शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

जळगावच्या विद्यापीठाचा दावा, परीक्षेतील कॉपी घटली!

By अमित महाबळ | Updated: November 23, 2023 17:31 IST

कॉपी करण्याच्या प्रमाणात घट, विद्यापीठाकडून दावा.

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ऑक्टोबर/नोव्हेंबरच्या परीक्षा सध्या सुरू असून, विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर (हॉलतिकीट) कॉपी केल्यास कोणत्या प्रकारची शिक्षा होवू शकते याची माहिती दिल्यामुळे या सत्रात कॉपी करण्याचे प्रमाण घटले आहे, असा दावा विद्यापीठाकडून करण्यात आला.

कॉपी व तणावमुक्त परीक्षांसाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला असून, त्या दृष्टीने काही दिवसांपासून विद्यार्थ्यांमध्ये जागृती केली जात आहे. या प्रयत्नांचे चांगले परिणाम आता दृष्टिपथात येत आहेत. पदवी व पदव्युत्तरच्या परीक्षा केंद्रांना कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे आणि कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी स्वतंत्रपणे भेटी देवून परीक्षांचा आढावा घेतला.

तातडीने ऑनलाइन मूल्यांकन - विद्यापीठाने झालेल्या परीक्षांचे तातडीने ऑनलाईन मूल्यांकन सुरू केले असून, कुलगुरूंनी भेटी दिलेल्या महाविद्यालयात मूल्यांकन केंद्रालाही भेट देवून माहिती घेतली. सर्व प्राध्यापकांनी या मूल्यांकन प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी केले आहे.

कुलगुरू देताहेत परीक्षा केंद्रांना भेटी - कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी बुधवारी जामनेर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शेंदुर्णी येथील गरूड महाविद्यालय, मुक्ताईनगर येथील खडसे महाविद्यालयात सुरु असलेल्या परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. त्यांच्या समवेत व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे उपस्थित होते. गुरुवारी साक्री येथील सी. गो. पाटील महाविद्यालयाला देखील कुलगुरूंनी भेट दिली. प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे,  कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी देखील जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या.

टॅग्स :Jalgaonजळगावuniversityविद्यापीठ