शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

उज्ज्वला गॅस योजनेचा राज्यातील १७.५ लाख कुटुंबांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 16:46 IST

जळगाव जिल्ह्यातील ९९ हजार ६०३ दारिद्रय रेषेखालील कुटुंबाचा समावेश

ठळक मुद्देउज्ज्वला गॅस योजनेचा राज्यात साडे सतरा लाख कुटुंबाना लाभजळगाव जिल्ह्यातील ९९ हजार ६०३ गरीब कुटुंबाना लाभ१ मे २०१६ रोजी प्रधान मंत्री उज्ज्वला योजनेचा शुभारंभ

विलास बारी /आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.१६ : पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेचा जिल्ह्यातील ९९ हजार ६०३ कुटुंबाना लाभ देण्यात आला. राज्यातील १७ लाख ५५ हजार ६५८ लाभार्थ्यांच्या तुलनेत जळगाव जिल्हा या योजनेत अग्रेसर ठरला आहे.काय आहे उज्ज्वला गॅस योजना?केंद्र सरकारने १ मे २०१६ रोजी संपूर्ण भारतात प्रधान मंत्री उज्ज्वला योजनेचा शुभारंभ केला. या योजनेचा मूळ उद्देश भारतातील दारिद्र्य रेषेखालील सुमारे ५ कोटी महिलांना मोफत घरगुती एलपीजी गॅस जोडण्या देण्याचा केंद्र्र शासनाने संकल्प केला आहे. महिलांचे सक्षमीकरण व त्यांच्या आरोग्याची निगा राखणे, स्वयंपाकासाठी लाकडी सरपण वापरल्यामुळे लहान बालक व महिलांना होणाºया श्वसनाच्या तक्रारी दूर करणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.योजनेचा लाभ कसा मिळविणारयोजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याने एलपीजी वितरण केंद्रावर अर्ज सादर करणे गरजेचे आहे. अर्जासोबत आपले संपूर्ण नाव, पत्ता, आधार कार्ड नंबर, जन-धन बँक खात्याचे नंबर देणे बंधनकारक आहे. सोबतच पंचायत अधिकारी, नगरपालिका यांनी प्रमाणित केलेले बीपीएल प्रमाणपत्र, बीपीएल रेशन कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो असणे आवश्यक आहे. दारिद्रय रेषेखालील महिलांनी अर्ज करणे आवश्यक आहे.९९ हजार ६०३ गरीब कुटुंबाना लाभया योजनेंतर्गत लाभ मिळावा यासाठी सन २०११ च्या जनगणनेनुसार तयार केलेल्या बीपीएल यादीतील एक लाख ६ हजार २८१ कुटुंबांचे प्रस्ताव पात्र ठरले आहेत. त्यापैकी ९९ हजार ६०३ कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.कर्ज व विनाकर्ज मिळतो लाभया योजनेत लाभार्थ्याला गॅस शेगडी, गॅसची रक्कम तसेच स्टॅम्प ड्युटीची रक्कम भरावी लागते. मात्र काही कुटुंबांची ही रक्कम भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते. त्यामुळे शासन अशा ग्राहकांना शेगडीचे ९९० व गॅससाठी ७०० अशा १६९० रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. अशावेळी १०० रुपयात कनेक्शन दिले जाते. मात्र या कर्जाची परतफेड होत नाही तोपर्यंत लाभार्थ्याला सबसिडीचा लाभ मिळत नाही.राज्यात साडे सतरा लाख कुटुंबाना लाभपंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेचा राज्यातील १७ लाख ५५ हजार ६५८ कुटुंबांना लाभ मिळाला आहे. त्यातुलनेत जळगाव जिल्ह्यात ९९ हजार ६०३ लाभार्थी असल्याने जळगाव जिल्ह्याचे काम या योजनेत आघाडीवर आहे.

सन २०११ च्या जनगणनेनुसार जळगाव जिल्ह्यातील बीपीएलधारकांना योजनेचा लाभ देण्यात येत आहे. आतापर्यंत एक लाख ६ हजार २८१ लाभार्थ्यांचे अर्ज पात्र ठरले आहेत. त्यापैकी ९९ हजार ६०३ कुटुंबाना या योजनेचा लाभ दिला आहे. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांनी या योजनेचा लाभ घ्यावा.-नीलेश लठ्ठे, नोडल अधिकारी, उज्ज्वला योजना

टॅग्स :Jalgaonजळगावprime ministerपंतप्रधान