शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
8
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
9
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
10
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
11
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
12
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
13
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
14
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
15
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
16
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
17
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
18
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
19
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
20
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी

सात दिवसात दोन गुन्ह, शिक्षण विभागाने मागविला अमळनेरच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांचा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 12:53 IST

विनयभंगानंतर आता खंडणीचा गुन्हा

जळगाव : गटशिक्षणाधिकारी आऱडी़ महाजन यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पुन्हा मंगळवारी रात्री उशिरा त्यांच्यासह आठ जणांविरूध्द खंडणीचागुन्हादाखलझालाआहे.यामध्येविद्यार्थ्यावर अत्याचार करणेतसेच प्रेम प्रकरण असल्याचे सांगत वृत्तपत्रातून बदनामी करण्याची धमकी देऊन दोन लाख रूपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी चोपडाई कोंढावळ (ता़ अमळनेर) येथील सद्गुरू पब्लिक स्कूलचे चेअरमन संजय व्यास यांच्या फिर्यादीवरून हागुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षण विभागाने तात्काळ अमळनेर गटविकास अधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत़प्राचार्यांना शिवीगाळ केली म्हणून २४ फे बु्रवारी रोजी चोपडाई कोंढावळ येथील सद्गुरू पब्लिक स्कूलचे चेअरमन यांनी एका विद्यार्थ्यास शिक्षा केली होती़ याबाबत विद्यार्थ्याने पालकाला सांगितल्यानंतर पालकाने गटशिक्षणाधिकारी आऱडी़महाजन यांच्याकडे तक्रार केली होती़ त्यानुसार २८ फेब्रुवारी रोजी गटशिक्षणाधिकारी यांनी चेअरमन व्यास यांना फोन लावून विद्यार्थ्यांवर तुम्ही अत्याचार करीत आहात असे सांगत मी पत्रकारांसोबत आपल्याकडे येत असल्याचे सांगितले़ नंतर गटशिक्षणाधिकांनी जितू ठाकूर, महेंद्र रामोसे, मुन्ना शेख, संजय पाटील व इतर दोन जणांसोबत शाळा गाठली़ तुमचे प्रेम प्रकरण सुरू आहे़ तसेच विद्यार्थ्यांवर अत्याचार सुध्दा करीत आहात, हे वृत्तपत्रात छापून बदनामी करू नाही तर दोन लाख रूपये द्या, अशी खंडणी व्यास यांच्याकडे मागितली़ त्याप्रसंगी विद्यार्थ्याला पालकाच्या भूमिकेने शिक्षा केल्याचे व्यास यांनी गटशिक्षणाधिकाºयांना सांगितले़ त्यावर महाजन यांनी दोन लाख रूपये पत्रकारांना देवून टाका नाही तर तुमची बदनामी करतील असेसांगितले़ मात्र, पंचवीस हजार रूपये माझ्याजवळ असल्याचे सांगत व्यास यांनी ती रक्कम जितू ठाकूर यांच्या हातात दिली़ अखेर या प्रकरणाबाबत कुठलीही वाच्यता न फोडण्याची धमकी त्या आठ जणांनी दिली़ त्यानंतर मंगळवारी रात्री १० वाजता अमळनेर पोलीस ठाणे गाठत शाळेचे चेअरमन यांच्या फिर्यादीवरून दोन लाख रूपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गटशिक्षणाधिकारी आऱडी़महाजन, जितू ठाकूर, महेंद्र रामोसे, मुन्ना शेख, संजय पाटील यांच्यासह दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़दरम्यान, या प्रकरणी शिक्षण विभागाला कुठलीही माहिती नसल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले. मात्र विनयभंग प्रकरण गटविकास अधिकारी यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.गटविकास अधिकाºयांना पाठविले पत्र२८ फेब्रुवारी रोजी गटशिक्षणाधिकारी आऱडी़महाजन यांनी विनयभंग केला म्हणून त्यांच्यावर ५ मार्च रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ याप्रकरणी शिक्षण विभागाने अमळनेर गटविकास अधिकारी यांना तात्काळ पत्र काढून संबंधित प्रकरणाची चौकशी करून अहवाल पाठविण्याचे आदेश केले आहेत़ दरम्यान, विनयभंग व खंडणीच्या गुन्ह्यातील संशयित गटशिक्षणाधिकारी हे फरार असल्याची माहिती समोर आली आहे़

टॅग्स :Jalgaonजळगाव