शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याचा अखेर दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 23:03 IST

विश्लेषण

विजयकुमार सैतवालजळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ््या कारणांनी वाढ होत असलेल्या सोन्याच्या भावात ३० आॅगस्ट रोजी ३५० रुपये प्रती तोळ््याने घसरण होऊन ते ३९ हजार १५० रुपयांवरून ३८ हजार ८०० रुपयांवर आले आहे. दुसरीकडे मात्र चांदीमध्ये तेजी सुरूच असून चांदी आता ४७ हजार रुपये प्रती किलोवर पोहचली आहे. सोन्याचे भाव कमी झाल्याने अखेर ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.रशिया व चीनने सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याची खरेदी वाढल्याने तसेच अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात होत असलेल्या घसरणीमुळे मे महिन्यापासून सोन्याचे भाव वाढण्यास सुरुवात झाली. जून महिन्यापासून तर ही वाढ अधिकच होत गेली.लग्न सराईच्या काळात १५ मे रोजी सोने ३२ हजार ९०० रुपयांवर पोहचले. तेव्हापासून ही वाढ अशीच सुरू राहून ६ जून २०१९ रोजी गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर सोने ३३ हजार १०० रुपयांवर पोहचले. २१ जून रोजी सोन्याचे भाव ३४,२०० रुपयांवर पोहचले. त्यानंतर ९ जुलै रोजी ३४ हजार ८०० आणि १० रोजी ३५ हजार रुपये प्रती तोळ््यावर सोने पोहचले. ५ आॅगस्ट रोजी सोने ३५ हजार ८०० रुपये व दुसऱ्याच दिवशी ६ आॅगस्ट २०१९ रोजी ३६ हजार ५०० रुपयांवर पोहचले व ७ रोजी तर ते ९०० रुपयांनी वाढून ३७ हजार ४०० रुपयांवर पोहचले. १३ रोजी तर सोने ३७ हजार ८५० रुपयांवर आणि २२ रोजी ३८ हजार रुपये प्रती तोळ््यावर पोहचले. त्यानंतर २४ रोजी ३८ हजार ६०० रुपये आणि २८ आॅगस्ट रोजी सोन्याने ३९ हजाराचा पल्ला ओलांडत ते ३९ हजार १५० रुपयांवर पोहचले. मध्यंतरी केवळ ८ आॅगस्ट रोजी सोन्याच्या भावात ५० रुपयांनी घसरण होऊन ते ३७ हजार ३५० रुपयांवर आले होते. त्यानंतरही सोन्याचे भाव चढेच राहून ते ३९ हजार रुपयाच्या पुढे गेले. मात्र आता तीन आठवड्यानंतर ३० आॅगस्ट रोजी सोन्याचे भाव ३५० रुपयांनी कमी होऊन ते ३९ हजार १५० रुपयांवरून ३८ हजार ८०० रुपयांवर आले आहे.रशिया व चीनने सोन्याची खरेदी सध्या कमी केली असून त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव कमी होत आहे. त्यात गेल्या तीन दिवसांपासून अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात सुधारणा होत असल्याने सोन्याचेही भाव कमी होण्यास मदत मिळत आहे. २८ आॅगस्ट रोजी ७१.८२ रुपयांवर असलेले डॉलरचे दर २९ रोजी ७१.६९ रुपये झाले व ३० रोजी ते ७१.४६ रुपये झाले. या सर्व परिणामामुळेच तीन आठवड्यानंतर ३० आॅगस्ट रोजी सोन्याचे भाव ३५० रुपयांनी कमी झाले ते ३९ हजार १५० रुपयांवरून ३८ हजार ८०० रुपयांवर आले आहे. सोन्याच्या भावात घसरण झाली असली तरी चांदीमध्ये तेजी असल्याचे चित्र आहे. तसे पाहता डॉलरच्या तुलनेत रुपयात सुधारणा झाल्याने चांदीचे भाव कमी होणे अपेक्षित होते. मात्र येणाºया सणासुदीच्या काळात चांदीच्या भांड्यांसाठी मागणी वाढणार असल्याने चांदीत तेजी कायम असल्याचे सांगितले जात आहे. २३ आॅगस्ट रोजी ४४ हजार रुपये प्रती किलोवर असलेली चांदी २४ रोजी ४५ हजार रुपये, २६ रोजी ४५ हजार ५०० रुपये २८ रोजी ४६ हजार ५०० रुपयांवर पोहचली. आता ३० रोजी चांदीचे भाव ४७ हजार रुपये प्रती किलोवर पोहचले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव