शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

सव्वालाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 12:35 IST

१८०० जणांना अडचणी, ४३ हजार जणांची प्रक्रिया सुरु, रोज माहिती देण्याचे आदेश

जळगाव : जळगाव जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेकरीता १ लाख ४३ हजार ८३२ शेतकरी पात्र ठरले आहे. यापैकी १ लाख १२७ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. ४३७०५ शेतकºयांचे आधार प्रमाणीकरण करण्याची प्रक्रिया सुरु आहे. यापैकी १८३३ शेतकºयांचे आधारक्रमांक व इतर तांत्रिक बाबींमुळे प्रमाणीकरण होण्यात अडचणी येत नसल्याने या तक्रारी जिल्हा समन्वय समितीकडे प्राप्त झाल्या आहेत.महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उपनिबंधक सहकारी संस्था मेघराज राठोड, जिल्हा अग्रणी बँकेचे समन्वय अरुण प्रकाश, जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी प्रमोद बोरोले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. बोटे, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे व राष्ट्रीयकृत बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.जिल्हाधिकारी म्हणाले की, काही शेतकºयांना अडचणी येत नसल्याने या तक्रारी जिल्हा समन्वय समितीकडे प्राप्त झाल्या आहेत. यावर तातडीने उपाययोजना करुन हे काम लवकरात लवकर पूर्ण होण्याकरीता संबंधित बँकांनी कर्जदार शेतकºयांचे आधार व इतर माहिती दररोज सायंकाळी ५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी. माहिती सादर कताना संबंधित शेतकºयाचा विशेष क्रमांकही सादर करावा. जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता सर्व संबंधित यंत्रणेने घेण्याच्या सुचनाही दिल्या आहेत.शेतकºयाकडून उकळले जाताहेत पैसे, पिळवणूक होत असल्याची तक्रारशेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जळगाव जिल्ह्यातील पात्र शेतकºयांना आधार प्रमाणीकरण करण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) चालकांकडून पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी शेतकºयांनी केल्या अहेत.कर्जमुक्ती योजनेच्या संपूर्ण महाराष्ट्रात याद्या जाहीर झाल्या आहेत. या योजनेसाठी पात्र शेतकºयांना आपल्या बँक खात्याशी आधार प्रमाणीकरण करणे जरुरीचे आहे. यामुळे शासनाने काम करण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) सुरू केले आहेत. जेणेकरून शेतकºयांना नाहक त्रास सहन करावा लागणार नाही. जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी नुकतेच शेतकºयांना या कामासाठी कुठलीही रक्कम न देण्याचे सांगितले. तसेच सीएससी चालकांनाही शेतकºयांकडून रक्कम न घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र असे असतानादेखील सीएससी चालकांडून जिल्हाधिकाºयांच्या या आदेशाला शहरासह ग्रामीण भागात केराची टोपली दाखवली जात असल्याचे समोर आले आहे.शहरात एक - दोन सेंटर वगळता सर्वच सेंटर चालकांकडून आधार प्रमाणीकरणासाठी शेतकºयांकडून ५० रुपये फी वसूल केली जात आहे. तर ग्रामीणमध्ये फीचा हाच आकडा ७० रुपये ते १०० रुपये एवढा जास्त आहे. यामुळे शेतकरी वर्गाची पिळवणूक होत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव