शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

मागून पाण्याचा प्रवाह वाढल्याने पाय घसरुन दोन तरुण बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 12:33 IST

कांताई बंधाऱ्यातील दुपारचा थरार : एक जण बेपत्ता, दुसरा बचावला

जळगाव : रविवार सुट्टीचा दिवस असल्याने मित्रांसोबत धानोरा शिवारातील कांताई बंधाºयात पोहायला गेलेले चेतन अरुण पाथरवट (३१, श्रीराम नगर, आसोदा रोड) व सागर बाळू पाटील (२७, कांचन नगर) पाण्यात बुडाले. त्यात सागर याला वाचविण्यात यश आले तर चेतन हा पाण्यात वाहून गेला. रात्री ८ वाजेपर्यंत शोध मोहीम राबवूनही तो हाती लागला नाही. त्यामुळे शोध कार्य थांबविण्यात आले. रविवारीदुपारी साडे तीन वाजता ही घटना घडली. मागून पाण्याचा प्रवाह वाढल्याने दोन जण पाण्याच पडल्याचे सांगितले जात आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सुट्टी असल्याने कांचन नगरातील पाच तरुण धानोरा, ता.जळगाव शिवारातील कांताई बंधाºयात पोहण्यासाठी गेले होते. दुपारी साडे तीन वाजता बंधाºयाच्या काठावर असताना पाण्याच्या प्रवाहाने पाय निसटला आणि त्यात चेतन व सागर दोघंही वाहिले.हा सागर याने आरडाओरड केल्याने इतर सहकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी तसेच गावातील काही लोकांनी धाव घेतली असता सागर हाताशी लागला तर चेतन सापडलाच नाही.घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक गणेश चव्हाण, सतीश हळणोर व विलास पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. धानोरा, मोहाडी, नागझिरी येथील पट्टीच्या पोहणाºया तरुणांना पाचारण करण्यात आले.रात्री आठ वाजेपर्यंत शोधया तरुणांनी चेतनचा पाण्यात शोध घेतला. रात्री आठ वाजेपर्यंत शोध कार्य चालले, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. शेवटी मोहीम थांबविण्यात आली.या घटनेने कांचन नगर व श्रीराम नगरमध्ये खळबळ उडाली असून सर्वजण चिंतीत आहेत.पावसामुळे ओसांडून वाहतोय बंधारापावसाचे दिवस असल्याने बंधारा ओसांडून वाहत आहे. धबाधब्यासारखे दृष्य असल्याने चेतन व सागर बंधाºयाच्या काठावर गेले होते. मागून पाण्याचा प्रवाह वेगाने असल्याने त्यात त्याचा पाय घसरला. शेवाळमुळेही पाय घसरल्याची शक्यता वर्तविली जात आहे.पोलीस पाटील पूनम सोनवणे, देवराम सोनवणे, तलाठी सारीका दुर्मळ आदींनी देखील वेगवेगळ्या ठिकाणचे पोहणारे बोलावले.चार बहिणींचा एकुलता भाऊचेतनच्या मित्र परिवाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, चेतनच्या पश्चात आई मंदाबाई , वडील अरुण रंगनाथ वडील, चार विवाहित बहिणी असा परिवार आहे. त्यापैकी एक बहिण वकिल असून पुण्याला तर दोन बहिणी मुंबई आहेत. एक जळगाव शहरातच वास्तव्यास आहे. चार बहिणींचा चेतन हा एकुलता भाऊ आहे. चेतनचे वडील अरुण पाथरवट हे बांधकाम मजुर आहेत. चेतन हा रेडीमेड कपडे विक्री करुन वडीलांना मदत करायचा. गेल्या काही दिवसांपूर्वीच तो महाराष्ट्र बँकेत कंत्राटी पध्दतीने शिपाई म्हणून रुजू झाला होता. कुटुंबाचा आधार तसेच एकुलता मुलगा बेपत्ता झाल्याने पाथरवट कुटुंबियांना धक्का बसला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव