शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

सोन्याचा अखेर दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 23:03 IST

विश्लेषण

विजयकुमार सैतवालजळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ््या कारणांनी वाढ होत असलेल्या सोन्याच्या भावात ३० आॅगस्ट रोजी ३५० रुपये प्रती तोळ््याने घसरण होऊन ते ३९ हजार १५० रुपयांवरून ३८ हजार ८०० रुपयांवर आले आहे. दुसरीकडे मात्र चांदीमध्ये तेजी सुरूच असून चांदी आता ४७ हजार रुपये प्रती किलोवर पोहचली आहे. सोन्याचे भाव कमी झाल्याने अखेर ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.रशिया व चीनने सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याची खरेदी वाढल्याने तसेच अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात होत असलेल्या घसरणीमुळे मे महिन्यापासून सोन्याचे भाव वाढण्यास सुरुवात झाली. जून महिन्यापासून तर ही वाढ अधिकच होत गेली.लग्न सराईच्या काळात १५ मे रोजी सोने ३२ हजार ९०० रुपयांवर पोहचले. तेव्हापासून ही वाढ अशीच सुरू राहून ६ जून २०१९ रोजी गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर सोने ३३ हजार १०० रुपयांवर पोहचले. २१ जून रोजी सोन्याचे भाव ३४,२०० रुपयांवर पोहचले. त्यानंतर ९ जुलै रोजी ३४ हजार ८०० आणि १० रोजी ३५ हजार रुपये प्रती तोळ््यावर सोने पोहचले. ५ आॅगस्ट रोजी सोने ३५ हजार ८०० रुपये व दुसऱ्याच दिवशी ६ आॅगस्ट २०१९ रोजी ३६ हजार ५०० रुपयांवर पोहचले व ७ रोजी तर ते ९०० रुपयांनी वाढून ३७ हजार ४०० रुपयांवर पोहचले. १३ रोजी तर सोने ३७ हजार ८५० रुपयांवर आणि २२ रोजी ३८ हजार रुपये प्रती तोळ््यावर पोहचले. त्यानंतर २४ रोजी ३८ हजार ६०० रुपये आणि २८ आॅगस्ट रोजी सोन्याने ३९ हजाराचा पल्ला ओलांडत ते ३९ हजार १५० रुपयांवर पोहचले. मध्यंतरी केवळ ८ आॅगस्ट रोजी सोन्याच्या भावात ५० रुपयांनी घसरण होऊन ते ३७ हजार ३५० रुपयांवर आले होते. त्यानंतरही सोन्याचे भाव चढेच राहून ते ३९ हजार रुपयाच्या पुढे गेले. मात्र आता तीन आठवड्यानंतर ३० आॅगस्ट रोजी सोन्याचे भाव ३५० रुपयांनी कमी होऊन ते ३९ हजार १५० रुपयांवरून ३८ हजार ८०० रुपयांवर आले आहे.रशिया व चीनने सोन्याची खरेदी सध्या कमी केली असून त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव कमी होत आहे. त्यात गेल्या तीन दिवसांपासून अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात सुधारणा होत असल्याने सोन्याचेही भाव कमी होण्यास मदत मिळत आहे. २८ आॅगस्ट रोजी ७१.८२ रुपयांवर असलेले डॉलरचे दर २९ रोजी ७१.६९ रुपये झाले व ३० रोजी ते ७१.४६ रुपये झाले. या सर्व परिणामामुळेच तीन आठवड्यानंतर ३० आॅगस्ट रोजी सोन्याचे भाव ३५० रुपयांनी कमी झाले ते ३९ हजार १५० रुपयांवरून ३८ हजार ८०० रुपयांवर आले आहे. सोन्याच्या भावात घसरण झाली असली तरी चांदीमध्ये तेजी असल्याचे चित्र आहे. तसे पाहता डॉलरच्या तुलनेत रुपयात सुधारणा झाल्याने चांदीचे भाव कमी होणे अपेक्षित होते. मात्र येणाºया सणासुदीच्या काळात चांदीच्या भांड्यांसाठी मागणी वाढणार असल्याने चांदीत तेजी कायम असल्याचे सांगितले जात आहे. २३ आॅगस्ट रोजी ४४ हजार रुपये प्रती किलोवर असलेली चांदी २४ रोजी ४५ हजार रुपये, २६ रोजी ४५ हजार ५०० रुपये २८ रोजी ४६ हजार ५०० रुपयांवर पोहचली. आता ३० रोजी चांदीचे भाव ४७ हजार रुपये प्रती किलोवर पोहचले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव