 

चाळीसगाव नजीक पिंपरखेड - वालङिारी येथे वाल्मीकी ऋषी राहत असल्याचे उल्लेख येतात. येथून जवळच असलेल्या रांजणगावचे रांजण आजही दाखवले जातात. अमळनेर हे नाव अंबा ऋषीच्या समाधीवरूनच पडले आहे. खरे तर अंबा काय आणि नेर म्हणजे नीर काय या दोन्हीही शब्दांचा अर्थ पाणी असाच होतो.  उनपदेव येथे शरभंग ऋषींचा आश्रम होता. खानदेशात अनेक ठिकाणी असे उनपदेवचे ठाणे आहे. जळगावजवळ रामाला उष्टी बोरे देणा:या शबरीचे स्थान आहे. महाभारताची रचना व्यास महर्षीनी केली. ‘व्यासोच्छिष्टं जगत र्सव’ व्यास प्रतिभेने सारे जग उष्टे केले याचा अर्थ असा की आता जगाला नवीन असे काहीही सांगायला जागा नाही, अशा व्यासांची यावल ग्रामी समाधी आहे. कण्वांचा आश्रम कानळदा येथे आहे. एकचक्रानगरी म्हणजे सध्याचे एरंडोल, येथे पांडवांचा वाडा आहे. भीम बकासुराच्या युद्धाच्या खुणा आणि भात सांडल्याची जागा दाखविली जाते. तिकडे तळोद्याजवळ हिडिंबेचे वन आहे. पद्मालयाला गणेशाच्या अडीच पिठांचे स्थान आहे.  सातपुडय़ात सीताखाई आहेच. तिथेच नाथ पंथियांच्या विविध समाध्यांमध्ये कंथडीनाथांची समाधी विशिष्ट अशी आहे.
चाळीसगावचे जनार्दन स्वामी हे एकनाथ महाराजांचे सद्गुरू होते. शके 1426 साली त्यांचा जन्म झाला. काही ऋणानुबंधांमुळे त्यांना यवन राजाच्या दरबारी नोकरी करावी लागली. पुढे देवगड वा दौलताबाद येथे ते बढतीवर गेले. ते मोठे वीर, दृढ स्वभावाचे, नियमित आणि तेजस्वी पुरुष होते.  बादशहाचे विश्वासपात्र म्हणून त्यांची ख्याती होती. हे गुरू दत्तात्रयांचे उपासक होते. उपास्यदेवतेचे साक्षात दर्शन त्यांना झाले होते. आपले काम प्रामाणिकपणे पूर्ण करून ते रात्री ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव या ग्रंथांवर प्रवचने देत असत. प्रपंच आणि परमार्थातील संतुलन त्यांनी राखले होते. एकनाथांनी सहा वर्षार्पयत निष्ठापूर्वक गुरूसेवा केली, अनुग्रहाला पूर्ण प्राप्त झाले. 
 मुक्ताईनगर येथे मुक्ताबाई आणि चांगदेव आहेत. पाटणा येथे गणिततज्ज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ भास्कराचार्याचे ठाणे आहे तर कण्हेर डोंगरावर  कण्हेर स्वामींची समाधी आहे.  जामनेरमार्गे सावळतबा:याचे सूर्यमंदिर, यावलला महालक्ष्मी मनुदेवी, फरकांडे येथे चांद मोमीनचे हलते मनोरे, शहाद्याजवळ मुसा सुहागीची कबर, गरंधीपु:यात ब्रrादेवाची तपोभूमी तर एरंडोलच्या जुन्या विठ्ठलवाडीत संत निवृत्तीनाथांच्या पादुका आहेत. पद्मालयाचे गोविंदबुवा आहेत तर भुसावळजवळ कपिलेश्वर कंदार्क नामक संत कवी उदासी उपाख्य बाबा प्रयागदासांचे शिष्य होते.
चाळीसगावचे आत्मारामस्वामी शिंदखेडकर, सदानंद स्वामी, वाडे तालुका चाळीसगाव येथील पंचोपाख्यानकर्ता महालिंगदास, तांदूळवाडीचा वह्याकर्ता चांग सुलतान, पिंपळनेर परिसरातील दीपर}ाकरकर्ते र}ाकर स्वामी सदावर्ते, शिरुडचे ‘अनुभवोदय’ हा वेदांतपर ग्रंथ लिहिणारे माधवेंद्र, श्रीधरशास्त्री पाठक उपाख्य स्वामी शंकरानंद भारती यांचे नाव विशिष्ट आहे. श्री ङोंडुजी महाराज वेळुकरांनी सन 1833 साली पंढरपूर येथे वारकरी संप्रदायात दीक्षा घेतली. एदलाबाद कोथळी येथे येऊन संत मुक्ताईच्या समाधी मंदिराचे संशोधन करून तेथील स्वयंभू मूृर्तीची प्राणप्रतिष्ठा करवली. दरवर्षी पुण्यतिथी यात्रेस आरंभ केला. त्यानंतर त्यांचे शिष्य श्री धनजी महाराज भुसावळकर यांनी सेवा केली.  या परंपरेत सर्वश्री नागोजी महाराज तळवेलकर, मुकुंद महाराज एणगावकर, तोताराम महाराज गाडेगावकर, ङोंडुजी महाराज आसोदेकर, राजारामशास्त्री शेलगावकर, मोतीराम महाराज एणगावकर, काशीराम महाराज आडविहीरकर, जगन्नाथ महाराज अंजाळेकर, लक्ष्मणबुवा कुंडकर, दिगंबरबुवा चिनावलकर, विठ्ठलबुवा हंबर्डीकर, निवृत्ती महाराज देशमुख शेलगावकर, खुशाल तोताराम पाटील दूधलगावकर, शंकरराव कोलते पाटील डिधीकर, निवृत्ती भाऊ बोंडे एणगावकर, गोविंदबुवा बोंडे एणगावकर या वारकरी संप्रदायातील  संतांनी काम केले. हे काम केवळ धार्मिक स्वरूपाचे नसून त्याला सामाजिक संदर्भ आणि मानवीय संवेदनांचा पोत आहे.
- प्रा.डॉ.विश्वास पाटील