शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
2
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
3
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
4
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
5
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
6
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
7
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
8
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
9
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
10
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
11
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
12
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
13
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
14
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
15
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
16
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
17
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
18
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
19
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
20
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर

सव्वालाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 12:35 IST

१८०० जणांना अडचणी, ४३ हजार जणांची प्रक्रिया सुरु, रोज माहिती देण्याचे आदेश

जळगाव : जळगाव जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेकरीता १ लाख ४३ हजार ८३२ शेतकरी पात्र ठरले आहे. यापैकी १ लाख १२७ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. ४३७०५ शेतकºयांचे आधार प्रमाणीकरण करण्याची प्रक्रिया सुरु आहे. यापैकी १८३३ शेतकºयांचे आधारक्रमांक व इतर तांत्रिक बाबींमुळे प्रमाणीकरण होण्यात अडचणी येत नसल्याने या तक्रारी जिल्हा समन्वय समितीकडे प्राप्त झाल्या आहेत.महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उपनिबंधक सहकारी संस्था मेघराज राठोड, जिल्हा अग्रणी बँकेचे समन्वय अरुण प्रकाश, जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी प्रमोद बोरोले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. बोटे, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे व राष्ट्रीयकृत बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.जिल्हाधिकारी म्हणाले की, काही शेतकºयांना अडचणी येत नसल्याने या तक्रारी जिल्हा समन्वय समितीकडे प्राप्त झाल्या आहेत. यावर तातडीने उपाययोजना करुन हे काम लवकरात लवकर पूर्ण होण्याकरीता संबंधित बँकांनी कर्जदार शेतकºयांचे आधार व इतर माहिती दररोज सायंकाळी ५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी. माहिती सादर कताना संबंधित शेतकºयाचा विशेष क्रमांकही सादर करावा. जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता सर्व संबंधित यंत्रणेने घेण्याच्या सुचनाही दिल्या आहेत.शेतकºयाकडून उकळले जाताहेत पैसे, पिळवणूक होत असल्याची तक्रारशेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जळगाव जिल्ह्यातील पात्र शेतकºयांना आधार प्रमाणीकरण करण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) चालकांकडून पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी शेतकºयांनी केल्या अहेत.कर्जमुक्ती योजनेच्या संपूर्ण महाराष्ट्रात याद्या जाहीर झाल्या आहेत. या योजनेसाठी पात्र शेतकºयांना आपल्या बँक खात्याशी आधार प्रमाणीकरण करणे जरुरीचे आहे. यामुळे शासनाने काम करण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) सुरू केले आहेत. जेणेकरून शेतकºयांना नाहक त्रास सहन करावा लागणार नाही. जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी नुकतेच शेतकºयांना या कामासाठी कुठलीही रक्कम न देण्याचे सांगितले. तसेच सीएससी चालकांनाही शेतकºयांकडून रक्कम न घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र असे असतानादेखील सीएससी चालकांडून जिल्हाधिकाºयांच्या या आदेशाला शहरासह ग्रामीण भागात केराची टोपली दाखवली जात असल्याचे समोर आले आहे.शहरात एक - दोन सेंटर वगळता सर्वच सेंटर चालकांकडून आधार प्रमाणीकरणासाठी शेतकºयांकडून ५० रुपये फी वसूल केली जात आहे. तर ग्रामीणमध्ये फीचा हाच आकडा ७० रुपये ते १०० रुपये एवढा जास्त आहे. यामुळे शेतकरी वर्गाची पिळवणूक होत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव