शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

उध्दव ठाकरे, एकनाथ शिंदे एकाच दिवशी जळगावात; मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यात बदल  

By सुनील पाटील | Updated: September 6, 2023 19:55 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी ९ सप्टेंबर रोजी पाचोऱ्यात येणार होते, मात्र त्यांच्या दौऱ्यात आता बदल झाला असून १० सप्टेबर रोजी हा कार्यक्रम होणार आहे.

जळगाव: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी ९ सप्टेंबर रोजी पाचोऱ्यात येणार होते, मात्र त्यांच्या दौऱ्यात आता बदल झाला असून १० सप्टेबर रोजी हा कार्यक्रम होणार आहे. याच दिवशी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे (ठाकरे गट) जळगावात येणार आहेत. दोघं नेत्यांपैकी कोणाची सभा आधी होते हे अजून तरी निश्चित झालेले नाही.मात्र त्याकडे आता लक्ष लागले आहे.  दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात बदल झाल्याने महापालिकेत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला जिल्ह्यातील तीन पैकी एकही मंत्री उपस्थित राहणार नाहीत हे जवळपास निश्चित झालेले आहे.

महापालिकेच्या आवारात सरदार वल्लभभाई पुतळा साकारण्यात येत आहे. या पुतळ्याचे अनावरण उध्दव ठाकरे यांच्याहस्ते होणार आहे. महापालिकेचा शासकीय कार्यक्रम असल्याने महापौर जयश्री महाजन व आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना निमंत्रित करण्यात आले होते. भाजप नगरसेवकांनीही गिरीश महाजनांना विनंती केली होती, त्यामुळे तिघं मंत्री कार्यक्रमाला येणारच होते, मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी १० रोजी पाचोऱ्यात येत असल्याने तिघं मंत्री त्याच कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

कोण, कोणाला उत्तर देणार?सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पाचोऱ्यात येणार होते व त्याच्या दुसऱ्याच दिवशी उध्दव ठाकरे यांच्याहस्ते जळगावात सरदार पटेल व शिवस्मारकाचे लोकार्पण होणार आहे. त्यानंतर ठाकरे यांची वचनपूर्ती सभा होणार आहे. ९ रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री काय बोलतात, त्यावर ठाकरेंना उत्तर देणे सोपं होते, ती वेळ येऊ नये म्हणून ९ रोजी दौरा रद्द करुन १० रोजीचा दौरा मुख्यमंत्र्यांनी निश्चित केला. त्याशिवाय शक्ती प्रदर्शनावर कुरघोडीचाही हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. 

टॅग्स :JalgaonजळगावEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे